सोशल ड्रिंकच्या पाटर्य़ा

By admin | Published: August 13, 2015 03:19 PM2015-08-13T15:19:55+5:302015-08-13T15:19:55+5:30

ग्रामीण भागात काहीजण माळकरी असतात. ते व्यसनापासून लांब राहतात. वडीलधा-या माणसांचा थोडा धाकही असतो. शहरात तसं नसतं. इथं पर्याय अनेक, धाक कमी, दबाव कमी, आणि विरोधही कमी! त्यामुळे दारू ही फॅशन बनते.

Social drink pots | सोशल ड्रिंकच्या पाटर्य़ा

सोशल ड्रिंकच्या पाटर्य़ा

Next

‘माझे एक जरा प्रौढ मित्र. त्यांची ही गोष्ट. ते एकदा कुठल्या तरी आध्यात्मिक अधिक योगशिबिराला गेले होते. तिथल्या शिकवण्याने अत्यंत प्रभावित झाले. तिथे जी गोष्ट करायला सांगितली ती आचरणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या शिबिरात त्यांनी सांगितलं होतं की, एकदा मुलं करती-सवरती झाली की घरात आपण पाहुण्यासारखं राहायचं. एरवी घरातील प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे (म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे) व्हावी असं त्यांना वाटत असे. त्यामुळे घरात वाद होत. पण शिबिरातून आल्यानंतर त्यांनी काटेकोर स्वभाव बाजूला ठेवला आणि पाहुण्यासारखे राहायला सुरुवात केली. घरातल्या कुठल्याच गोष्टीत लक्ष घालणं बंद झालं. सून तर फारच खूश झाली.

जी नवी जीवनशैली तुम्ही आत्मसात केली आहे ती तशीच राहावी म्हणून महिन्यातून दोनदा कुणाकडे तरी सत्संग करा. भजनं म्हणा, योगा करा असंही त्यांना सांगितलं होतं. ते तसंही करू लागले. त्यांचे कुटुंबीय त्यांच्यातल्या या बदलानं चकित झाले होते. पण एक दिवस एक घटना घडली. तशी छोटीशीच होती. विजेचं बिल दोन महिन्यात भरलं नव्हतं म्हणून वीज तोडायला माणसं आली. हे घरातच होते. त्यांची जी चिडचिड झाली त्याला तोडच नाही. आणि आपण घरात  पाहुणे आहोत हेच ते विसरले आणि थेट पहिल्यासारखे वागू लागले. जाम संतापले!’ 
- ढवळे सर सांगत होते. थांबून मलाच त्यांनी विचारलं, आता सांगा, असं का झालं असावं?
कदाचित हे वीज तोडणे प्रकरण त्यांना सहन झालं नसावं आणि त्यांच्या संयमाचा बांध फुटला असावा.
बरोबर. आता विचारात घ्या, की जो माणूस चांगला शिकला सावरला आहे त्याच्यावरही बंधनं घातली की कधीतरी ती तोडण्याची अनावर ऊर्मी येते आणि त्यानं स्वत:ने जे ठरवलंय ते तो विसरतो आणि पुन्हा मूळच्या वागण्याकडे परततो. तुम्हाला किती तरी उदाहरणो देता येतील. नियमित व्यायाम करणं, डाएट करणं, रोज सकाळी फिरायला जाणं अशा कित्येक गोष्टी करायच्या असं स्वत:वर अनेकजण बंधन घालून घेतात. पण कधी कंटाळा, कधी आळस, कधी घरी पाहुणो आले म्हणून त्या नियमात खंड पडतो. आणि काही दिवसांनी आपण काय ठरवलं होतं तेसुद्धा विसरून जायला होतं.
ही सामान्य माणसाची नित्य कथा! तर व्यसनाधीन झालेल्या माणसाला त्याच्यावरची बंधनं पाळता पाळता नाकीनऊ येतात आणि आपण आजारी व्यक्ती आहोत, आपल्या मेंदूत मोठय़ा प्रमाणात बदल झाले आहेत हे विसरून तो नियम तोडण्याला योग्य अशी परिस्थिती निर्माण करतो.
सर्व व्यसनी माणसांचे तीन महत्त्वाचे शत्रू असतात. काम, क्रोध आणि मोह. या प्रत्येक भावनेशी त्याचं एक प्रकारचं नातं असतं आणि ते मेंदूत कोरलं गेलेलं असतं. त्यामुळे जरा बारीकशी ठिणगी पडायचा अवकाश की न आवरता येणारा मोह येतोच पुढे. आणि मग पुन्हा ‘ये रे माङया  मागल्या..’ अशी अवस्था होते.
पण मग ही शक्यता सगळ्याच माणसांबाबत खरी म्हणायला हवी. ग्रामीण भागातून आलेल्या, कमी शिकलेल्या माणसांचं असंच होत असेल; फक्त शिकल्यासवरल्यांचंच जास्त होतं असं कसं म्हणता येईल? - माझा भाबडा प्रश्न.
आपल्याकडे ग्रामीण भागात अनेक माळकरी असतात. कुटुंबात वडीलधारी माणसांची थोडी का होईना जरब असते. काही महिने जर ते व्यसनमुक्त राहिले तर व्यसनमुक्त जीवनाचा आनंद त्यांना मिळतो. आणि त्याला ते सरावतात. तसंच गावाकडे बहुतेक सर्व माणसं एकमेकांना ओळखतात. त्यांचाही अप्रत्यक्ष दबाव असतो. अर्थात सगळ्याच घरी हे वातावरण असतंच असं नाही. पण असतं बहुतांश हे खरं.
पण शहरी भागात प्रलोभनं जास्त असतात. पंचतारांकित हॉटेलपासून हातभट्टीपर्यंत सगळे पर्याय उपलब्ध असतात. शहरी भागातल्या महिलाही काही दारूविरोधी आंदोलनं वगैरे करताना दिसत नाहीत. आणि मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग यांची व्यसनं दाबून ठेवली जातात. त्यामुळे बाहेरून मदत मिळण्याचे प्रमाणही कमी, तसे मार्गही ते शोधत नाहीत.
विभक्त कुटुंब व्यवस्था, दारूची सहज उपलब्धी, घरच्यांचा आजार झाकायचे केविलवाणो प्रयत्न, हल्ली सगळेच पितात हा वाढता सामाजिक दृष्टिकोन, अनेक ठिकाणी दारू ही प्रतिष्ठेचा अपरिहार्य भाग, कार्पोरेट क्षेत्रतल्या साप्ताहिक पाटर्य़ा या सा:यांत आता पुरुषच काय महिलांमध्येही व्यसन करण्याचं प्रमाण वाढत आहे. अशा मोहमयी दुनियेत स्वत: व्यसन न करण्याचा इरादा किती अवघड असेल, आणि अनेकांचा वारंवार मोडूनही पडत असेल का?
विचार करायला हवा.
 
व्यसन सुटत का नाही?
*व्यसन हा एक आजार आहे आणि तो आपल्याला झाला आहे हे व्यसनी मंडळी सोयीस्करपणो विसरतात.
*स्वत:वर बरीच बंधने घालणं त्यांना जमत नाही.
*शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात रिकव्हरीचं प्रमाण जास्त असतं. याचे मुख्य कारण त्यांची उपचारांवर श्रद्धा असते.
*शहरी आणि निम-शहरी भागात प्रायव्हसीच्या कल्पनेमुळे इतर सामाजिक दबाव कमी असतो.
*मोहाच्या क्षणांना आवरणं आणि स्वत:ला सावरणं हे व्यसनमुक्तीचं मुख्य सूत्र आहे.
 
 
- मनोज कौशिक 
सहकार्य- मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणो 
 

 

Web Title: Social drink pots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.