...तर वर्षा सहलीचा आनंद होईल द्विगुणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:25 AM2019-06-30T00:25:25+5:302019-06-30T00:26:14+5:30

मान्सूनच्या जलधारांचा वर्षाव होऊ लागला आहे. येत्या काही दिवसांत वसुंधरेला जणू हिरवा शालूचा साज चढलेला पहावयास मिळेल. याबरोबरच पावसाळी पर्यटनाचे वेध लागण्यास सुरुवात होईल. वर्षा सहलीचा आनंद लुटतान्ाां नेमकी काय खबरदारी घ्यावी,

 ... then the year will enjoy the trip of diploid | ...तर वर्षा सहलीचा आनंद होईल द्विगुणित

...तर वर्षा सहलीचा आनंद होईल द्विगुणित

Next

मान्सूनच्या जलधारांचा वर्षाव होऊ लागला आहे. येत्या काही दिवसांत वसुंधरेला जणू हिरवा शालूचा साज चढलेला पहावयास मिळेल. याबरोबरच पावसाळी पर्यटनाचे वेध लागण्यास सुरुवात होईल. वर्षा सहलीचा आनंद लुटतान्ाां नेमकी काय खबरदारी घ्यावी, याबाबत राज्य पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे यांच्याशी साधलेला संवाद ...
वर्षा सहलीसाठी कोणत्या परिसराची निवड करता येईल?
पावसाळा म्हटला की, सर्वदूर निसर्गाचे वेगळेच मनमोहक रूपडे पहावयास मिळते. सर्वत्र हिरवळ, सरींचा वर्षाव, डोंगरांवरुन वाहणाऱ्या जलधारा असे वातावरण नाशिक जिल्ह्यात नक्कीच अनुभवता येणार आहे. यासाठी ‘वीकेण्ड ट्रीप’चा बेत आखण्यास हरकत नसावी. गंगापूर धरणापासून ते त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी या तालुक्यांमध्ये भटकंतीला प्राधान्य द्यावे. भावली, अंजनेरी, पेगलवाडी-पहिणे, वैतरणा, घाटनदेवी, भंडारदरा, कसारा जव्हार, मोखाडा या भागांना भेटी देता येतील.
पावसाळी पर्यटन करताना काय खबरदारी घ्यावी?
पावसाळी हंगामातील पर्यटन करताना खबरदारी नक्कीच घ्यायला हवी. यामध्ये प्रामुख्याने घरातून निघण्यापूर्वी आपल्या वाहनांची आवश्यक ती तपासणी गरजेची आहे. ‘वाहन व्यवस्थित तर जीवन सुरक्षित’ याचा विसर पडू देऊ नये. तसेच पर्यटनस्थळांवर पोहचल्यानंतर विशेषत: धबधबे, घाटमार्ग, धरण परिसरांत बेभानपणे वर्तन अजिबात अपेक्षित नाही. प्रत्येकाने स्वयंशिस्त बाळगावी. आपल्यामुळे कोणाच्या आनंदावर पाणी फिरणार नाही, याची काळजी घ्यावी. अतिउत्साहीपणा प्रत्येकाने टाळायला हवा. सूचना फलकांच्या संदेशाकडे दुर्लक्ष अजिबात करू नये. पर्यटनस्थळांवर स्वच्छता राखावी, मद्यप्राशनासाठी पावसाळी पर्यटनाचा बेत आखणे धोक्याचे ठरेल.
आपत्कालीन परिस्थितीत काय करावे?
पावसाळी पर्यटनाला बाहेर पडताना सोबत पॉवरबॅक ठेवावी जेणेकरून मोबाइल बंद पडणार नाही. पर्यटन करताना कोठे काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आपल्यासारख्याच त्या पर्यटकांनाही मदतीचा हात द्यावा. मोबाइल नेटवर्क मिळत नसले तरी आपत्कालीन १००, १०१, १०८ हे क्रमांक डायल होतात. त्यावरून निश्चित स्वरूपाची मदत मिळवावी. नेटवर्क असल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. अपघातांच्या घटनांकडे दुर्लक्ष करू नये.
धबधब्यांचे सौंदर्य क से न्याहाळावे?
पावसाळ्यात धबधबे ओसंडून वाहतात. जिल्ह्यांत धबधब्यांची संख्या अधिक आहे. धबधब्यांचे रूपडे लांब अंतरावरून डोळ्यांत साठवावे. धबधब्यांजवळ जाणे कटाक्षाने टाळावे.
पावसाळी पर्यटनाचा आनंद नागरिकांनी अवश्य लुटावा; मात्र हा आनंद लुटताना आपण बेभानपणे वागणार नाही ना? या प्रश्नाचे उत्तर स्वत:ने स्वत:ला विचारावे आणि त्यानुसार निर्णय घ्यावा. पावसाळी पर्यटनासाठी जाताना बेभान होऊन चालणार नाही. बेभानपणे पर्यटनाच्या नावाखाली केले जाणारे वर्तन निसर्ग, पर्यावरणासह स्वत:च्या जिवालाही घातक ठरणारे आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटनात सतर्कता बाळगणे तितकेच गरजेचे.
‘सेल्फी’साठी आटापिटा नको
जुलै आणि आॅगस्ट हे दोन महिने अर्थात आषाढ अन् श्रावण या मराठी महिन्यांत पावसाळी पर्यटनाची संधी उपलब्ध होणार आहे. पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटतांना मद्यप्राशनाचा मोह आवर्जून टाळावा तसेच ‘सेल्फी’ घेण्यासाठी आटापिटा करू नये, जेणेकरून आपली व आपल्या मित्रपरिवाराची सुरक्षा धोक्यात येणार नाही. पावसाला सुरूवात झाली असून, जुलैच्या दुसºया आठवड्यापासून निसर्गाचे रूपडे पालटलेले दिसून येण्यास सुरूवात होईल.

Web Title:  ... then the year will enjoy the trip of diploid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.