येवल्यात दुष्काळाच्या तीव्र झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:42 AM2019-03-14T00:42:03+5:302019-03-14T00:43:07+5:30

दुष्काळाचे दृष्टचक्र येवलेकरांच्या पाचवीलाच पुजलेले आहे. अत्यल्प पावसामुळे संपूर्ण तालुका दुष्काळाने होरपळत आहे. दररोज दुष्काळाच्या झळा तीव्र होत असल्याने शेतकरी, शेतमजूर ,सर्वसामान्य नागरिक मरण कळा सोसत आपला दिवस पुढे ढकलत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

Due to severe drought in Yeola | येवल्यात दुष्काळाच्या तीव्र झळा

येवल्यात दुष्काळाच्या तीव्र झळा

Next

पाटोदा : दुष्काळाचे दृष्टचक्र येवलेकरांच्या पाचवीलाच पुजलेले आहे. अत्यल्प पावसामुळे संपूर्ण तालुका दुष्काळाने होरपळत आहे. दररोज दुष्काळाच्या झळा तीव्र होत असल्याने शेतकरी, शेतमजूर ,सर्वसामान्य नागरिक मरण कळा सोसत आपला दिवस पुढे ढकलत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
खरीप व रब्बी हंगाम वाया गेल्याने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. पाऊस न पडल्यामुळे नदी, नाले, साठवण बंधारे यांच्यात थेंबभर पाणीही साचले नाही. विहिरी, कूपनलिका कोरड्यापडल्या तर बोअरवेल, हातपंप, कूपनलिकांनी केव्हाच माना टाकल्यामुळे सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. माणसांबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच चाऱ्याच्या प्रश्नानेही उग्र रूप धारण केले आहे. पशुपालकांना जनावरे जागविण्याचा मोठा प्रश्न पडला आहे. अत्यल्प कामांमुळे शेती ओस पडल्याने हातावर पोट भरणाऱ्या मजुरांच्या हाताना काम नसल्याने रोजगाराअभावी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
येवल्याच्या उत्तर-पूर्व भागात तर भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील सर्वच स्रोत कोरडे ठणठणीत आहे. पन्नासच्या वर गावे व तीस वाड्या वस्त्यांना पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. या गावातील नागरिकांना अत्यल्प पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. शासनाने येवला तालुक्यातील काही गावे दुष्काळी म्हणून घोषित केलेली आहेत. मात्र अद्याप या गावांना दुष्काळाच्या कोणत्याही सोयी सुविधा अथवा दुष्काळी कामे सुरू न केल्यामुळे या भागातील नागरिकांना व मजुरांना काम नसल्यामुळे हे मजूर रोजगाराच्या शोधात इतर जिल्ह्यात तसेच राज्यात जात असल्याने गावे ओस पडू लागली आहेत. मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी मजुरांच्या हातांना गावातच रोजगार उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आहे.
दुष्काळाशी झगडत जगण्याची बेरीज मांडताना अस्मानी-सुलतानी संकटाची मालिका शेतकऱ्यांसह मजुरांची जगण्याची लढाई अपयशी ठरत आहे. शासनाने या भागात चारा छावण्या सुरू कराव्यात अथवा चारा उपलब्ध करून दिल्यास शेतकºयांना दिलासा मिळेल.
यंदा पावसाचे प्रमाण कमी असूनही तालुक्यातील काही भागातील शेतकºयांनी प्रतिकूल हवामानाचा फायदा उठवत शेतात नगदी पीक म्हणून कांदा उत्पादन घेतले त्यासाठी मोठा खर्च केला; मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. कांदा विकून आलेल्या पैशात केलेला खर्चही वसूल झाला नाही. द्राक्ष व इतर शेतमालाचीही तीच अवस्था झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

Web Title: Due to severe drought in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.