हरणगाव धरणात बुडून 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 10:50 AM2019-06-10T10:50:11+5:302019-06-10T11:02:40+5:30

हरणगाव जवळ असलेल्या धरणात अंघोळीसाठी उतरलेल्या पाच मुली बुडाल्याची घटना समोर आली आहे. पाचपैकी एका 12 वर्षीय मुलीचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे.

12-year-old girl dies due to drowning in Harangaon dam | हरणगाव धरणात बुडून 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

हरणगाव धरणात बुडून 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

Next
ठळक मुद्देहरणगाव जवळ असलेल्या धरणात अंघोळीसाठी उतरलेल्या पाच मुली बुडाल्याची घटना समोर आली आहे. पाचपैकी एका 12 वर्षीय मुलीचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे. मुलींना बुडताना पाहून जवळच असलेल्या 3 लहान मुलांना चार मुलींना वाचवण्यात यश आलं.

पेठ (नाशिक) - हरणगाव जवळ असलेल्या धरणात अंघोळीसाठी उतरलेल्या पाच मुली बुडाल्याची घटना समोर आली आहे. पाचपैकी एका 12 वर्षीय मुलीचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे. मुलींना बुडताना पाहून जवळच असलेल्या 3 लहान मुलांना चार मुलींना वाचवण्यात यश आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, आसरबारी येथील जयश्री कमलाकर भुसारे, साक्षी कमलाकर भुसारे (14), ज्योती तुकाराम जाधव (12), अर्चना तुकाराम जाधव (16) व दीक्षा तुकाराम जाधव (11) या पाच मुली हरणगाव येथील धरणात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुऊन वाळत टाकल्यानंतर पोहण्याची इच्छा झाल्याने पाचही मुलींनी धरणात उडी मारली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यापैकी साक्षी भूसारे व ज्योती जाधव बुडू लागल्या. मुलींचा आरडा ओरडा ऐकून परिसरातच असलेल्या 3 मुलांनी घटनास्थळी धाव घेतली. जीवाची पर्वा न करता या मुलींना पाण्याबाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. साक्षीला वाचवण्यात मुलांना यश आले. मात्र ज्योती तुकाराम जाधव ही पाण्याखाली गेल्याने वाचवणे कठीण झाले. 

घटनेची माहिती मिळताच हरणगाव, आसरबारी सह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत शोध कार्य सुरू केले. सायंकाळपर्यंत प्रयत्न करून रात्री आठच्या सुमारास ज्योतीचा मृतदेह हाती लागला.याबाबत पोलीस पाटील गेणुदास जाधव यांनी पेठ पोलिसांना दिलेल्या खबरीवरून पोलीस पथकाने पट्टीच्या पोहणाऱ्या युवकांना पाचारण केले. ज्योती जाधव या  मुलीचे वडील तुकाराम जाधव हे कल्याण येथे पोलीस दलात कार्यरत आहेत. याबाबत पेठ पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहेत.

तिघांनी केले शर्थीचे प्रयत्न

धरणात मुली बुडत असल्याचे लक्षात येताच याच परिसरात असलेले देवानंद मुरलीधर गायकवाड, हर्षद रघूनाथ जाधव व पंडीत रोहीदास गायकवाड या 10-12 वर्षीय मुलांनी  धरणाकडे धाव घेऊन जीवाची पर्वा न करता पाण्यात सुर मारला. एका मुलीला वाचवत पाण्याबाहेर काढण्यात त्यांना यश आले मात्र ज्योती जाधव हिचा दुर्देवी मृत्यू झाला. सदरची घटना समजल्यावर आसरबारी गावावर शोककळा पसरली यापैकी साक्षी व जयश्री या दोन्ही दिंडोरी तालुक्यातील सादराळे गावच्या असून सुटीनिमित आसरबारी येथे मामाच्या गावी आल्या होत्या.
 

Web Title: 12-year-old girl dies due to drowning in Harangaon dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.