मागील भानगडीच्या वादातून दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:56 PM2017-09-07T12:56:24+5:302017-09-07T12:56:24+5:30

अनर्थ टळला : जमाव नियंत्रणासाठी अश्रुधुराचा वापर

Palefish from the past | मागील भानगडीच्या वादातून दगडफेक

मागील भानगडीच्या वादातून दगडफेक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मागील भानगडीच्या वादातून नवनाथ टेकडी भागात दोन गटात हाणामारी होऊन दगडफेक झाल्याची घटना गुरुवारी उत्तररात्री अडीच वाजता घडली. यावेळी जमावाला नियंत्रीत करण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या दोन नळकांडय़ा फोडल्या.पोलिसांनी 17 जणांना ताब्यात घेतले आहे. 
नवनाथ टेकडी भागात 21 ऑगस्ट रोजी दोन गटात किरकोळ कारणावरून हाणामारी झाली होती. त्याचे पडसाद गुरुवारी उत्तररात्री उमटले. बुधवारी रात्री दोन्ही गटात धुसफूस सुरू होती. रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास किरकोळ दगडफेक झाल्यानंतर हाणामारी झाली. परिणामी दोन्ही गटातर्फे तुफान दगडफेक करण्यात आली. पोलीस दल वेळीच पोहचल्याने पुढील अनर्थ टळला. परंतु जमावाला नियंत्रीत करण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या दोन नळकांडय़ा फोडल्या.
याप्रकरणी पोलिसांनी 17 जणांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही गट फिर्याद देण्यासाठी दुपार्पयत आलेले नव्हते. त्यामुळे पोलिसांतर्फेच दोन्ही गटाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती नंदुरबार शहर पोलिसांतर्फे देण्यात आली.    

Web Title: Palefish from the past

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.