सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसचे ‘दुष्काळी अस्त्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 01:03 AM2019-05-12T01:03:36+5:302019-05-12T01:04:43+5:30

राज्याच्या बहुतांश भागात तीव्र स्वरुपाची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाय योजण्यात राज्य सरकार कमी पडत आहे, असा ठपका ठेवत काँग्रेसने सरकारची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी विदर्भातील दुष्काळी भागाचा दौरा करण्यासाठी काँग्रेस आमदार व पदाधिकाऱ्यांची एक समितीच नेमली आहे. विशेष म्हणजे या समितीला दौरा केल्यानंतर आपला अहवालही प्रदेश काँग्रेसकडे सादर करायचा आहे.

Congress has 'drought-weapons' to encircle Government | सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसचे ‘दुष्काळी अस्त्र’

सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसचे ‘दुष्काळी अस्त्र’

Next
ठळक मुद्देविदर्भातील दौऱ्यासाठी नेमली समिती : दौऱ्याचा अहवाल प्रदेशकडे द्यावा लागेल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याच्या बहुतांश भागात तीव्र स्वरुपाची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाय योजण्यात राज्य सरकार कमी पडत आहे, असा ठपका ठेवत काँग्रेसनेसरकारची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी विदर्भातील दुष्काळी भागाचा दौरा करण्यासाठी काँग्रेस आमदार व पदाधिकाऱ्यांची एक समितीच नेमली आहे. विशेष म्हणजे या समितीला दौरा केल्यानंतर आपला अहवालही प्रदेश काँग्रेसकडे सादर करायचा आहे.
गेली दोन महिने सत्ताधाऱ्यांसह विरोधकही लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. आचारसंहिताही लागू आहे. यामुळे दुष्काळी परिस्थिती निवारणाकडे काही अंशी दुर्लक्ष झाले. राज्यातील काही भागातील दुष्काळी चित्र चिंताजनक झाले आहे. सरकारचे मंत्री घोषणा करीत आहेत, मात्र प्रत्यक्षात उपाययोजना होताना दिसत नाही. ही बाब हेरून काँग्रेसने दुष्काळाच्या मुद्यावरून सरकारची कोंडी करण्याची तयारी चालविली आहे. पक्षातर्फे आता दुष्काळी भागाचे दौरे केले जाणार आहेत. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी विदर्भासाठी एक समिती नेमली असून ही समिती तालुक्यातील दुष्काळी भागांना भेट देईल. या समितीच्या दौऱ्यात संबंधित जिल्ह्यातील अध्यक्षांनाही सहभागी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अशी आहे विदर्भाची समिती
 विदर्भाची समिती विधानसभेतील उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्याअध्यक्षतेखाली नेमण्यात आली आहे. तीत माजी मंत्री वसंत पुरके, राजेंद्र मुळक, आ. वीरेंद्र जगताप, रणजित कांबळे, सुनील केदार, राहुल बोंद्रे, अमर काळे, नतिकोद्दीन खतीब, अमित झनक व समिती समन्वयक म्हणून प्रवक्ते अतुल लोंढे यांचा समावेश आहे.
या मुद्यांवर असेल फोकस

  •  काँग्रेसची समिती दुष्काळी दौरा करताना नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची परिस्थिती समजून घेईल.
  •  जनवरांच्या पाण्याची व चाऱ्याची परिस्थिती पाहील.
  • चारा छावण्यांना भेटी देईल.
  •  जनतेसाठी रोजगार उपलब्ध आहेत का, याची पाहणी करील.
  •  सर्व पाहणीनंतर समिती जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन उपाययोजना करण्याची मागणी करेल.

Web Title: Congress has 'drought-weapons' to encircle Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.