जळगाव जिल्ह्यातील ५ हजार हेक्टरवर बोंडअळीचा जोरदार हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 10:17 PM2018-08-10T22:17:01+5:302018-08-10T22:19:17+5:30

जिल्ह्यात २९ जुलै पासून तब्बल १३ दिवस पावसाने खंड दिल्याने पिकांवरील किडरोगांमध्ये वाढ झाली असून कपाशीवरील बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे.

Bundli violation of 5000 hectares of Jalgaon district | जळगाव जिल्ह्यातील ५ हजार हेक्टरवर बोंडअळीचा जोरदार हल्ला

जळगाव जिल्ह्यातील ५ हजार हेक्टरवर बोंडअळीचा जोरदार हल्ला

Next
ठळक मुद्देपावसाचा खंड पडल्याने वाढले प्रमाणआर्थिक नुकसान होण्याची शक्यता अधिकपिकांवरील किडरोगांमध्ये झाली वाढ

जळगाव : जिल्ह्यात २९ जुलै पासून तब्बल १३ दिवस पावसाने खंड दिल्याने पिकांवरील किडरोगांमध्ये वाढ झाली असून कपाशीवरील बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. ५ हजार हेक्टर क्षेत्रावरील प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीवर गेला असल्याची नोंद कृषी विभागाच्या दप्तरी झाली आहे.
मागील वर्षी बोंडअळीमुळे कपाशीचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे कपाशीच्या ५ लाख १० हजार ९१३ हेक्टर क्षेत्रापैकी यंदा ४ लाख ८६ हजार ७६१ हेक्टर क्षेत्रावरच म्हणजेच ९५.२७ टक्के क्षेत्रावरच यंदा कपाशीची लागवड झाली आहे. तसेच जनजागृतीही सुरू आहे. मात्र तरीही कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे.

Web Title: Bundli violation of 5000 hectares of Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.