ऐन पावसाळ्यातच जुई धरण आटले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:46 AM2018-08-10T00:46:06+5:302018-08-10T00:46:29+5:30

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात केवळ २ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याने परिसरातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

Only 2 % water in Jui Dam | ऐन पावसाळ्यातच जुई धरण आटले !

ऐन पावसाळ्यातच जुई धरण आटले !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात केवळ २ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याने परिसरातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
या धरणावर भोकरदन शहर, देहेड, कठोरा बाजार, सुरंगळी, वाडी, कल्याणी, करंजगाव, मुर्तड, दगडवाडी, तळणी, भायडी, निंम्बोला, मलकापूर, मनापूर, विरेगाव, बाभुळगाव, सिपारा बाजार, वरुड, पिंपळगाव यासह इ. गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु, यावर्षी पावसाने दगा दिल्याने धरणात पाण्याची आवक आली नाहीच. त्यामुळे धरणात केवळ दोन टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, हा पाणीसाठा फ्कत पंधरा दिवस पुरेल, इतकाच आहे. परिणामी ज्या गावांना या धरणातून पाणी पुरवठा केला जातो. त्या गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
यावर्षी पाऊस न आल्याने धरणात पाण्याचा एकही थेंब आला नाही. मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात या धरणात १२.५ फूट म्हणजेच ६५ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र, यावर्षी हे धरण १०० टक्के कोरडे होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात परिसरात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, धरणात मागील काही दिवस विद्युत पंप सुरु होते. याबाबत शाखा अभियंता पी. सी. मसने म्हणाले की, धरणात आता कोणताही विद्युत पंप सुरु नाही.

Web Title: Only 2 % water in Jui Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.