स्मार्टफोनचा अतिवापर आरोग्यासाठी घातकच!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 08:10 AM2018-03-27T08:10:43+5:302018-03-27T13:40:43+5:30
आज संवादाचे प्रभावी माध्यम म्हणून स्मार्टफोनचा वापर प्रत्येकजण करत आहे. विशेषत: रिचार्ज, लाईट बिल, पैसे ट्रान्सफर, सोशल मीडिया, इंटरनेट आदींचा वापरासाठीही स्मार्ट फोनच उपयोगी पडत आहे.
Next
आ संवादाचे प्रभावी माध्यम म्हणून स्मार्टफोनचा वापर प्रत्येकजण करत आहे. विशेषत: रिचार्ज, लाईट बिल, पैसे ट्रान्सफर, सोशल मीडिया, इंटरनेट आदींचा वापरासाठीही स्मार्ट फोनच उपयोगी पडत आहे. मात्र स्मार्टफोन तंत्रज्ञानाचा अतिवापर आरोग्यासाठी घातक असल्याचे निदर्शनास आले आहे.
सातत्याने मोबाइलवर गुंतून राहणो शरीर आणि मनाच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम करत असल्याचे काही तज्ज्ञांनी म्हटले आहे. शिवाय स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे मेंदूचा कॅन्सर होण्याचा धोका वाढला असल्याचेही म्हटले आहे. याचा सर्वांत अधिक धोका तरुणांना असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. सतत चार वर्षे दररोज 3क् मिनिटांपेक्षा अधिक वेळ फोनवर बोलल्याने श्रवणशक्ती तर क्षीण होते, तसेच, दृष्टीवरही परिणाम होतो.
3 ते 35 वयोगटातील व्यक्तींनी स्मार्टफोनचा अतिवापर केल्यास त्यांना अल्झायमर आणि पार्किन्सन आदी मानसिक आजार उद्भवण्याची शक्यता वाढत असल्याचेही संशोधनात म्हटले आहे. शिवाय स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे किरणोत्सर्गाचं आणि प्रकृतीला धोका असलेल्या लहरींचे प्रमाण 4 % टक्क्यांनी वाढते. त्यामुळे मोबाइलचा अतिवापर करणा:यांना कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे या किरणोत्सर्गाचा परिणाम लहान मुलं आणि तरुणांवर लवकर होतो.
लहान मुलांच्या डोक्याची कवयी अतिशय पातळ असल्याने त्यामधून किरणो सहज आत जाऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. शिवाय स्मार्टफोनच्या अतिवापराने पुरुष प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. बहुतांश तरुण इअरफोनचाही जास्त वापर करतात. आपण जर 4 मिनिटांपेक्षा जास्त वेळ गाणी ऐकली तर बहिरेपणाला आमंत्रण देण्याचे लक्षण आहे, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.
अधिकाधिक वेळ इंटरनेट सफरिंग आणि गेम खेळण्यात घालवणारी किशोरवयीन मुलं उच्च रक्तदाबाच्या किंवा स्थूलतेला बळी पडत आहेत. उशाला मोबाइल ठेवून झोपणा:यांमध्ये निद्रानाशाचं प्रमाण वाढतंय.
मुलामुलींमध्ये व्यसनाधीनता, उदासीनता, स्थूलता, एकलकोंडेपणा आदी शारीरिक आणि मानसिक पातळीवरचे आजार निर्माण होतात. चुंबकीय लहरींमुळे डोळ्यांच्या आजारात वाढ हेत असून, मोतिबिंदूचे प्रमाण वाढत आहे. सतत मोबाइल खिशात घेऊन फिरणा:या पुरुषांमध्ये वंधत्वाच्या तक्रारी निर्माण होत आहेत.
सातत्याने मोबाइलवर गुंतून राहणो शरीर आणि मनाच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम करत असल्याचे काही तज्ज्ञांनी म्हटले आहे. शिवाय स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे मेंदूचा कॅन्सर होण्याचा धोका वाढला असल्याचेही म्हटले आहे. याचा सर्वांत अधिक धोका तरुणांना असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. सतत चार वर्षे दररोज 3क् मिनिटांपेक्षा अधिक वेळ फोनवर बोलल्याने श्रवणशक्ती तर क्षीण होते, तसेच, दृष्टीवरही परिणाम होतो.
3 ते 35 वयोगटातील व्यक्तींनी स्मार्टफोनचा अतिवापर केल्यास त्यांना अल्झायमर आणि पार्किन्सन आदी मानसिक आजार उद्भवण्याची शक्यता वाढत असल्याचेही संशोधनात म्हटले आहे. शिवाय स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे किरणोत्सर्गाचं आणि प्रकृतीला धोका असलेल्या लहरींचे प्रमाण 4 % टक्क्यांनी वाढते. त्यामुळे मोबाइलचा अतिवापर करणा:यांना कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे या किरणोत्सर्गाचा परिणाम लहान मुलं आणि तरुणांवर लवकर होतो.
लहान मुलांच्या डोक्याची कवयी अतिशय पातळ असल्याने त्यामधून किरणो सहज आत जाऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. शिवाय स्मार्टफोनच्या अतिवापराने पुरुष प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. बहुतांश तरुण इअरफोनचाही जास्त वापर करतात. आपण जर 4 मिनिटांपेक्षा जास्त वेळ गाणी ऐकली तर बहिरेपणाला आमंत्रण देण्याचे लक्षण आहे, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.
अधिकाधिक वेळ इंटरनेट सफरिंग आणि गेम खेळण्यात घालवणारी किशोरवयीन मुलं उच्च रक्तदाबाच्या किंवा स्थूलतेला बळी पडत आहेत. उशाला मोबाइल ठेवून झोपणा:यांमध्ये निद्रानाशाचं प्रमाण वाढतंय.
मुलामुलींमध्ये व्यसनाधीनता, उदासीनता, स्थूलता, एकलकोंडेपणा आदी शारीरिक आणि मानसिक पातळीवरचे आजार निर्माण होतात. चुंबकीय लहरींमुळे डोळ्यांच्या आजारात वाढ हेत असून, मोतिबिंदूचे प्रमाण वाढत आहे. सतत मोबाइल खिशात घेऊन फिरणा:या पुरुषांमध्ये वंधत्वाच्या तक्रारी निर्माण होत आहेत.