लग्नानंतर पहिली पंचमी ठरली अखेरची, माहेरी आलेल्या विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू

By चेतनकुमार धनुरे | Published: August 21, 2023 03:53 PM2023-08-21T15:53:52+5:302023-08-21T15:54:06+5:30

घरासमोरील अंगणात सर्वजण झोपलेले असताना विवाहितेस चावला साप

After the marriage, the first Panchami was the last, the married girl died of snakebite when he came home | लग्नानंतर पहिली पंचमी ठरली अखेरची, माहेरी आलेल्या विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू

लग्नानंतर पहिली पंचमी ठरली अखेरची, माहेरी आलेल्या विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू

googlenewsNext

धाराशिव : लग्नानंतर पहिल्याच पंचमीला माहेरी आलेल्या एका विवाहितेचा साप चावून मृत्यू झाल्याची घटना धाराशिव तालुक्यातील वरवंटी येथे घडली आहे. रविवारी सायंकाळी या विवाहितेवर लातूर येथील तिच्या सासरी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

धाराशिव तालुक्यातील वरवंटी येथील सानिका हिचा काही महिन्यांपूर्वीच लातूर शहरात राहणाऱ्या उमेश पवार या तरुणाशी विवाह झाला होता. लग्नानंतरची पहिलीच पंचमी असल्याने तीन दिवसांपूर्वीच तिला लातूर येथून तिच्या वडिलांनी माहेरी वरवंटीला बोलावून आणले. दरम्यान, घरातील सर्वजण हे शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे घरासमोरील अंगणात झोपले होते. रविवारी पहाटे दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास सानिका हिला पायास काहीतरी चावल्याची जाणीव झाली.

तिने ही बाब वडील व भावाला सांगितल्यानंतर लागलीच तिला धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. सकाळी साडेसहा वाजेपर्यंत ती सर्वांना बोलत होती. मात्र, यानंतर प्रकृती अधिक ढासळत जावून तिने रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. शवविच्छेदन झाल्यानंतर मयत सानिका हिच्यावर रविवारी सायंकाळी लातुरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: After the marriage, the first Panchami was the last, the married girl died of snakebite when he came home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.