आगीत गोठा जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:27 PM2018-03-23T23:27:58+5:302018-03-23T23:27:58+5:30

राजुरा तालुक्यातील वरोडा गावालगत असलेल्या गोठ्याला आग लागल्याची घटना गुरूवारी दुपारी ३:३० वाजता घडली. या आगीत अंदाजी एक लाखांचे नुकसान झाले आहे.

The fire burned in the fire | आगीत गोठा जळून खाक

आगीत गोठा जळून खाक

Next
ठळक मुद्देवरोडा येथील घटना : एका लाखाच्या नुकसानीचा अंदाज

आॅनलाईन लोकमत
गोवरी/बाखर्डी : राजुरा तालुक्यातील वरोडा गावालगत असलेल्या गोठ्याला आग लागल्याची घटना गुरूवारी दुपारी ३:३० वाजता घडली. या आगीत अंदाजी एक लाखांचे नुकसान झाले आहे.
चुलीतील राख शेणखताचा ढिगाऱ्यावर टाकल्याने आग लागल्याची माहिती आहे. मात्र ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत गोठ्याकडे धाव घेतली. बैलजोडी व इतर जनावरांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान, राजुरा नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. वेळातच अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला.
अग्निशामक दल आणि ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवण्यात यश आले. मात्र गोठा जळून खाक झाला. यात विजय बंसुले यांचे गोठ्यात असलेले पाईप, शेती उपयोगी अवजारे आणि तणस, वैरण जळून खाक झाले. १ लाख रूपयाच्या नुकसानीचा अंदाज असून नुकसान भरपाईची मागणी त्यांनी केली आहे

Web Title: The fire burned in the fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.