शेतकऱ्याची जिल्हा प्रशासनाकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:56 AM2018-08-10T00:56:22+5:302018-08-10T00:59:37+5:30

भंडारा तालुक्यातील राजेदहेगाव येथील एका शेतकºयाने आपल्यावर होत असलेल्या अन्याया विरुद्ध जिल्हा प्रशासनकडे धाव घेत पालकमंत्री आणि आमदारांना निवेदन दिले. संबधितावर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून केली आहे.

The farmer ran towards the district administration | शेतकऱ्याची जिल्हा प्रशासनाकडे धाव

शेतकऱ्याची जिल्हा प्रशासनाकडे धाव

Next
ठळक मुद्देराजेदहेगावचा पाणी प्रश्न : पालकमंत्री व आमदार, जिल्हाधिकाºयांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : भंडारा तालुक्यातील राजेदहेगाव येथील एका शेतकºयाने आपल्यावर होत असलेल्या अन्याया विरुद्ध जिल्हा प्रशासनकडे धाव घेत पालकमंत्री आणि आमदारांना निवेदन दिले. संबधितावर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून केली आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर राजेदहेगाव आहे. तेथील पाणी प्रश्नासाठी गावकरी विरुद्ध शेतकरी असा संघर्ष सुरु आहे. सदर पाणी प्रश्न कसा सुटेल याची गावकरी प्रतीक्षा करीत आहे. या प्रश्नावरून ग्रामपंचायतही हतबल झालेली दिसत आहे. गावकºयांपुढे ग्रामपंचायतची एकही चालत नाही. परिणामी ग्रामपंचायत कामकाज ठप्प झालेले दिसून येते. दरम्यान अन्यायग्रस्त शेतकरी नारायण ढोबळे यांची राजेदहेगाव इंदिरानगर पांदन रस्त्यालगत गट क्रमांक १८३ मध्ये उन्हाळ्यात १७ बोअर खोदले होते. त्यातील एकाही बोअरला पाणी लागले नाही. दरम्यान दोन ते तीन महिन्यापूर्वी १८ वी बोअर १५६ फुट खोल खोदली. त्यावेळी तीन इंच पाणी लागले होते. मुबलक पाणी लागल्याने ग्रामपंचायत कमेटी व काही गैरकायद्याच्या मंडळींनी विंधन विहिर बंद पाडण्याचे षडयंत्र रचले असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. यापूर्वीही गावाला ५० वर्षापासून हिरेखण यांच्या विहिरीवरून पाणीपुरवठा होत होता. त्यातही राजकीय असामाजिक तत्वांनी व्यत्यय आणलेला आहे.
ग्रामपंचायत विंधन विहिर गाव फिडरवर असल्याने २४ तास विद्युत पुरवठा सुरु असतो. गावातील पाण्याची टाकी ग्रामपंचायतच्या विंधन विहिरीद्वारे ९ ते १० तासात पूर्ण भरते. मात्र गावातील काही असामाजिक लोकांनी सरपंचास सोबत घेऊन ग्रामपंचायत विंधन विहिर बंद केले. त्याला कुलूप लावून गावात कृत्रीम पाणी टंचाई निर्माण केल्याचा आरोप या निवेदनात केला आहे.
प्रशासनाने पडताळणी केल्यास यातील सत्य समोर येईल. दरम्यान विंधन विहिरीला गावातील एका राजकीय पुढाºयाद्वारे नुकसान करणार या आशयाचे निवेदन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तुमसरचे आमदार चरण वाघमारे, जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांना दिले आहे. आता या प्रकरणी काय निर्णय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बोअर वेलला कुलुप असल्याने गावकºयांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तत्काळ ही समस्या सोडविण्याची गरज आहे. अन्याथा गावात असंतोष निर्माण होऊन शांतता भंग पावण्याची शक्यता आहे.

Web Title: The farmer ran towards the district administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.