खैरेंच्या स्मरणशक्तीवर भाजपचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:32 AM2018-05-19T00:32:54+5:302018-05-19T00:34:05+5:30

शिवसेनेने विश्वासात न घेता एकट्यानेच दंगलीच्या पार्श्वभूमीवर हिंदू रक्षणाचा नारा देत पुकारलेल्या मोर्चामुळे संतप्त झालेल्या भाजपने आज खा.चंद्रकांत खैरे यांना टीकेचे लक्ष्य करीत त्यांच्या स्मरणशक्तीवर हल्ला चढविला.

BJP attacks on Khairn's memory | खैरेंच्या स्मरणशक्तीवर भाजपचा हल्ला

खैरेंच्या स्मरणशक्तीवर भाजपचा हल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात शांतता महत्त्वाची : शिवसेनेचा मोर्चा तर, आमची मदतफेरी

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शिवसेनेने विश्वासात न घेता एकट्यानेच दंगलीच्या पार्श्वभूमीवर हिंदू रक्षणाचा नारा देत पुकारलेल्या मोर्चामुळे संतप्त झालेल्या भाजपने आज खा.चंद्रकांत खैरे यांना टीकेचे लक्ष्य करीत त्यांच्या स्मरणशक्तीवर हल्ला चढविला.
खा. खैरे यांना मुख्यमंत्र्यांवर आरोप करणे शोभत नाही. शनिवारी रात्री दंगलसदृश स्थितीत तीन वेळा माझ्या फ ोनवरून ते मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि भाजपचे कुणीही घटनास्थळी नव्हते, असा आरोप ते करीत आहेत. मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर पालकमंत्री डॉ.दीपक सावंत, गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांना त्यांनी तातडीने शनिवारी शहरात पाठविले. या सगळ्या घडामोडी माहिती असताना खा.खैरे स्मरणशक्ती गेल्यासारखे मुख्यमंत्री व भाजपवर बेताल आरोप करीत असल्याचा हल्ला आ.अतुल सावे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत चढविला. शहर विकासावर बोलावे, दंगलसदृश स्थितीत कोण होते, नव्हते यावर कशाला बोलता, असा टोलाही त्यांनी खैरेंना लगावला.
खैरेंनी भाजपला हिंदुत्व शिकवू नये, त्यांना निवडून न येण्याची भीती वाटू लागली आहे. हिंदूंच्या रक्षणाचा ठेका त्यांनी एकट्यानेच घेतलेला नाही. दंगलीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता प्रस्थापित करण्याऐवजी ते राजकारण करीत असल्याचा आरोपही भाजपने केला.
शिवसेना मोर्चा काढून राजकारण करीत आहे, त्यामुळे शहर आणखी दहा वर्षे मागे जाणार आहे. परंतु आम्ही दंगलीत ज्यांचे नुकसान झाले, त्यांना पुन्हा रोजगार, निवारा देण्यासाठी मदतफेरी काढणार असल्याचे प्रवक्ते शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, डॉ.भागवत कराड यांनी सांगितले. यावेळी अनिल मकरिये, एकनाथ जाधव, कचरू घोडके, चंद्रकांत हिवराळे आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री आणि खैरे यांच्यात विसंवाद
४पालकमंत्री डॉ.सावंत शांतता राखण्याचे आवाहन करतात. तसेच दंगलखोरांवर कारवाई करण्याच्या बाजूने बोलतात. तिकडे खैरे मुख्यमंत्र्यांना लक्ष्य बनवितात. पालकमंत्र्यांची भूमिका खैरेंना मान्य नाही, असे वाटते आहे.
४वातावरण शांत करण्याऐवजी ते भडकाविण्याचा प्रयत्न करीत आहेत. दंगलीमुळे शहराच्या विकासावर दूरगामी परिणाम होतो.
४दंगलीत दोन्ही बाजूंनी समाजकंटक कार्यरत होते. जे निर्दाेष असतील त्यांच्या बाजूने भाजप ठामपणे उभे राहील, असे बोराळकर म्हणाले.

Web Title: BJP attacks on Khairn's memory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.