कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गावरील अपघातात कल्याणचे दोघे ठार

By सचिन धर्मापुरीकर | Published: February 7, 2024 06:00 PM2024-02-07T18:00:38+5:302024-02-07T18:01:04+5:30

कोपरगाव (जि. अहमदनगर) : उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात कामानिमित्त कल्याणहून निघालेल्या दोघांवर काळाने घाला घातल्याच्या घटना बुधवारी (दि. ...

Two people from Kalyan were killed in an accident on the Samriddhi highway in Kopargaon taluk | कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गावरील अपघातात कल्याणचे दोघे ठार

कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गावरील अपघातात कल्याणचे दोघे ठार

कोपरगाव (जि. अहमदनगर) : उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात कामानिमित्त कल्याणहून निघालेल्या दोघांवर काळाने घाला घातल्याच्या घटना बुधवारी (दि. ७ फेब्रुवारी) रोजी सकाळी सात वाजता ही घटना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ते भोजडे गावादरम्यान समृद्धी महामार्गावर घडली. दोघे प्रवास करीत असलेल्या कारची पुढे असलेल्या अज्ञात वाहनास पाठीमागून धडक बसली. यात दोघांचा मृत्यू झाला. घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.

अपघाताबाबत पोलिस सूत्रांनी सांगितले की, कल्याण येथील कोळसेवाडी परिसरातील रहिवासी कल्पेश दिपक गुरव व सचिन सोपान पाटील (वय अंदाजे ३० ते ३५) हे दोघे छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात कामानिमित्त एमएच ०५ सीके ७०० क्रमांकाच्या कारने निघाले होते. त्यांची कार समृद्धी महामर्गावरून जात असताना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ते भोजडे दरम्यान असताना समोर असलेल्या अज्ञात वाहनास पाठीमागून धडकली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला होता. कल्पेश गुरव व सचिन पाटील यांचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोंचले, दोघांचे मृतदेह कोपरगाव येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत दोघांचेही नातेवाईक कोपरगावात आलेले नव्हते. गुन्हा दाखल होण्याची प्रक्रीया सुरू होती.
 

Web Title: Two people from Kalyan were killed in an accident on the Samriddhi highway in Kopargaon taluk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात