राज ठाकरेंचं रायगडावर सहकुटुंब अभिवादन; स्व. बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 02:54 PM2023-06-02T14:54:47+5:302023-06-02T14:58:26+5:30

महाराजांच्या ३०० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने तेंव्हा शिवतीर्थावर बाबासाहेब पुरंदरेंनी शिवसृष्टी आणली होती

Raj Thackeray family on Raigad; self Memories with Balasaheb Thackeray awakened | राज ठाकरेंचं रायगडावर सहकुटुंब अभिवादन; स्व. बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या

राज ठाकरेंचं रायगडावर सहकुटुंब अभिवादन; स्व. बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या

googlenewsNext

रायगड/मुंबई - ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर जाऊन मी माझं कुटुंब आणि माझ्या सहकाऱ्यांनी महाराजांना अभिवादन केलं, अशी माहिती देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली. मी उद्या येतोय, म्हणत राज यांनी गुरुवारीच यासंदर्भात माहिती दिली होती. राज यांनी कुटुंबासमवेत रायगडावर जाऊन शिवरायांचे दर्शन घेतले. तसेच, महाराष्ट्रातील जनतेला ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी, त्यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेतच्या आठवणी जागवल्या. 

महाराजांच्या ३०० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने तेंव्हा शिवतीर्थावर बाबासाहेब पुरंदरेंनी शिवसृष्टी आणली होती. तेंव्हा मी स्वर्गीय बाळासाहेबांसोबत जवळ जवळ रोज जायचो. त्यावेळेला संध्याकाळी रोज ७ वाजता शिवराज्याभिषेक सोहळा व्हायचा. तो मी दररोज बघायचो आणि तो मला तोंडपाठ झाला होता. तो क्षण होता की छत्रपती शिवाजी महाराज ह्या नावाने माझं आयुष्य व्यापलं, भारावलं, जे अजून ही तसंच आहे आणि आयुष्यभर हे मंतरलेपण राहील, अशी आठवण राज ठाकरेंनी सांगितली.  

मी अनेकदा रायगडावर गेलो आहे. प्रत्येकवेळी तिथे एक वेगळीच ऊर्जा जाणवते. पण आज जे मी अनुभवलं, ते विलक्षण होतं, असेही राज यांनी म्हटले. मी नेहमी म्हणतो शिवचरित्र वाचल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे हा सामान्यांनी घडविलेला असामान्य इतिहास आहे. मी काल म्हणलं तसं ते एक युगप्रवर्तनच होतं. आणि शिवराज्याभिषेक हा त्या युगप्रवर्तनातील अतिशय महत्वाचा टप्पा होता. ह्या हिंद भूमीच्या स्वाभिमानासाठी, स्वत्वासाठी या रयतेच्या राजाला राजसिंहासनाची, राज्याभिषेकाची नितांत गरज होती...  हा सुवर्णक्षण पुढची अगणित वर्ष ह्या हिंद भूमीला प्रेरणा देत राहील इतकी ताकद ह्या घटनेत आहे, असे राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.  

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष मनामनात घुमू दे आणि त्यांचे विचार आपल्या मराठी जनांच्या धमण्यामंधून वाहू देत, हीच इच्छा आणि हीच आजच्या दिवशी शिवचरणी प्रार्थना, राज ठाकरेंनी केली आहे. 

Web Title: Raj Thackeray family on Raigad; self Memories with Balasaheb Thackeray awakened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.