शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

सेल्फीचं वेड जीवावर बेतलं, पैनगंगेत बुडून दोघांचा मृत्यू तर एक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 16:34 IST

पैनगंगा नदीत अघोळीसाठी आल्यानंतर युवकाना तेथे एक नाव दिसली. त्या नावेला बघून सेल्फी काढण्याची इच्छा या तरुणांची झाली होती.

यवतमाळ - तालुक्यातील राजूर (गो) येथे मोहरम सणासाठी आदिलाबाद येथील 5 युवक एक दिवस आधीच आले होते. सकाळी साडे नऊ वाजता हे पाच युवक सवारीच्या बंगल्यामागे गावाला लागूनच असलेल्या पैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेले. मात्र, या अंघोळीवेळी नदीपात्रातसेल्फी घेणे या युवकांच्या जीवावर बेतलं आहे. कारण, नदीत सेल्फी घेताना पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.   

पैनगंगा नदीत अघोळीसाठी आल्यानंतर युवकाना तेथे एक नाव दिसली. त्या नावेला बघून सेल्फी काढण्याची इच्छा या तरुणांची झाली होती. या पाचही युवकांनी त्या नावेवर बसून सेल्फी काढताना नावेचा तोल जाऊन ते पाण्यात बुडाले. तिथे खोल डोह असल्याने त्यांना लवकर पाण्यातून बाहेर येणे शक्य झाले नाही. त्यापैकी शेख अर्षद (14वर्षे), शेख सुफिर सिराज (16 वर्षे), हे दोघे मृत्यू पावले तर सय्यद उमेद (18 वर्षे) हा गंभीर असल्याने त्याला मुकुटंबन येथील प्राथमिक रुग्णालयातून उपचार करून पुढील उपचारासाठी वणी येथे रेफर करण्यात आले आहे. तर यातील दोघांनी पाण्याशी संघर्ष करीत कसाबसा आपला जीव वाचविला. नदीपात्रात बुडालेले सर्वचजण तेलंगणाच्या आदिलाबद येथील रहिवासी आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी राजूर येथे मोहरम सणानिमित्त त्यांचा परिवार येतो. त्यामुळेच या वर्षीही ते मोहरमसाठी आले होते. दरम्यान, राजूरपासून हाकेच्या अंतरावरच ही घटना घडली. बाजूलाच असलेल्या मच्छिमाराने आरडा ओरड करून गावाला माहिती दिली व राजूर येथील युवकांनी तात्काळ या तिघांना मुकुटंबन प्राथमिक रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वी डाक्टरांनी दोघांना मृत घोषित केले व त्यांना झरी येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. 

टॅग्स :Selfieसेल्फीDeathमृत्यूriverनदीYavatmalयवतमाळ