शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातच लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 22:03 IST

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या राजकीय भवितव्याबाबत जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळतात. परंतु या चर्चा केवळ अफवा असून आपण यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातूनच.....

ठळक मुद्देभावना गवळींनी केला संभ्रम दूर : दिग्रस वगळता अन्य विधानसभा मतदारसंघांची दिशा ठरविणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या राजकीय भवितव्याबाबत जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळतात. परंतु या चर्चा केवळ अफवा असून आपण यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातूनच शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याचे खुद्द गवळी यांनीच स्पष्ट केले आहे.बुधवारी सायंकाळी येथील शासकीय विश्रामभवनावर भावनातार्इंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. भावनाताई यावेळी यवतमाळ-वाशिममधून लढणार नाहीत, हिंगोलीत जाणार, रिसोड विधानसभा लढणार, भाजपात जाणार या सर्व अफवाच असल्याचे भावना गवळी यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, २००९ पासून आपल्या लोकसभेतील उमेदवारीबाबत मनगढंत चर्चा रंगविल्या जातात. मात्र आपण यवतमाळ-वाशिम मतदारसंघात कायम आहोत. माझ्या लोकसभा क्षेत्रात यवतमाळ जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्र येतात. यापैकी दिग्रस-नेरमध्ये शिवसेना मजबूत आहे. उर्वरित तीन विधानसभेतही शिवसेनेने चांगली पकड घेतली आहे. यात यवतमाळ व कारंजा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. शिवसेनेतील कोणताही गट स्वत:चे हित जोपासण्यासाठी नसून पक्ष कसा बळकट होईल, याचा विचार करतो. एखाद्या पदाबाबत मंत्र्यांसोबत टाय झाला. मात्र त्यांचा दिग्रस-दारव्हा विधानसभा मतदारसंघ सोडून इतर ठिकाणच्या ध्येय धोरणाची दिशा ठरविण्याचा अधिकार आपल्याला आहे. बरेचदा लगतच्या हिंगोली मतदार संघातील कार्यकर्त्यांकडून तेथून निवडणूक लढविण्याचा आग्रह केला जातो. मात्र ते त्यांचे प्रेम आहे. तथापि काम करताना मतदार संघाची मर्यादा आपण बाळगत नाही. त्यामुळे हिंगोली व अकोला क्षेत्रातील अनेक जण आपणाशी जुळले आहे. यातूनच ही चर्चा घडवून आणली जाते, असे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला निवासी उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांडे, संजय रंगे, किशोर इंगळे, यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गजानन डोमाळे आदी उपस्थित होते.तिसऱ्या जिल्हा प्रमुखाची होणार एन्ट्री१६ तालुके व जिल्ह्याचा एकूण भौगोलिक व्याप लक्षात घेता शिवसेनेत आता दोन नव्हे तर तीन जिल्हा प्रमुख राहणार आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच ही नवी संकल्पना राबविली जाणार आहे. तिसऱ्या जिल्हा प्रमुखासाठी नावांचा प्रस्ताव ‘मातोश्री’कडे पाठविण्यात आला असून लवकरच त्याला मंजुरी मिळणार असल्याचे खासदार भावना गवळी यांनी स्पष्ट केले.शिवसेनेचे चार आमदार निवडून येऊ शकतातजिल्ह्यात यवतमाळ, उमरखेड आणि वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेना निर्णायक आहे. येथे आणखी थोडा जोर लावल्यास जिल्ह्यात शिवसेनेचे चार आमदार सहज निवडून येऊ शकतात. त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे पक्ष बांधणीबाबत भूमिका मांडली आहे. लवकर त्यावर सकारात्मक आदेश येणार असल्याचा विश्वास खासदार भावना गवळी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Bhavna Gavliभावना गवळी