शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ शहरात आज झाडू लागलाच नाही

By admin | Updated: November 15, 2014 02:09 IST

शहरातील स्वच्छतेची जबाबदारी नगर परिषदेने कंत्राटदारावर सोपविली आहे. २००२ पासून कंत्राटी सफाई कामगार शहराच्या आरोग्यसाठी अल्प वेतनात राबत आहेत.

यवतमाळ : शहरातील स्वच्छतेची जबाबदारी नगर परिषदेने कंत्राटदारावर सोपविली आहे. २००२ पासून कंत्राटी सफाई कामगार शहराच्या आरोग्यसाठी अल्प वेतनात राबत आहेत. त्यांना असंघटीत कामगारांना मिळणाऱ्या कायदेशीर सवलती कधीच पुरविण्यात आल्या नाही. महिन्याला वेळेवर वेतनही दिले जात नाही. अखेर या जाचाला कंटाळून कंत्राटी कामगारांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन पुकारले त्यामुळे शहराला झाडूच लागला नाही. शहराच्या स्वच्छतेसाठी नगर परिषद वर्षाकाठी खासगी कंत्राटदाराला कंत्राट देते. नगर पालिकेने कंत्राटदाराशी करार करताना किमान वेतन आणि कामगारांसाठी असलेल्या शिफारसी प्रमाणे सोयी सुविधा देण्याची हमी कंत्राटदाराकडून घेतली आहे. प्रत्यक्षात मात्र कंत्राटी तत्वावर राबणाऱ्या २५० कामगारांची सातत्याने बोळवण केली जात आहे. या कामगारांना अल्पवेतन आणि भविष्य निर्वाह निधीबाबत कुठलीही हमी देण्यात आलेली नाही. आतापर्यंत चार कंत्राटदारांनी शहर सफाईचे कंत्राट घेतले. यापैकी एकाही कंत्राटदाराने कामगारांचा भविष्य निर्वाहनिधी कधीच जमा केला नाही. याची वारंवार सूचना नगर परिषद प्रशासनाला करूनही त्यांच्याकडून कुठलीच दखल घेतली जात नाही. तुम्ही ठेकेदाराचे कामगार आहात त्याच्याकडेच दाद मागा, पालिकेशी काहीही देणेघेणे नाही अशा शब्दात सुनावून या कामगारांना परत पाठविले जाते. सातत्याने होणाऱ्या अन्यायाविरोधात आज अखेर असंघटीत कामगारांनी आंदोलन पुकारले आहे. कंत्राटदाराने एक वर्षापासून वेतनातील वाढीव रक्कमही दिलेली नाही. ६०० रुपये प्रति महिना या प्रमाणे वाढीव वेतनाची रक्कम कामगारांना घ्यायची आहे. मात्र असंघटीत असलेल्या कामगारांच्या मागण्यांकडे कुणीही फारसे लक्ष्य देण्याच्या मानसिकतेत नाही. जिल्हा कामगार अधिकारी यांच्याकडे तक्रार करून त्यांनी या कामगारांच्या समस्या जाणूनच घेतल्या नाही. त्यामुळे कंत्राटी सफाई कामगारांनी वेठबिगारीचे जिने जगण्याची वेळ आली आहे. आरोग्यास धोकादायक असलेल्या स्थितीतही हे कामगार आपली जबाबदारी पूर्ण करतात. याउलट त्यांना किमान वेतनही मिळत नाही, याशिवाय कामासाठी पूरविली जाणारी आवश्यक संसाधणे कंत्राटदार देत नाही. त्यामुळे घाणीपासून संसर्ग होऊन असाध्य रोग जडण्याची भिती वाढली आहे. कामगारांच्या आंदोलनामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ कचरा गोळा झाला नाही. दत्त चौक, स्टेट बँक चौक, एलआयसी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, बसस्थानक चौक परिसर येथे कचरा साचलेला आढळून आला. या अकस्मात स्थितीसाठी नगर परिषदेने नियमित असलेल्या १७५ सफाई कामगारांना कामाला लावले आहे. त्यामुळे या आंदोलनाची तितकी तिव्रता जाणवली नाही. मात्र असाच संप सुरू राहिल्यास शहरात घाणीचे ढिगारे लागल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती आहे. (कार्यालय प्रतिनिधी)