शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

कोट्यवधींच्या खनिज विकास निधीवर लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांचा डल्ला; किशोर तिवारींचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 17:34 IST

जिल्ह्यात वेकोलिने व खासगी व्यापाऱ्यांनी खुल्या कोळसा खाणींमधून कोळसा व इतर गौण खनिज काढताना याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. यातून नागरिकांचा नरसंहार होत असल्याचा गंभीर आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे.

ठळक मुद्देअनियंत्रित प्रदूषणाने नागरिकांचा होतोय नरसंहार

यवतमाळ :प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याकरिता मिळणाऱ्या ३०० कोटी रुपयांच्या खनिज विकास निधीवर लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी ताव मारला असून, यामुळेच वणी, मारेगाव व झरी या भागात प्रदूषणाने कहर केला आहे. यातून नागरिकांचा नरसंहार होत असल्याचा गंभीर आरोप कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे.

किशोर तिवारी यांनी वणी उपविभागात दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मारेगाव व झरी येथील खुल्या कोळसा खाणींमधून कोळसा व इतर गौण खनिज काढताना उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात वेकोलिने व खासगी व्यापाऱ्यांनी खुल्या कोळसा खाणींमधून कोळसा व इतर गौण खनिज काढताना याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.

या भागात अनियंत्रित खनिज उत्खनन सुरू असल्यामुळे हरीत लवादाने घातलेल्या व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ना-हरकत देताना टाकलेल्या सर्व शर्ती धाब्यावर बसवून कोळसा, गिट्टी, डोलामाईटचे उत्खनन सुरू आहे. बेकायदेशीररीत्या कोळसा काढणे, राजकीय नेते, अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्रास लूट सुरू असून, कोळशाची अनधिकृत कोळसा डेपोत विल्हेवाट लावणे, असे गंभीर प्रकार सुरू असल्याचे ते म्हणाले.

वाढलेल्या प्रदूषणामुळे वणी, झरी व मारेगावातील ६५७ खेड्यांतील शेतकरी, ग्रामस्थांचे जीवन असुरक्षित झाले आहे. प्रदूषणामुळे या ग्रामस्थांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. पर्यावरणाचा समतोल कायम ठेवण्यासह विविध उपाययोजनांसाठी आरोग्य, वनविभाग यांना प्रत्येक वर्षी सुमारे ३०० कोटींचा खनिज विकास निधी मिळतो. परंतु यातील अर्ध्यापेक्षा अधिक निधी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी लुटल्याचाही आरोप तिवारी यांनी केला.

७ वर्षांत मिळालेल्या या निधीची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे ते म्हणाले. सुरुवातीला भूमिगत खाणींमधून कोळसा काढण्यात येत होता. गरजेनुसार नंतर खुल्या कोळसा खाणींचा पर्याय स्वीकारण्यात आला. हे करताना प्रदूषण होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक होते. पण याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे प्रदूषण वाढून नागरी जीवन धोक्यात आल्याचे ते म्हणाले.

घरांची पडझड; नुकसानभरपाई नाही

उत्खननासाठीच्या स्फोटामुळे गावखेड्यातील घरांची पडझड झाली आहे. त्याची नुकसानभरपाईदेखील दिली जात नसल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे. प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी गेल्या दोन वर्षांत दोन कृती आराखडे तयार करण्यात आले. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणीच झाली नाही. कोळसा चोरी व इतर खनिज उपसा, अवैध साठा व त्याची अवैध वाहतूक यामध्ये आजी-माजी लोकप्रतिनिधींचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये वणी शहराचे नाव जोडले जाणार आहे. खनिज विकास निधीत होणारा भ्रष्टाचार व त्यातून निर्माण झालेले प्रदूषण, याचा आढावा घेण्यासाठी वणी भागात दौरा करून पाहणी केली. त्यातून हाती आलेल्या माहितीच्या आधारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अहवाल सादर करण्यात येईल.

- किशोर तिवारी, अध्यक्ष, कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन

टॅग्स :Coal Allocation Scamकोळसा खाण घोटाळाpollutionप्रदूषण