शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

मुख्यमंत्र्यांसह राज ठाकरेंच्या घरापुढे भोंगे वाजविणार; यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जत्था मुंबईकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2022 18:35 IST

५० शेतकऱ्यांचा जत्था मुंबईला रवाना झाला असून ४ मे रोजी मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यासमोर राजकीय भोंगे बंद करण्यासाठी महाआरती करणार आहे.

ठळक मुद्देदहा तास वीज देण्याची मागणी

यवतमाळ : राजकीय पक्ष भोंगे वाजविण्यात व्यस्त आहे. जनसामान्यांच्या प्रश्नाकडे त्यांची डोळेझाक झाली आहे. समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम काही नेत्यांनी केले आहे. मात्र, यात सामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या समस्यांकडे डोळेझाक होत आहे. या सर्वांची आठवण करून देण्याच्या उद्देशातून जिल्ह्यातील शेतकरी मुंबईला रवाना झाले आहेत. हे शेतकरी मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्या घरापुढे भोंगे वाजविणार आहेत.

शेतकरी नेते विनायक पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली होती. १ मेपासून शेतकऱ्यांना दररोज दिवसा १० तास वीज देण्यात यावी, साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे बिल एफआरपीप्रमाणे एक हप्त्यात द्यावे, फक्त शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपये पेन्शन द्यावे, आमदार-खासदारांचे पेन्शन बंद करावे, गायीच्या दुधाला प्रति लीटर ४० रुपये भाव द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी मुंबईत मंत्रालयापुढे आंदोलन करणार आहेत. 

याशिवाय जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे राजकीय नेते यांना देखील आवर घालण्यासाठी त्यांच्या घरापुढे जाऊन शेतकरी भोंगे वाजविणार आहेत. या आंदोलनात वारकरी संघटनेचे नेते सिकंदर शाह, बाळू चव्हाण, बाळू राठोड, बाळू विरुटकार यांच्यासह ५० शेतकऱ्यांचा जत्था मुंबईला रवाना झाला असून ४ मे रोजी मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यासमोर राजकीय भोंगे बंद करण्यासाठी महाआरती करणार आहे. त्यांच्यासह भजनी मंडळ देखील सोबत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे