शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

मुख्यमंत्र्यांसह राज ठाकरेंच्या घरापुढे भोंगे वाजविणार; यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जत्था मुंबईकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2022 18:35 IST

५० शेतकऱ्यांचा जत्था मुंबईला रवाना झाला असून ४ मे रोजी मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यासमोर राजकीय भोंगे बंद करण्यासाठी महाआरती करणार आहे.

ठळक मुद्देदहा तास वीज देण्याची मागणी

यवतमाळ : राजकीय पक्ष भोंगे वाजविण्यात व्यस्त आहे. जनसामान्यांच्या प्रश्नाकडे त्यांची डोळेझाक झाली आहे. समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम काही नेत्यांनी केले आहे. मात्र, यात सामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या समस्यांकडे डोळेझाक होत आहे. या सर्वांची आठवण करून देण्याच्या उद्देशातून जिल्ह्यातील शेतकरी मुंबईला रवाना झाले आहेत. हे शेतकरी मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्या घरापुढे भोंगे वाजविणार आहेत.

शेतकरी नेते विनायक पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली होती. १ मेपासून शेतकऱ्यांना दररोज दिवसा १० तास वीज देण्यात यावी, साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे बिल एफआरपीप्रमाणे एक हप्त्यात द्यावे, फक्त शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपये पेन्शन द्यावे, आमदार-खासदारांचे पेन्शन बंद करावे, गायीच्या दुधाला प्रति लीटर ४० रुपये भाव द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी मुंबईत मंत्रालयापुढे आंदोलन करणार आहेत. 

याशिवाय जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे राजकीय नेते यांना देखील आवर घालण्यासाठी त्यांच्या घरापुढे जाऊन शेतकरी भोंगे वाजविणार आहेत. या आंदोलनात वारकरी संघटनेचे नेते सिकंदर शाह, बाळू चव्हाण, बाळू राठोड, बाळू विरुटकार यांच्यासह ५० शेतकऱ्यांचा जत्था मुंबईला रवाना झाला असून ४ मे रोजी मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यासमोर राजकीय भोंगे बंद करण्यासाठी महाआरती करणार आहे. त्यांच्यासह भजनी मंडळ देखील सोबत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे