शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा फटका; दारव्हा तालुक्यात ९९, आर्णीमध्ये ११५ मिमी पावसाची नोंद

By विशाल सोनटक्के | Updated: September 12, 2022 14:57 IST

जिल्ह्यात सरासरी ७० मिमी पाऊस

यवतमाळ : जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा फटका बसला आहे. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ७०.३ मिमी पाऊस कोसळला आहे. सर्वाधिक ११५.२ मिमी पाऊस आर्णी तालुक्यात झाला आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प तुडुंब झाले असून उरलीसुरली पिकेही पाण्यात गेली आहे.

यंदा जून महिन्यातच जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा सोसावा लागला. त्यानंतर जुलै-ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी पहाटेपासून सुरू झालेला पाऊस सोमवारी दुपारपर्यंतही अधूनमधून सुरूच होता. सोमवारी सकाळपर्यंत यवतमाळ तालुक्यात ५७.७, बाभूळगाव ७८.५, कळंब ६५.६, दारव्हा ९९.९, दिग्रस ५६.४, आर्णी ११५.२, नेर ८५.५, पुसद २६.७, उमरखेड ५६.८, महागाव ५९.१, वणी ९०.६, मारेगाव ५७.१, झरी जामणी ७९.३, केळापूर ८४.६, घाटंजी ७६.२ आणि राळेगाव तालुक्यात ५६.९ मिमी पाऊस झाला आहे. सोमवारी दुपारीही यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील विविध भागात संततधार पाऊस सुरूच होता.

जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प तुडुंब

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून विविध प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने नदी काठच्या गावांनी सतर्कता बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील पूस, अरुणावती, गोकी, वाघाडी, सायखेडा आणि बोरगाव हे सहा प्रकल्प १०० टक्के भरले आहे. तर अडाण प्रकल्पात ८८.५५, अधरपूस ८७.२५ आणि बेंबळा प्रकल्पात ७८.४८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूरyavatmal-acयवतमाळ