शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा फटका; दारव्हा तालुक्यात ९९, आर्णीमध्ये ११५ मिमी पावसाची नोंद

By विशाल सोनटक्के | Updated: September 12, 2022 14:57 IST

जिल्ह्यात सरासरी ७० मिमी पाऊस

यवतमाळ : जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा फटका बसला आहे. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ७०.३ मिमी पाऊस कोसळला आहे. सर्वाधिक ११५.२ मिमी पाऊस आर्णी तालुक्यात झाला आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प तुडुंब झाले असून उरलीसुरली पिकेही पाण्यात गेली आहे.

यंदा जून महिन्यातच जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा सोसावा लागला. त्यानंतर जुलै-ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी पहाटेपासून सुरू झालेला पाऊस सोमवारी दुपारपर्यंतही अधूनमधून सुरूच होता. सोमवारी सकाळपर्यंत यवतमाळ तालुक्यात ५७.७, बाभूळगाव ७८.५, कळंब ६५.६, दारव्हा ९९.९, दिग्रस ५६.४, आर्णी ११५.२, नेर ८५.५, पुसद २६.७, उमरखेड ५६.८, महागाव ५९.१, वणी ९०.६, मारेगाव ५७.१, झरी जामणी ७९.३, केळापूर ८४.६, घाटंजी ७६.२ आणि राळेगाव तालुक्यात ५६.९ मिमी पाऊस झाला आहे. सोमवारी दुपारीही यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील विविध भागात संततधार पाऊस सुरूच होता.

जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प तुडुंब

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून विविध प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने नदी काठच्या गावांनी सतर्कता बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील पूस, अरुणावती, गोकी, वाघाडी, सायखेडा आणि बोरगाव हे सहा प्रकल्प १०० टक्के भरले आहे. तर अडाण प्रकल्पात ८८.५५, अधरपूस ८७.२५ आणि बेंबळा प्रकल्पात ७८.४८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूरyavatmal-acयवतमाळ