शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

यवतमाळ जिल्ह्यात फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईचे संकट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 2:38 PM

डोंगरदऱ्या आणि घनदाट जंगलाने व्यापलेल्या यवतमाळ जिल्ह्यात अलिकडच्या काळात पावसाचे प्रमाण घटत चालले आहे.

ठळक मुद्देउपाययोजना प्रभावहीन१०१ प्रकल्पात केवळ १८ टक्के जलसाठा

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : डोंगरदऱ्या आणि घनदाट जंगलाने व्यापलेल्या यवतमाळ जिल्ह्यात अलिकडच्या काळात पावसाचे प्रमाण घटत चालले आहे. परिणामी दरवर्षी पाणीटंचाईचे संकट उभे राहते. यंदा तर वार्षिक सरासरीच्या केवळ ६१ टक्के पाऊस झाल्याने फेब्रुवारी महिन्यापासूनच जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. प्रशासनाच्या उपाययोजना प्रभावहीन ठरत असून गावागावांत पाण्यासाठी हाहाकार उडत आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळ शहरात तर तब्बल १२ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.यवतमाळ जिल्ह्यासाठी पाणीटंचाई हा विषय नवीन नाही. उन्हाळा आला की पाणीटंचाई असे समीकरण अलिकडच्या दशकात झाले आहे. यंदा तर वार्षिक सरासरीच्या केवळ ६१ टक्के पाऊस झाला. त्यातही यवतमाळ, कळंब आणि राळेगाव या तालुक्यात वार्षिक सरासरीच्या निम्यापेक्षाही कमी पाऊस झाला. जिल्ह्यातील एकाही नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहली नाही. जिल्ह्यातील प्रकल्पातही अत्यल्प साठा आहे. जिल्ह्यातील १०१ प्रकल्पांमध्ये केवळ १८ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच काळात या प्रकल्पांमध्ये ५८ टक्के साठा होता. जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पात सध्या १४.३२ टक्के, सात मध्यम प्रकल्पात २६.३३ टक्के आणि ९१ लघु प्रकल्पात २१.८३ टक्के पाणीसाठा आहे. फेब्रुवारी महिन्यातच ही अवस्था आहे तर आगामी चार महिन्यात सर्व प्रकल्प तळाला लागण्याची भीती निर्माण झाली आहे.यवतमाळ जिल्ह्यातून वाहणारी मोठी नदी पैनगंगा कोरडी पडली आहे. या नदीच्या तीरावरील तब्बल ५० गावांमध्ये पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. नळयोजनेच्या विहिरी तळाला गेल्याने नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत आहे. इसापूर येथील प्रकल्पाचे पाणी नदी पात्रात सोडावे, यासाठी नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत. वणी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नवरगाव प्रकल्पाचे पाणी निर्गुडा नदीपात्रात सोडले जात आहे. जिल्ह्याचे वाळवंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुसद तालुक्यातील माळपठार भागातील ४० गावे पाण्यासाठी व्याकुळ झाले आहे. अशीच अवस्था जिल्ह्यातील इतरही गावांची झाली आहे. जिल्ह्यातील १३ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. आगामी काळात टँकरची संख्या वाढवावी लागणार आहे. प्रशासनाने पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार केला आहे. मात्र, यातील उपाययोजना प्रभावशून्य झाल्या आहे. पाणीच नाही तर आणायचे कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.यवतमाळात बारा दिवसाआड पाणीपुरवठाजिल्हा मुख्यालय असलेल्या यवतमाळ शहरात यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात पाण्याचा थेंबही नाही. मृत साठ्यातून यवतमाळकरांची तहान भागविली जाते. पाच लाख लोकसंख्येपुढे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बेंबळा प्रकल्पावरून पाणी आणण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र या उन्हाळ्यात पाणी मिळण्याची खात्री खुद्द प्रशासनही देत नाही. परिणामी यवतमाळ शहरातील काही भागात १७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नगरपरिषदेत दररोज पाण्यावरून वाद होत असल्याचे चित्र दिसत आहे.पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडितग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांकडे थकीत वीज बिलापोटी वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यातील तब्बल ५०० पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे या गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील १३३१ पाणीपुरवठा योजनांकडे वीज वितरण कंपनीचे तब्बल २५ कोटी रुपये थकीत आहे.

टॅग्स :Waterपाणी