शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

पाणथळ प्रदेशांच्या यादीत महाराष्ट्र 'ढांग'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2022 11:46 IST

२ फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदा २०२२ या वर्षासाठी ‘वेटलॅन्ड ॲक्शन्स फॉर पीपल ॲन्ड नेचर’ ही मध्यवर्ती संकल्पना ठरविण्यात आली आहे.

ठळक मुद्देआज जागतिक पाणथळ दिवसनऊ निकषांसाठी सात ठिकाणांचे प्रस्ताव प्रलंबित

अविनाश साबापुरे

यवतमाळ : वेगाने वाढणाऱ्या शहरीकरणाने पक्ष्यांचा हक्काचा अधिवास असलेल्या पाणथळ ठिकाणांची संख्या कमी होत आहे. जागतिक स्तरावर नोंद असलेल्या अशा प्रदेशांच्या यादीत महाराष्ट्राचा क्रमांक सर्वात शेवटी असल्याची माहिती समोर आली आहे. २ फेब्रुवारी रोजी जगभरात साजऱ्या होणाऱ्या पाणथळ दिवसानिमित्त हा आढावा...

नैसर्गिकरित्या खोल भागात पाणी साचून तेथे दलदलीचा प्रदेश तयार होतो. त्यालाच सर्वसाधारणपणे पाणथळी म्हटले जाते. जगात २४३५ पाणथळ प्रदेशाची नोंद या चळवळीने घेतली आहे. त्यातील केवळ ४७ प्रदेश भारतात आहेत. उत्तर प्रदेश व पंजाबमध्ये यातील बहुतांश प्रदेशाची नोंद आहे, तर महाराष्ट्रात केवळ नांदूर मदनेश्वर (जि. नाशिक) आणि लोणार सरोवर (जि. बुलडाणा) या दोनच ठिकाणांचा त्यात समावेश आहे. तसेच नवेगावबांध जि. गोंदिया, ठाणे खाडी, शिवडी, वेंगुर्ला (सावंतवाडी), जायकवाडी, उजनी धरण क्षेत्र, हतनूर धरण क्षेत्र या सात ठिकाणांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.

पाणथळ प्रदेशातील जैवविविधता अन्य प्रदेशांपेक्षा अधिक संपन्न असते. भारतात आजघडीला नोंद असलेल्या १४०० पक्ष्यांच्या प्रजातींपैकी ३५० प्रजातींचे पक्षी हे पाणपक्षी म्हणून ओळखले जातात. या ३५० प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास पाणथळी प्रदेशातच असतो. त्यामुळे अशा प्रदेशांचे संवर्धन करण्याची गरज अमरावती जिल्हा जैवविविधता समितीचे सदस्य प्रा. डॉ. गजानन वाघ यांनी व्यक्त केली.

पाणथळ दिवसाची सुरुवात कशी झाली ?

२ फेब्रुवारी १९७१ रोजी इराणमधील रामसर शहरात ‘पाणथळी आणि संवर्धन’ या विषयावर पहिल्यांदाच जागतिक परिषद पार पडली. तेव्हापासून २ फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जातो. यात १७२ देश सहभागी आहेत. हे देश २ फेब्रुवारी रोजी पाणथळ दिवस साजरा करून वर्षभरासाठी अशा प्रदेशांच्या संवर्धनासाठी एखादी थिम निश्चित करतात. यंदा २०२२ या वर्षासाठी ‘वेटलॅन्ड ॲक्शन्स फॉर पीपल ॲन्ड नेचर’ ही मध्यवर्ती संकल्पना ठरविण्यात आली आहे. नऊ निकष तयार करून या परिषदेमार्फत जगातील पाणथळी प्रदेशांना ‘रामसर दर्जा’ दिला जातो.

पाणथळी संवर्धनासाठी मोठ्या चळवळीची गरज आहे. त्यासाठी शासनानेही कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे. त्यात नागरिकांचा, लोकप्रतिनिधींचा, विविध शासकीय, अशासकीय संस्थांचा सहभाग घेतल्यास फायदा होईल.

- प्रा. गजानन वाघ, सदस्य, जिल्हा जैवविविधता समिती, अमरावती

टॅग्स :environmentपर्यावरणSocialसामाजिक