चार राज्यातील कामगार गावी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:00 IST2020-05-13T05:00:00+5:302020-05-13T05:00:15+5:30
यवतमाळातील शासकीय तंत्रनिकेतमध्ये उत्तर प्रदेशातील ४१ मजूर अडकले होते. मध्य प्रदेशातील ३३ मजूर, बिहारमधील ११ मजूर अडकले होते. या सर्वांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले आहे. शक्य झाल्यास रेल्वे अथवा बसेसची व्यवस्था करून मजुरांना एकप्रकारे सुटका करून दिली जात आहे.

चार राज्यातील कामगार गावी रवाना
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील शासकीय निवारागृहात आश्रयाला असलेल्या चार राज्यातील कामगारांना यशस्वीरित्या त्यांच्या घरी पोहोचविण्यात आले आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार व झारखंड येथील मजूर टप्प्याटप्प्याने घरी पोहोचले आहे. यासाठी तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी विशेष परिश्रम घेवून नियोजन केले. काही सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेवून मजुरांना घरी सोडण्याचे काम सुरू आहे.
यवतमाळातील शासकीय तंत्रनिकेतमध्ये उत्तर प्रदेशातील ४१ मजूर अडकले होते. मध्य प्रदेशातील ३३ मजूर, बिहारमधील ११ मजूर अडकले होते. या सर्वांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले आहे. शक्य झाल्यास रेल्वे अथवा बसेसची व्यवस्था करून मजुरांना एकप्रकारे सुटका करून दिली जात आहे.
आता नव्याने मध्य प्रदेशातील ७६ व झारखंडमधील २६ मजुरांना गावी पाठविण्याचे नियोजन आहे.
यासाठी मंडळ अधिकारी वसंत पखाले, तलाठी महेश चौधरी, मंगेश थोरात, डॉ.चेतन दरणे, बकाले, नंदू मोरे, नीरज आहुजा यांनी मदत केली. राणी अवंतीबाई इंग्लिश मीडियम स्कूलने बस उपलब्ध करून दिली.