शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

उमरखेड तालुक्यात श्रमदानाची चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 21:55 IST

सामूहिक प्रयत्नातून अशक्य ते शक्य होऊ शकते. अशाच पद्धतीने तालुक्यातील ३०  गावातील नागरिकांनी एकजूट करत पाणीटंचाईवर मात करण्याचा दृढ संकल्प केला. या गावात ‘एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलंया’ अशीच स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपाण्यासाठी ३० गावांचे प्रयत्न : एकजुटीनं पेटलं रान तुफान आलंया ! 

अविनाश खंदारे।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : सामूहिक प्रयत्नातून अशक्य ते शक्य होऊ शकते. अशाच पद्धतीने तालुक्यातील ३०  गावातील नागरिकांनी एकजूट करत पाणीटंचाईवर मात करण्याचा दृढ संकल्प केला. या गावात ‘एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलंया’ अशीच स्थिती निर्माण झाली आहे. पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत भाग घेत या  गावांनी नवनिर्माणाचा चंग बांधला आहे.खऱ्या अर्थाने या गावांनी ८ एप्रिलच्या रात्री १२ वाजतापासून अधिकृतपणे स्पर्धेत सहभागी होत जलव्यवस्थापन करण्याचा निर्धार केला. सुरुवातीला गावागावांतील जलदुतांनी स्पर्धेसंबंधी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर गावातील लोकांना एकत्र करीत गाव पाणीदार करण्याचा चंग बांधला. विशेष म्हणजे, अनेक गावातील मोजके लोक शेती तर इतर सर्व रोजमजुरी करुन उदरनिर्वाह करतात. सकाळी ६ ते दुपारी २ या वेळात आबालवृद्धांसह सर्व गाव जलसंधारणाच्या कामात स्वयंस्फूर्तीने उतरत आहे.या गावात सीसीटी, एलबीएस, कंटूर बांध, ग्रेडेड कंटूर बांध यासह इतरही कामे उत्कृष्ट व तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण केले आहे. त्यामुळे बहुतांश गावे महाराष्ट्रात गुणतालिकेत अव्वल  ठरली आहेत.गटशिक्षणाधिकाऱ्यांचे प्रोत्साहनगावे पाणीदार व्हावी यासाठी   सहाय्यक गटविकास अधिकारी तथा गट शिक्षणाधिकारी सचिन खुडे हे पुढे सरसावले आहेत. बहुतांश वेळ गावकºयांना मार्गदर्शन व त्यांच्यासोबत श्रमदान करण्यात ते घालवित आहेत.अनेक गावांमध्य त्यांनी सहपरिवार श्रमदान करुन लोकांना प्रोत्साहित केले.विद्यार्थ्यांच्या श्रमदानाने मोठ्यांना प्रेरणातालुक्यातील करंजी या गावात शाळकरी विद्यार्थ्यांचा श्रमदानात असलेला पुढाकार सर्वांना हत्तीचे बळ देणारा ठरतो आहे. त्यांच्यापासून लोकांनाही आपसूकच प्रेरणा मिळते. गावातील लहान मुले जर  दुष्काळाशी दोन हात करण्यात सहभाग घेत असतील, तर आपण का नाही, अशी भावनाही अनेकांच्या मनात जागृत झाली आहे. यामुळे उपक्रमात गावकरी उत्साहाने सहभागी झाले आहेत.   उमरखेड तालुक्यातील ३० गावांमध्ये पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून नागरिकांच्या सहकार्याने सहभाग घेतला आहे. यामध्ये तालुका कृषी विभाग, पंचायत समिती, महसूल तसेच अनेक सामाजिक संस्थांनीही सक्रीय सहभाग नोंदवला आहे.- जयश्री वाघमारे,गटविकास अधिकारी, उमरखेड

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा