शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

खराब रस्त्याने घेतला बाळ-बाळंतिणीचा बळी; मन हेलावणारी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 16:53 IST

चिंचोली फाट्यानजीक रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे चक्क ऑटो रिक्षातच प्रसूती झाली. मात्र, खड्ड्यांच्या त्रासाने प्रसूतीनंतर काही क्षणातच नवजात बाळ दगावले. त्यानंतर काही वेळातच बाळंतीण नताशानेही जगाचा निरोप घेतला.

ठळक मुद्देबिटरगाव ते ढाणकी रस्त्याची दुरवस्था

ढाणकी (यवतमाळ) : उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील ढाणकी ते बिटरगाव (बु.) रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यामुळे ऑटो रिक्षातून प्रसूतीसाठी जाणाऱ्या महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली. मात्र, खराब रस्त्यामुळे बाळ आणि बाळंतीण या दोघांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री घडली.

नताशा अविनाश ठोके (३०, रा. मन्याळी) असे मृत महिलेचे नाव आहे. बंदी भागातील मन्याळी येथील रहिवासी नताशा यांना रविवारी असह्य प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना ऑटो रिक्षातून ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल करण्याचा निर्णय घेतला. सायंकाळच्या सुमारास काही कुटुंबीय व नताशा ऑटोरिक्षाने बिटरगाव येथून ढाणकीकडे निघाल्या. खराब रस्त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास झाला. ढाणकीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील चिंचोली फाट्यानजीक रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे चक्क ऑटो रिक्षातच प्रसूती झाली. मात्र, खड्ड्यांच्या त्रासाने प्रसूतीनंतर काही क्षणातच नवजात बाळ दगावले. त्यानंतर काही वेळातच बाळंतीण नताशानेही जगाचा निरोप घेतला.

मन हेलावणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. ढाणकी ते बिटरगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकदा नागरिकांनी आंदोलन केले. बांधकाम विभागाकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली. मात्र, शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे रस्त्याची दुरुस्ती झालीच नाही. परिणामी, या खड्डेमय रस्त्यामुळे एक विवाहिता आणि तिच्या नवजात बाळाचा बळी गेला. तरीही प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे. आणखी किती बळी घेतल्यानंतर या रस्त्याची दुरुस्ती केली जाईल, असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे. यापूर्वीही अनेकदा अनेक महिलांची खड्ड्यांमुळे रस्त्यातच प्रसूती झाली. रविवारची घटना मात्र सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली.

वेळेवर उपचार मिळालेच नाही

बंदी भागातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना कोणतेही प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी प्रचंड विलंब लागतो. रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. रविवारी सुद्धा प्रसूतीसाठी ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या नताशा व तिच्या बाळाचा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे बळी गेला. रस्ते व्यवस्थित असते तर ती पीएचसीमध्ये पोहोचू शकली असती, वेळेवर तिच्यावर उपचार झाले असते. परिणामी, आज ती आणि तिचे बाळ सुखरूप राहिले असते. मात्र, रस्त्याच्या दुर्दशेमुळे दोघांचेही बळी गेल्याने समाजमन सुन्न झाले. या घटनेने बंदी भागातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या घटनेवरून बोध घेऊन शासनाने या भागातील रस्त्यांची तातडीने किमान दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नताशा व तिच्या नवजात बाळाच्या मृत्यूमुळे मन्याळी गावात शोकाकुल वातावरण आहे.

टॅग्स :Accidentअपघातpregnant womanगर्भवती महिलाDeathमृत्यूPotholeखड्डे