शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
3
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
4
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
5
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
6
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
7
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
8
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
9
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
10
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
11
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
12
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
13
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
14
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
15
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
16
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
17
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
18
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
19
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
20
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी

वन्यप्रेमींनो, वाघग्रस्त भागात मुक्कामाला या! गावकऱ्यांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 05:50 IST

मुंबई-पुण्यात वातानुकूलित कक्षात बसून अवनीची पाठराखण करणे सोपे आहे. या पाठीराख्यांनी कोणत्याही गावात परिवारासह तीन दिवस मुक्काम करून पाहावा आणि शेतशिवारात जाऊन दाखवावे मग त्यांना वाघाची दहशत काय असते ते कळेल

राळेगाव (यवतमाळ) : नरभक्षक वाघिणीला ठार मारल्याने राज्यभरातील वन्यजीवप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र वाघिणीच्या हल्ल्यात ज्यांना सगेसोयरे गमवावे लागले, त्या गावक-यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.मुंबई-पुण्यात वातानुकूलित कक्षात बसून अवनीची पाठराखण करणे सोपे आहे. या पाठीराख्यांनी पांढरकवडा, राळेगाव, कळंब तालुक्यातील कोणत्याही गावात परिवारासह तीन दिवस मुक्काम करून पाहावा आणि शेतशिवारात जाऊन दाखवावे मग त्यांना वाघाची दहशत काय असते ते कळेल असे गावकºयांनी सांगितलेवाघिणीच्या मृत्यूनंतरही या भागात अजून एक वाघ व दोन बछडे असल्याने भीती संपलेली नाही, असे वरधचे पोलीस पाटील प्रवीण कळसकर यांनी सांगितले. सायंकाळनंतर संचारबंदीसदृश्य स्थिती असते, असे वरधच्या सरपंच सरपंच कांचन मेश्राम यांनी सांगितले.‘अवनी’च्या मृत्यूवरून राजकीय फैरीमुंबई : यवतमाळ जिल्ह्यात गेल्या आठवड्यात वन विभागाकडून ठार मारण्यात आलेल्या अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी वाघिणीच्या मृत्यूवरून राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरल्यानंतर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारची बाजू प्रसार माध्यमांपुढे मांडली. तर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी सरकारवरला गोळ्या घालायच्या का, असा सवाल केला आहे.दिवाळीनिमित्त सोमवारी पत्रकारांसाठी आयोजित स्रेहमीलन कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले, अवनीला ठार मारण्याची कार्यपद्धतीबाबत जे आक्षेप घेतले जात आहेत, त्याची पडताळणी केली जाईल. वाघांची संख्या वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न असताना एखाद्या वाघिणीला ठार मारावे लागणे हे दुर्देवीच आहे. पण ती वाघीण नरभक्षक होती. तिने आतापर्यंत अनेक जणांचा बळी घेतले हेही वास्तव आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी या प्राणिमित्र आहेत. या आधीही प्राण्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात त्यांनी माझ्याकडे चिंता व्यक्त केलेली होती, असे मुख्यमंत्री म्हणाले.मग सरकारवरही गोळ्या झाडायच्या का? : शिवसेनामुंबई : गेल्या चार वर्षांत शेकडो शेतकºयांनी केलेल्या आत्महत्यांना सरकारच जबाबदार आहे. मग या सरकारवरही गोळ्या झाडायच्या का, असा सवाल शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी केला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, यवतमाळमध्ये अवनी या वाघिणीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यासाठी हैदराबादहून शूटर मागविण्यात आले होते. राज्यात एवढे एन्काऊंटर झाले. त्यात बरेच खोटेही होते.वाघिणीला अन्य मार्गाने वाचविता आले असते. मात्र, वनमंत्र्यांनी ते मनावर घेतले नाही. भाजपच्याच केंद्रीय मंत्री मनेका गांधींनी यावर आवाज उठवला याबाबत त्यांचे आम्ही आभार मानतो. तसेच उद्धव ठाकरे हे वाईल्डलाईफ फोटोग्राफर आहेत. त्यांची मुलेही आहेत. तसेच शिवसेनेचे चिन्ह वाघ असल्याने हा विषय आमच्यासाठी जिव्हाळ्याचा असल्याचेही राऊत म्हणाले.

टॅग्स :Tigerवाघwildlifeवन्यजीवYavatmalयवतमाळMaharashtraमहाराष्ट्र