शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्रेमींनो, वाघग्रस्त भागात मुक्कामाला या! गावकऱ्यांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 05:50 IST

मुंबई-पुण्यात वातानुकूलित कक्षात बसून अवनीची पाठराखण करणे सोपे आहे. या पाठीराख्यांनी कोणत्याही गावात परिवारासह तीन दिवस मुक्काम करून पाहावा आणि शेतशिवारात जाऊन दाखवावे मग त्यांना वाघाची दहशत काय असते ते कळेल

राळेगाव (यवतमाळ) : नरभक्षक वाघिणीला ठार मारल्याने राज्यभरातील वन्यजीवप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र वाघिणीच्या हल्ल्यात ज्यांना सगेसोयरे गमवावे लागले, त्या गावक-यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.मुंबई-पुण्यात वातानुकूलित कक्षात बसून अवनीची पाठराखण करणे सोपे आहे. या पाठीराख्यांनी पांढरकवडा, राळेगाव, कळंब तालुक्यातील कोणत्याही गावात परिवारासह तीन दिवस मुक्काम करून पाहावा आणि शेतशिवारात जाऊन दाखवावे मग त्यांना वाघाची दहशत काय असते ते कळेल असे गावकºयांनी सांगितलेवाघिणीच्या मृत्यूनंतरही या भागात अजून एक वाघ व दोन बछडे असल्याने भीती संपलेली नाही, असे वरधचे पोलीस पाटील प्रवीण कळसकर यांनी सांगितले. सायंकाळनंतर संचारबंदीसदृश्य स्थिती असते, असे वरधच्या सरपंच सरपंच कांचन मेश्राम यांनी सांगितले.‘अवनी’च्या मृत्यूवरून राजकीय फैरीमुंबई : यवतमाळ जिल्ह्यात गेल्या आठवड्यात वन विभागाकडून ठार मारण्यात आलेल्या अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी वाघिणीच्या मृत्यूवरून राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरल्यानंतर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारची बाजू प्रसार माध्यमांपुढे मांडली. तर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी सरकारवरला गोळ्या घालायच्या का, असा सवाल केला आहे.दिवाळीनिमित्त सोमवारी पत्रकारांसाठी आयोजित स्रेहमीलन कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले, अवनीला ठार मारण्याची कार्यपद्धतीबाबत जे आक्षेप घेतले जात आहेत, त्याची पडताळणी केली जाईल. वाघांची संख्या वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न असताना एखाद्या वाघिणीला ठार मारावे लागणे हे दुर्देवीच आहे. पण ती वाघीण नरभक्षक होती. तिने आतापर्यंत अनेक जणांचा बळी घेतले हेही वास्तव आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी या प्राणिमित्र आहेत. या आधीही प्राण्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात त्यांनी माझ्याकडे चिंता व्यक्त केलेली होती, असे मुख्यमंत्री म्हणाले.मग सरकारवरही गोळ्या झाडायच्या का? : शिवसेनामुंबई : गेल्या चार वर्षांत शेकडो शेतकºयांनी केलेल्या आत्महत्यांना सरकारच जबाबदार आहे. मग या सरकारवरही गोळ्या झाडायच्या का, असा सवाल शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी केला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, यवतमाळमध्ये अवनी या वाघिणीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यासाठी हैदराबादहून शूटर मागविण्यात आले होते. राज्यात एवढे एन्काऊंटर झाले. त्यात बरेच खोटेही होते.वाघिणीला अन्य मार्गाने वाचविता आले असते. मात्र, वनमंत्र्यांनी ते मनावर घेतले नाही. भाजपच्याच केंद्रीय मंत्री मनेका गांधींनी यावर आवाज उठवला याबाबत त्यांचे आम्ही आभार मानतो. तसेच उद्धव ठाकरे हे वाईल्डलाईफ फोटोग्राफर आहेत. त्यांची मुलेही आहेत. तसेच शिवसेनेचे चिन्ह वाघ असल्याने हा विषय आमच्यासाठी जिव्हाळ्याचा असल्याचेही राऊत म्हणाले.

टॅग्स :Tigerवाघwildlifeवन्यजीवYavatmalयवतमाळMaharashtraमहाराष्ट्र