शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या एसटीच्या चाकांचे बोल्ट निघतात तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 06:00 IST

मंगळवार सकाळच्या या प्रकाराने एसटी महामंडळाच्या यांत्रिक विभागातील बोगस कामाचा परिचय आला. यवतमाळ आगाराची ८०७३ क्रमांकाची बस दातोडीसाठी गेली. तेथून यवतमाळला परतत असताना मार्गात या बसच्या उजव्या बाजूचे चाक डवंडळत असल्याचे मागच्या वाहनधारकाला दिसले. ही बाब उशिरा लक्षात आली असती तर चाक निखळून बस उलटून अपघात झाला असता.

ठळक मुद्देदातोडी फेरी : यंत्र विभागातील दुर्लक्षितपणा, प्रवाशांच्या जीविताला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ग्रामीण भागातील रस्त्यावरून एसटी बस धावत होती... मागाहून आलेल्या वाहनाने एसटी बस गाठत चालकाला सांगितले... अहो, तुमच्या बसचे चाक निखळून पडत आहे... त्याचवेळी प्रवाशांच्या कानावर ही वार्ता पडली... बस थांबताच त्यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला.मंगळवार सकाळच्या या प्रकाराने एसटी महामंडळाच्या यांत्रिक विभागातील बोगस कामाचा परिचय आला. यवतमाळ आगाराची ८०७३ क्रमांकाची बस दातोडीसाठी गेली. तेथून यवतमाळला परतत असताना मार्गात या बसच्या उजव्या बाजूचे चाक डवंडळत असल्याचे मागच्या वाहनधारकाला दिसले. ही बाब उशिरा लक्षात आली असती तर चाक निखळून बस उलटून अपघात झाला असता. आगारातील यांत्रिक विभागातून झालेली हयगय प्रवाशांच्या जीवावर बेतली असती. या बसमध्ये ७० प्रवासी होते.यापूर्वीही बसची चाके निखळून पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यानंतरही काही कामगारांकडून बसच्या मेंटनन्सकडे दुर्लक्ष केले जात आहे. अर्ध्यातच प्रवास रखडत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. या विभागाशी आणि आगाराशी संबंधित अधिकाऱ्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे.बसफेऱ्यांचा अर्धवट प्रवास, प्रवाशांना होतोय नाहक त्रासयवतमाळ आगारातून सोडल्या जाणाऱ्या काही बसेसच्या फेऱ्या अर्धवट होत असल्याची माहिती आहे. बसफेरीसाठी आवश्यक ती पूर्ण तयारी झालेली असताना काही चालक, वाहकांकडून जाणीवपूर्वक फेरीला विलंब केला जातो. यात वेळ गेल्यामुळे लागूनच असलेली दुसरी फेरी टाळण्यासाठी हा उपद्व्याप केला जात आहे. प्रामुख्याने यवतमाळ-धामणगाव बसफेऱ्यांबाबत हा प्रकार घडत असल्याची माहिती आहे. २६ सप्टेंबर रोजी शेड्यूल नं.१२, ५४, ५५, २२, १४०, १४१ बाभूळगाववरूनच परत आले. धामणगाव किंवा पुलगाव फेऱ्या पूर्ण केल्या नाही. या प्रकारात महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले. शिवाय बाभूळगावपुढील प्रवाशांना बसची प्रतीक्षा करावी लागली. वारंवार घडणाऱ्या या प्रकारावर नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :state transportएसटी