शहरं
Join us  
Trending Stories
1
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
2
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
3
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
4
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
5
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
6
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
7
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
8
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
9
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
10
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
11
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
12
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
13
अलर्ट! पैसे दुप्पट करण्याची हाव; एक मेसेज अन् गमावली आयुष्यभराची कमाई, करू नका 'ही' चूक
14
लग्नानंतर नवऱ्याने काम करु दिलं नाही तर...? रिंकू राजगुरु म्हणाली, "तो हिसकावून घेत असेल..."
15
Nashik Municipal Corporation Election : भाजपत एकमेकांवर मात; शिंदेसेनेला राष्ट्रवादीची साथ; गिरीश महाजन नाशकात तळ ठोकणार
16
सेना, मनसे एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी दुसरीकडे; महाविकास आघाडीत फाटाफुटीची शक्यता
17
"रहमान डकैतचे पाकिस्तानवर उपकार आहेत...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर गँगस्टरच्या वकील मित्राची प्रतिक्रिया, म्हणाला...
18
"तो त्याच्याच धुंदीत असतो...", 'दृश्यम ३'मधून अक्षय खन्नाच्या एक्झिटनंतर त्याच्या विचित्र स्वभावाबाबत अरशद वारसीचा खुलासा
19
Travel : काश्मीर फिरायला जायचं प्लॅनिंग करताय? मग 'या' ५ चुका टाळा, नाहीतर खिशाला लागेल कात्री!
20
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
Daily Top 2Weekly Top 5

पहिलीत प्रवेशासाठी नेमके वय किती हवे? साडेसात वर्षांच्या बंधनाने गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 15:34 IST

पहिल्या वर्गासाठी साडेसात वर्षे ही वयोमर्यादा घातल्याने शाळा व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देनवा आदेश आरटीईसाठी की नियमित प्रवेशासाठी?

अविनाश साबापुरे

यवतमाळ : पहिल्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी बालकाचे वय किती असावे, याबाबत शिक्षण संचालकांनी नुकताच एक आदेश निर्गमित केला आहे. यात पहिल्या वर्गासाठी साडेसात वर्षे ही वयोमर्यादा घातल्याने शाळा व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. साडेसात वर्षांच्या मुलाला यंदा पहिल्या वर्गात घातल्यास त्याच्या शैक्षणिक आयुष्यातील दोन वर्षे वाया जाणार नाहीत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सध्या आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत नेमक्या किती वर्षे वयाच्या मुलाला लाभ घेता येईल, यावरून पालकांमध्ये संभ्रम होता; तर खुद्द शिक्षण विभागातही एकवाक्यता नव्हती. त्यातून आरटीईसाठी ऑनलाईन अर्ज भरताना गोंधळ उडत होता. तो दूर करण्यासाठी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी सोमवारी विद्यार्थ्यांची वयोमर्यादा स्पष्ट करणारा सुधारित आदेश निर्गमित केला.

त्यानुसार प्ले ग्रुप किंवा नर्सरीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे किमान वय ४ वर्षे ५ महिने ३० दिवस असावे, ज्युनिअर केजीसाठी ही वयोमर्यादा ५ वर्षे ५ महिने ३० दिवस, तर सिनिअर केजीसाठी ६ वर्षे ५ महिने ३० दिवस असावी. याच आदेशानुसार इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे किमान वय ३१ डिसेंबर २०२२ रोजी ७ वर्षे ५ महिने ३० दिवस इतके पूर्ण झालेले असावे.

या सुधारित वयोमर्यादेवरून शाळांमध्ये आणखी गोंधळ वाढला आहे. किमान साडेसात वर्षे झाल्याशिवाय एखाद्या विद्यार्थ्याला पहिलीत प्रवेश देऊ नये, असा या आदेशाचा अर्थ अनेकांनी घेतला आहे. मग यंदा सिनिअर केजीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना पहिलीत प्रवेश घेण्यासाठी आणखी एक वर्ष थांबावे लागणार आहे. शिवाय साडेसात वर्षे झाल्यानंतर पहिल्या वर्गात प्रविष्ट होणारा विद्यार्थी जेव्हा दहाव्या वर्गात जाईल तेव्हा तो १८ वर्षांचा असेल. या सुधारित आदेशापूर्वी राज्य शासनाच्याच १८ सप्टेंबर २०२० राेजीच्या शासन आदेशानुसार ६ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्याला पहिलीत प्रवेश मिळत होता. तो १६ व्यावर्षीच दहावी पूर्ण करीत होता. मात्र आता त्याच्या शैक्षणिक आयुष्यातील दोन वर्षे वाया जाणार आहेत.

शिक्षण संचालकांचा सुधारित आदेश केवळ आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेपुरता मर्यादित आहे की, आरटीईव्यतिरिक्त नियमित प्रवेश प्रक्रियेसाठी तो लागू आहे, यावरून संभ्रम वाढला आहे. याबाबत शिक्षण विभागाकडूनही अद्याप कोणतेही स्पष्टीकरण न झाल्याने अनेक शाळांमधील प्रवेश प्रक्रिया बाधित झाली आहे.

शासनाने पहिली प्रवेशाबाबत आधीच किमान वयोमर्यादा ठरविली आहे. या सुधारित आदेशात सांगितली गेलेली कमाल वयाेमर्यादा आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण होण्याचे कारण नाही. शिवाय हा आदेश केवळ आरटीईच्या २५ टक्के जागांसाठीच लागू असून, उर्वरित ७५ टक्के प्रवेश हे यापूर्वीच्या शासन आदेशातील वयोमर्यादेप्रमाणेच होतील. याबाबत कोणताही संभ्रम राहू नये, यासाठी आणखी स्पष्ट आदेश काढला जाणार आहे.

- राजेश क्षीरसागर, शिक्षण उपसंचालक, पुणे

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीSchoolशाळा