२० लाख कोटींच्या पॅकेजचे काय झाले ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:00 IST2020-08-17T05:00:00+5:302020-08-17T05:00:33+5:30

पुसद विधानसभा युवक काँग्रेसतर्फे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव भगवान पंडागळे व अभिलेख खैरमोडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारने काही दिवसापूर्वी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजचा लाभ सामान्य नागरिकापर्यंत पोहोचविण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे कुठे गेले ते २० लाख कोटी रुपये, असा प्रश्न विचारत आंदोलन करण्यात आले.

What happened to the Rs 20 lakh crore package? | २० लाख कोटींच्या पॅकेजचे काय झाले ?

२० लाख कोटींच्या पॅकेजचे काय झाले ?

ठळक मुद्देयुवक कॉँग्रेसचे आंदोलन : पुसद येथे आमदारांच्या कार्यालयापुढे निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : भाजपच्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे काय झाले, याचा जाब विचारण्यासाठी युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. येथील विधान परिषद आमदार अ‍ॅड. नीलय नाईक यांच्या कार्यालयासमोर रविवारी निदर्शने करण्यात आली.
पुसद विधानसभा युवक काँग्रेसतर्फे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव भगवान पंडागळे व अभिलेख खैरमोडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारने काही दिवसापूर्वी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजचा लाभ सामान्य नागरिकापर्यंत पोहोचविण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे कुठे गेले ते २० लाख कोटी रुपये, असा प्रश्न विचारत आंदोलन करण्यात आले. आमदार अ‍ॅड. नीलय नाईक यांच्या कार्यालयासमोर रविवारी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फलक घेवून निदर्शने केली.
यावेळी देशाची आर्थिक स्थिती बेरोजगारी आदी समस्यांना केंद्रातील भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. या आंदोलनात पुसद विधानसभेचे युवक काँग्रेस कार्यकर्ते अभिलेख खैरमोडे, शिवाजी शेळके, तात्या टारफे, फकिरा मुकाडे, पांडुरंग सुरकुंडे, नागेश झळके, गजानन साखरे, रितेश खैरमोडे, सुनील पाटील व अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. घोषणाबाजीने अनेकांचे लक्ष वेधले होते.

Web Title: What happened to the Rs 20 lakh crore package?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.