शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

यवतमाळ जिल्ह्यात ओले संकट; पुराच्या भीतीने आर्णी तालुक्याने जागून काढली रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:21 AM

गेल्या तीन दिवसांपासून संततधारेने यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीसह काही तालुक्यांना झोडपून काढले आहे. बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अरुणावती धरणातील पाण्याची पातळी ६८ टक्क्यांवर गेल्यामुळे या तालुक्यातील नागरिकांनी गुरुवारची रात्र अक्षरश: जागून काढली.

ठळक मुद्देनदीकाठची बहुतांश गावे पाण्याखालीनाल्याचे पाणी उलटे गावात शिरलेशुक्रवारी सकाळी पाणी ओसरलेवाहतूक पूर्ववत, जनजीवन सामान्य

हरिओमसिंह बघेल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: गेल्या तीन दिवसांपासून संततधारेने यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीसह काही तालुक्यांना झोडपून काढले आहे. बुधवारी रात्री

पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अरुणावती धरणातील पाण्याची पातळी ६८ टक्क्यांवर गेल्यामुळे या तालुक्यातील नागरिकांनी गुरुवारची रात्र अक्षरश: जागून काढली. सोशल मिडियावरून सतत जागोजागीच्या अपडेटस एकमेकांसोबत शेअर करीत नागरिक एकमेकांना धीर देत सकाळ होण्याची वाट पहात जागत होते.गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उघाड न दिल्याने अनेक प्रवासी जागोजागी अडकून पडले आहेत. गावागावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांनी शाळा, तहसील कार्यालये व मंदिरात आश्रय घेण्यास सुरुवात केली आहे. पूर येण्याची धास्ती प्रत्येकाच्या मनात असल्याने नागरिक दुकानांसमोर, बसस्थानकांवर समूहांत थांबले होते व वाढत्या पाण्याचा अंदाज घेत होते. रात्री बारानंतर पाण्याचा जोर थोडा कमी झाल्यानंतर या नागरिकांनी थोडासा सुटकेचा निश्वास टाकला.अरुणावती हे धरण आर्णी गावापासून सुमारे ३० कि.मी. अंतरावर आहे. हे धरण मंगळवारपर्यंत ३५ टक्के भरलेले होते. गुरुवारी रात्री १० वाजेपर्यंत त्याने ६८ टक्क्यांची पातळी गाठली होती. अरुणावती व पैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या राणीधानोरा, कवठाबाजार, कोसदनी, मुकींदपूर, साकूर, आसरा या गावातील शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. गावात पाणी शिरल्याने दुकाने व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.धरणातील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली तर धरणाचे गेट उघडले जातील आणि पूर येऊन आपले गाव बुडेल या धास्तीने अनेक दुकानदार रात्रभर दुकानांच्या छतांवर बसून राहिले. वॉटसअप व सोशल मिडियावरून गावोगावचे नागरिक आपापल्या गावातील स्थिती व फोटो एकमेकांसोबत शेअर करीत होते.शुक्रवारी सकाळी पाण्याचा जोर बराच कमी झाला असल्याने पाणी झपाट्याने ओसरू लागले आहे. पावसानेही उघडीप दिली असून, वाहतूक सुरू झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊस