शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

अर्ध्या शहराला दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 9:33 PM

अर्ध्या अधिक शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा मुख्य व्हॉलच गटारात असल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देपिण्याच्या पाण्याचा व्हॉलच गटारात : प्राधिकरणाचे खापर वीज मंडळ, बांधकामवर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अर्ध्या अधिक शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा मुख्य व्हॉलच गटारात असल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने उघडकीस आला आहे. गटारातील या व्हॉलमधून पिंपळगाव, वाघापूर, वडगाव, दर्डानगर अशा विविध भागाला दूषित पाण्याचा पुरवठा होतो आहे. त्यामुळे जीवन प्राधिकरणाविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पहायला मिळत आहे.आर्णी रोड स्थित शिवाजी गार्डन परिसरात हा प्रकार दृष्टीस पडला. गटारात असलेला हा व्हॉल लिकेज असल्याने त्यातून सर्रास घाण पाणी पाईपलाईनद्वारे टाकीमध्ये व तेथून घराघरात पोहोचते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आधीच प्रचंड गटार व त्या भोवती सातत्याने वराहांचा संचार असल्याने पिण्याचे पाणी कोणत्या गुणवत्तेचे घराघरात पोहोचत असेल याची सहज कल्पना येते. याबाबत जीवन प्राधिकरणाकडे जाब विचारला असता त्यांनी थेट विकास कामे करणाऱ्या वीज वितरण कंपनी आणि बांधकाम खात्याकडे बोट दाखवून आपला बचाव करण्याचा केविलवाना प्रयत्न चालविला आहे. असेच अनेक लिकेज येथील गांधी चौक, मेन लाईन व शहराच्या विविध भागात ठिकठिकाणी आहे. त्याबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राधिकरणाकडे तक्रारीही केल्या जातात. परंतु प्राधिकरण त्याबाबत कधीच गांभीर्याने घेत नाही. पर्यायाने शहरातील लिकेज व दूषित पाणी पुरवठ्याची समस्या कायम आहे.शिवाजीनगर परिसरातील हा व्हॉल गेल्या अनेक महिन्यापासून फुटलेल्या अवस्थेत आहे. या संदर्भात नागरिकांनी जीवन प्राधिकरणाकडे तक्रार नोंदविली. त्यानंतरही हा व्हॉल दुरुस्त झाला नाही. यातून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होऊन तेथे डबके साचले आहे. या डबक्यातच परिसरातील सांडपाणी येऊन मिळते. तसेच यात डुकरांचा मुक्त संचार होतो. हेच दूषित पाणी नळावाटे नागरिकांच्या घरात पोहोचते. गेल्या कित्येक दिवसानंतर नळाचे आलेले पाणी नागरिक मोठ्या उत्सुकतेने भरतात. पाण्याचा रंग हिरवट पाहूनही तक्रार करीत नाही. याच पाण्यामुळे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. शहरातील विविध भागात हा पाणीपुरवठा होत असल्याने डायरियासारखे आजार पसरण्याची भीती आहे. जीवन प्राधिकरण मात्र दुर्लक्ष करीत आहे.शिवाजीनगर गार्डनजवळील लिकेज व्हॉल दुरुस्तीचे काम जीवन प्राधिकरणाने हाती घेतले आहे. एक-दोन दिवसात काम पूर्ण होईल.- अजय बेले,कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण