शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

उमरखेड तालुक्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 9:48 PM

हिवाळा सुरु असतानाच तालुक्यातील तब्बल ४३ गावात भीषण पाणीटंचाई सदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीपर्यंत आणखी अनेक गावचांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे४३ गावे : आढावा बैठकीत ‘वास्तव’ उघड, उन्हाळ्यात समस्या वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : हिवाळा सुरु असतानाच तालुक्यातील तब्बल ४३ गावात भीषण पाणीटंचाई सदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीपर्यंत आणखी अनेक गावचांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.येथील जिजाऊ भवनात आमदार राजेंद्र नजरधने यांनी गुरूवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत पाणीटंचाईची दाहकता उघड झाली. यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने तालुक्यावरील दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. पंचायत समिती सभापती प्रवीण मिरासे, तहसीलदार भगवान कांबळे, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, राम देवसरकर, पंकज मुडे, पंचायत समिती सदस्य बालाजी आगलावे, प्रज्ञानंद खडसे, नयन पुद्दलवाड, गजानन सोळंके, सविता कदम, रमेश आडे, अरविंद माने यांच्यासह तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी, सरपंच, सचिव बैठकीला उपस्थित होते. या सवांनीच पाणीटंचाईची दाहकता स्पष्ट केली.सध्या तालुक्यातील बोथा, ब्राम्हणगाव, मेट, बाळदी, चिंचोली (ढा.), चुरमुरा, धानोरा, दिघडी, दिंडाळा, गांजेगाव, हरदडा, हातला, करंजी, कोप्रा,मानकेश्वर, मन्याळी, मोरचंडी, मुळावा, मुरली, नारळी, अकोली, सावळेश्वर, बेलखेड, भवानी, बोरी वन, चिंचोली सं., नागेशवाडी, निंगणूर, पिंपळगाव वन, दिवटपिंप्री, सोईट घ., सोनदाबी, सोईट म., सुकळी (न.), ईसापूर, तरोडा, टेंभुरदरा, तिवडी, उंचवडद, विडूळ, वरूड बीबी अशा ४३ गावांत पाणीटंचाई सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. या गावातील सरपंच, सचिवांनी पाणीटंचाईवर उपाययोजना व प्रशासनाकडून होत असलेल्या अडचणीबाबत माहिती दिली. आमदारांनी उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. संचालन विस्तार अधिकारी संतोष डाखोरे, तर प्रास्ताविक धारपवार यांनी केले.सांघिक प्रयत्नांची गरजतालुका भीषण दुष्काळात सापडला असून शासनाने अनेक सवलती जाहीर केल्या. त्याचा लाभ घेत दुष्काळ निवारायचा आहे. त्यासाठी सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, सचिवांनी सांघिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे आमदार राजेंद्र नजरधने यांनी सांगितले. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई