शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

उमरखेडवर पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 22:20 IST

पैनगंगा नदीसह संपूर्ण तालुक्यात इसापूर धरणाच्या कालव्याचे जाळे असतानाही तालुक्याला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षी तर अपुºया पावसाने हिवाळ्यातच पाणीटंचाई तीव्र झाली आहे.

ठळक मुद्दे पैनगंगा नदी आटली : इसापूर धरणाचे पाणी सोडणार कधी ?

दत्तात्रय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : पैनगंगा नदीसह संपूर्ण तालुक्यात इसापूर धरणाच्या कालव्याचे जाळे असतानाही तालुक्याला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षी तर अपुºया पावसाने हिवाळ्यातच पाणीटंचाई तीव्र झाली आहे. गावागावातील जलस्त्रोत तळाला गेले आहे. इसापूर धरणाचे पाणी नदीपात्रात सोडावे, यासाठी नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. दरवर्षी कृती आराखड्याच्या माध्यमातून कोट्यवधींचा खर्च पाणीटंचाईवर होतो. मात्र त्याचा परिणाम वर्षभरही जाणवत नाही.उमरखेड तालुक्याच्या दक्षिण बाजूने पैनगंगा नदी वाहते. तर पुसद तालुक्यात असलेल्या इसापूर धरणाचा डावा कालवा तालुक्यातून जातो. या तालुक्यात सुपीक जमीन आहे. मात्र अथांग पात्र असलेली पैनगंगा गत काही वर्षांपासून कोरडी पडत आहे. पूर्वी पैनगंगा बाराही महिने खळखळ वाहात असायची. परंतु इसापूर धरण झाले तेव्हापासून पावसाळ्यात पुराचा तडाका आणि उन्हाळ्यात पाणीटंचाई असे समीकरण झाले आहे. पैनगंगा नदी तीरावर तालुक्यातील ४० ते ५० गावे आहेत. या गावांना पाणीपुरवठा करणाºया नळयोजनांच्या विहिरी नदीतीरावर आहे. मात्र यंदा हिवाळ्यातच पैनगंगा आटल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे.माणसांसोबतच जनावरांही पाण्यासाठी भटकंती करावी लागते. उमरखेड तालुका शूगर बेल्ट म्हणून ओळखला जातो. शेकडो शेतकºयांचा ऊस यंदा कारखाना बंद असल्याने शेतातच उभा आहे. या उसाला पाणी देण्याची गरज आहे. मात्र नदीपात्र कोरडे आणि विहिरी तळाला अशा अवस्थेत शेकडो हेक्टरवरील ऊस वाळत आहे. इसापूर धरणाचे पाणी नगरपालिकेसाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे नदीपात्रात पाणी सोडण्याची सुतराम शक्यता यंदा दिसत नाही. गत काही वर्षापासून बंदीभागातील नागरिक पैनगंगेच्या पाण्यासाठी दरवर्षी आंदोलन करतात. जिल्हाधिकाºयांना निवेदन देतात. त्यानंतर कुठे पाणी सोडले जाते. परंतु हे हक्काचे पाणीही मराठवाड्यातील गावे पळवून नेतात. त्यावरून मराठवाडा आणि विदर्भ असा संघर्ष निर्माण होतो.पाणीटंचाईवर दरवर्षी उपाययोजना केल्या जातात. मात्र या उपाययोजना तकलादू स्वरूपाच्या असतात. मे महिन्यापर्यंत कृती आराखड्यातील उपाययोजनांना प्रारंभच केला जात नाही. पावसाळ्याची प्रतीक्षा केली जाते. दरवर्षी निर्माण होणाºया या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय शोधण्याची गरज आहे.लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षतालुक्यात यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र कोणताही लोकप्रतिनिधी या प्रश्नावर आवाज उठवायला तयार नाही. गावागावातील नागरिक लोकप्रतिनिधींना पाणीटंचाईची समस्या सांगत आहेत. मात्र आढावा बैठकांमध्ये तालुक्यातील लोकप्रतिनिधी काही बोलायला तयार नाही. यामुळे नागरिकांमध्ये आता रोष निर्माण होत आहे.

टॅग्स :Waterपाणी