शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
8
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
9
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
10
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
11
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
12
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
13
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
14
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
15
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
16
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
17
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
18
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
19
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...

उमरखेडवर पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 22:20 IST

पैनगंगा नदीसह संपूर्ण तालुक्यात इसापूर धरणाच्या कालव्याचे जाळे असतानाही तालुक्याला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षी तर अपुºया पावसाने हिवाळ्यातच पाणीटंचाई तीव्र झाली आहे.

ठळक मुद्दे पैनगंगा नदी आटली : इसापूर धरणाचे पाणी सोडणार कधी ?

दत्तात्रय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : पैनगंगा नदीसह संपूर्ण तालुक्यात इसापूर धरणाच्या कालव्याचे जाळे असतानाही तालुक्याला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षी तर अपुºया पावसाने हिवाळ्यातच पाणीटंचाई तीव्र झाली आहे. गावागावातील जलस्त्रोत तळाला गेले आहे. इसापूर धरणाचे पाणी नदीपात्रात सोडावे, यासाठी नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. दरवर्षी कृती आराखड्याच्या माध्यमातून कोट्यवधींचा खर्च पाणीटंचाईवर होतो. मात्र त्याचा परिणाम वर्षभरही जाणवत नाही.उमरखेड तालुक्याच्या दक्षिण बाजूने पैनगंगा नदी वाहते. तर पुसद तालुक्यात असलेल्या इसापूर धरणाचा डावा कालवा तालुक्यातून जातो. या तालुक्यात सुपीक जमीन आहे. मात्र अथांग पात्र असलेली पैनगंगा गत काही वर्षांपासून कोरडी पडत आहे. पूर्वी पैनगंगा बाराही महिने खळखळ वाहात असायची. परंतु इसापूर धरण झाले तेव्हापासून पावसाळ्यात पुराचा तडाका आणि उन्हाळ्यात पाणीटंचाई असे समीकरण झाले आहे. पैनगंगा नदी तीरावर तालुक्यातील ४० ते ५० गावे आहेत. या गावांना पाणीपुरवठा करणाºया नळयोजनांच्या विहिरी नदीतीरावर आहे. मात्र यंदा हिवाळ्यातच पैनगंगा आटल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे.माणसांसोबतच जनावरांही पाण्यासाठी भटकंती करावी लागते. उमरखेड तालुका शूगर बेल्ट म्हणून ओळखला जातो. शेकडो शेतकºयांचा ऊस यंदा कारखाना बंद असल्याने शेतातच उभा आहे. या उसाला पाणी देण्याची गरज आहे. मात्र नदीपात्र कोरडे आणि विहिरी तळाला अशा अवस्थेत शेकडो हेक्टरवरील ऊस वाळत आहे. इसापूर धरणाचे पाणी नगरपालिकेसाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे नदीपात्रात पाणी सोडण्याची सुतराम शक्यता यंदा दिसत नाही. गत काही वर्षापासून बंदीभागातील नागरिक पैनगंगेच्या पाण्यासाठी दरवर्षी आंदोलन करतात. जिल्हाधिकाºयांना निवेदन देतात. त्यानंतर कुठे पाणी सोडले जाते. परंतु हे हक्काचे पाणीही मराठवाड्यातील गावे पळवून नेतात. त्यावरून मराठवाडा आणि विदर्भ असा संघर्ष निर्माण होतो.पाणीटंचाईवर दरवर्षी उपाययोजना केल्या जातात. मात्र या उपाययोजना तकलादू स्वरूपाच्या असतात. मे महिन्यापर्यंत कृती आराखड्यातील उपाययोजनांना प्रारंभच केला जात नाही. पावसाळ्याची प्रतीक्षा केली जाते. दरवर्षी निर्माण होणाºया या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय शोधण्याची गरज आहे.लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षतालुक्यात यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र कोणताही लोकप्रतिनिधी या प्रश्नावर आवाज उठवायला तयार नाही. गावागावातील नागरिक लोकप्रतिनिधींना पाणीटंचाईची समस्या सांगत आहेत. मात्र आढावा बैठकांमध्ये तालुक्यातील लोकप्रतिनिधी काही बोलायला तयार नाही. यामुळे नागरिकांमध्ये आता रोष निर्माण होत आहे.

टॅग्स :Waterपाणी