शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

उमरखेडवर पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 22:20 IST

पैनगंगा नदीसह संपूर्ण तालुक्यात इसापूर धरणाच्या कालव्याचे जाळे असतानाही तालुक्याला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षी तर अपुºया पावसाने हिवाळ्यातच पाणीटंचाई तीव्र झाली आहे.

ठळक मुद्दे पैनगंगा नदी आटली : इसापूर धरणाचे पाणी सोडणार कधी ?

दत्तात्रय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : पैनगंगा नदीसह संपूर्ण तालुक्यात इसापूर धरणाच्या कालव्याचे जाळे असतानाही तालुक्याला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षी तर अपुºया पावसाने हिवाळ्यातच पाणीटंचाई तीव्र झाली आहे. गावागावातील जलस्त्रोत तळाला गेले आहे. इसापूर धरणाचे पाणी नदीपात्रात सोडावे, यासाठी नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. दरवर्षी कृती आराखड्याच्या माध्यमातून कोट्यवधींचा खर्च पाणीटंचाईवर होतो. मात्र त्याचा परिणाम वर्षभरही जाणवत नाही.उमरखेड तालुक्याच्या दक्षिण बाजूने पैनगंगा नदी वाहते. तर पुसद तालुक्यात असलेल्या इसापूर धरणाचा डावा कालवा तालुक्यातून जातो. या तालुक्यात सुपीक जमीन आहे. मात्र अथांग पात्र असलेली पैनगंगा गत काही वर्षांपासून कोरडी पडत आहे. पूर्वी पैनगंगा बाराही महिने खळखळ वाहात असायची. परंतु इसापूर धरण झाले तेव्हापासून पावसाळ्यात पुराचा तडाका आणि उन्हाळ्यात पाणीटंचाई असे समीकरण झाले आहे. पैनगंगा नदी तीरावर तालुक्यातील ४० ते ५० गावे आहेत. या गावांना पाणीपुरवठा करणाºया नळयोजनांच्या विहिरी नदीतीरावर आहे. मात्र यंदा हिवाळ्यातच पैनगंगा आटल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे.माणसांसोबतच जनावरांही पाण्यासाठी भटकंती करावी लागते. उमरखेड तालुका शूगर बेल्ट म्हणून ओळखला जातो. शेकडो शेतकºयांचा ऊस यंदा कारखाना बंद असल्याने शेतातच उभा आहे. या उसाला पाणी देण्याची गरज आहे. मात्र नदीपात्र कोरडे आणि विहिरी तळाला अशा अवस्थेत शेकडो हेक्टरवरील ऊस वाळत आहे. इसापूर धरणाचे पाणी नगरपालिकेसाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे नदीपात्रात पाणी सोडण्याची सुतराम शक्यता यंदा दिसत नाही. गत काही वर्षापासून बंदीभागातील नागरिक पैनगंगेच्या पाण्यासाठी दरवर्षी आंदोलन करतात. जिल्हाधिकाºयांना निवेदन देतात. त्यानंतर कुठे पाणी सोडले जाते. परंतु हे हक्काचे पाणीही मराठवाड्यातील गावे पळवून नेतात. त्यावरून मराठवाडा आणि विदर्भ असा संघर्ष निर्माण होतो.पाणीटंचाईवर दरवर्षी उपाययोजना केल्या जातात. मात्र या उपाययोजना तकलादू स्वरूपाच्या असतात. मे महिन्यापर्यंत कृती आराखड्यातील उपाययोजनांना प्रारंभच केला जात नाही. पावसाळ्याची प्रतीक्षा केली जाते. दरवर्षी निर्माण होणाºया या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय शोधण्याची गरज आहे.लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षतालुक्यात यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र कोणताही लोकप्रतिनिधी या प्रश्नावर आवाज उठवायला तयार नाही. गावागावातील नागरिक लोकप्रतिनिधींना पाणीटंचाईची समस्या सांगत आहेत. मात्र आढावा बैठकांमध्ये तालुक्यातील लोकप्रतिनिधी काही बोलायला तयार नाही. यामुळे नागरिकांमध्ये आता रोष निर्माण होत आहे.

टॅग्स :Waterपाणी