शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

वणी तालुक्यावर पाणी टंचाईचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 10:37 PM

दरवर्षीप्रमाणे यंदाही वणी तालुक्याला पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागणार आहे. मागील हंगामात अतिशय कमी पाऊस झाल्याने तालुक्यातील नाले, तलाव कोरडे पडले आहे. त्यामुळे आतापासूनच ग्रामीण भागात पाणी टंचाईची धग जाणवू लागली आहे.

ठळक मुद्देउपाययोजनांना वरिष्ठांकडे ब्रेक : पेटुरचा प्रश्न सुटला, नायगावला टँकरची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : दरवर्षीप्रमाणे यंदाही वणी तालुक्याला पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागणार आहे. मागील हंगामात अतिशय कमी पाऊस झाल्याने तालुक्यातील नाले, तलाव कोरडे पडले आहे. त्यामुळे आतापासूनच ग्रामीण भागात पाणी टंचाईची धग जाणवू लागली आहे. यावर स्थानिक प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी वरिष्ठ पातळीवर मात्र या उपाययोजनांना ब्रेक लागल्याचे दिसत आहे.वणी तालुक्यातील नायगाव (खु.) येथे पिण्यासाठी जलस्त्रोत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे. त्यामुळे या गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा व्हावा, यासाठीचा प्रस्ताव दोन महिन्यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला. परंतु तो अद्यापही तेथे धूळ खात पडून आहे. नायगाव (खु.) ची लोकसंख्या एक हजार १२५ आहे. या गावात पिण्यायोग्य पाणी नसल्याने गावकऱ्यांना टँकरची प्रतीक्षा आहे. तालुक्यातील पेटूर येथे मागील वर्षापर्यंत नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला. परंतु गावकºयांनी सतत केलेल्या पाठपुराव्यानंतर या गावाला मानकी येथील बोअरवेलवरून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. यावर्षी या गावाची चिंता मिटली आहे. तालुक्यातील गोपालपूर, वरझडी, वरझडी बंडा, वडगाव (टीप), खांदला, कुर्ली या गावांमध्ये बोअर अधिग्रहण करून गावकºयांना पाणी पुरविले जात आहे.संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ उमरी येथे बोअर अधिग्रहणाचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाºयांनी मंजूर केला असला तरी अद्याप अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. निंबाळा (बु.) या गावाला पाणी पुरवठा करणाºया बोअरवेल अधिग्रहणाचा प्रस्ताव आराखड्यात मंजूर करण्यात आला. परंतु आराखडा अद्यापही अप्राप्त आहे. वणी तालुक्यातील सावंगी या गावातही पाणी पेटले आहे. या गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा प्रस्तावित आहे. पिंपरी (कायर), तेजापूर येथेही तिच परिस्थिती आहे.पाण्याअभावी जनावरांचेही होणार हालजंगलातील तलाव, नाले व अन्य जलस्त्रोत आतापासूनच कोरडे पडले आहेत. त्यामुळे पाण्यासाठी आतापासूनच जनावरांचे हाल सुरू झाले आहे. वणी, मारेगाव व झरी या तीन तालुक्यात घनदाट जंगल आहे. या जंगलात वन्यजिवांची संख्याही मोठी आहे. मात्र पाण्याअभावी या वन्यजिवांचेही हाल होणार आहे. पाळीव जनावरे चरण्यासाठी जंगलात जातात. परंतु त्यांना त्याठिकाणी पिण्यासाठी पाणीच उपलब्ध नसल्याचे चित्र परिसरातील जंगलांमध्ये पाहावयाला मिळत आहे. यंदा माणसांसोबत जनावरांचेदेखिल पाण्यासाठी हाल होणार आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई