शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

ओला शेतमाल ठेवण्यास वखार महामंडळाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 11:05 AM

परतीच्या पावसाने शेतमालाची प्रत घसरली आहे. या धान्याला खुल्या बाजारात कमी दर मिळत आहे. असे धान्य सुरक्षित करण्यासाठी शेतकऱ्यांनी वखार महामंडळाकडे धाव घेतली. गुणवत्ता घसरलेला शेतमाल स्वीकारण्यास वखार महामंडळांनी नकार दिला आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने प्रत घसरली छोटे कर्ज मंजूर करताना बँकांनी झटकले हात

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परतीच्या पावसाने शेतमालाची प्रत घसरली आहे. या धान्याला खुल्या बाजारात कमी दर मिळत आहे. असे धान्य सुरक्षित करण्यासाठी शेतकऱ्यांनी वखार महामंडळाकडे धाव घेतली. गुणवत्ता घसरलेला शेतमाल स्वीकारण्यास वखार महामंडळांनी नकार दिला आहे. तर खासगी गोदामातील धान्यावर कर्ज देताना बँकांनी हात झटकले आहेत.खुल्या बाजारात शेतमालाचे दर पडल्यास शेतमालास संरक्षण देणारी यंत्रणा उभी करण्यात आली. त्याकरिता राज्य वखार महांमडळ आणि केंद्रीय वखार महामंडळाची निर्मिती करण्यात आली. वखार महामंडळात शासकीय धान्यासोबत शेतमाल ठेवण्याची तरतूद आहे. वखार महामंडळाच्या क्षमतेनुसार हे धान्य ठेवले जाते. या ठिकाणी ठेवलेल्या धान्यावर तारण दिले जाते. त्याचे व्याजदर अत्यल्प असतात.तारण म्हणून ठेवलेल्या धान्याला बँका खुल्या बाजारातील दराच्या ७० टक्के कर्ज देते. यामुळे दर पडलेल्या अवस्थेत शेतकरी वखार महामंडळाच्या गोदामाकडे धाव घेतात. यावर्षी सोयाबीनचे दर घसरले आहेत. गुणवत्ता घसरलेल्या धान्याला संरक्षण मिळावे म्हणून शेतकऱ्यांनी असे धान्य वेअर हाऊसकडे हलविले. मात्र वखार महामंडळांनी धान्य नियमात बसत नाही म्हणून नाकारले आहे. परतीच्या पावसाने भिजलेले धान्य खराब होणार या भीतीने वखार महामंडळ असे धान्य ठेवण्यासाठी तयार नाही. बँकाही अशा धान्यावर कर्ज देण्यास तयार नाही. यातून शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.व्यापाऱ्यांची संख्या घटलीखरेदी झालेले धान्य ठेवायचे, त्यावर कर्ज घ्यायचे आणि नव्याने व्यापार करायचा, असा वखार महामंडळाचा व्यवहार चालत होता. आता गोदामात धान्यच स्वीकारले गेले नाही. यामुळे पैशाची गुंतवणूक थांबली आहे. बाजारात धान्य खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या घटली आहे.नियमानुसार, १२ ते १४ टक्के ओलावा असणारा शेतमालच गोदामात ठेवता येतो. यापेक्षा जास्त ओलावा असणारा शेतमाल घेतला जात नाही. तो वाळवून आणल्यानंतरच ठेवण्यास परवानगी दिली जाते. अन्यथा बुरशीने शेतकºयांच्या मालासह इतरही शेतमाल खराब होतो. चांगल्या मालास कुठलीही हरकत नाही.- भास्कर भगत, प्रभारी व्यवस्थापक, केंद्रीय वखार महामंडळ, यवतमाळ

टॅग्स :agricultureशेती