शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

आरटीईतील बदलाने विदर्भाला झाला फायदा

By अविनाश साबापुरे | Published: May 17, 2024 4:59 PM

चार हजार जागा वाढल्या : गडचिरोली वगळता सर्वत्र शाळाही वाढल्या

यवतमाळ : यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत सरकारने केलेले बदल न्यायालयाने स्थगित केले. आता शुक्रवारपासून सुधारित पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या उलथापालथीत विदर्भातील गोरगरीब विद्यार्थ्यांचा घसघशीत फायदा होणार आहे. कारण बदललेल्या प्रक्रियेत मोफत शाळा प्रवेशासाठी विदर्भात तब्बल चार हजार जागा मागील वर्षीच्या तुलनेत वाढल्या आहेत. तर गडचिरोली वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये शाळांची संख्याही वाढली आहे.

मागील वर्षी म्हणजेच २०२३-२४ या सत्रात आरटीई अंतर्गत मोफत शाळा प्रवेशासाठी विदर्भाच्या ११ जिल्ह्यांमध्ये दोन हजार १८२ शाळांनी सहभाग घेतला होता. परंतु, यंदा २०२४-२५ या सत्राच्या प्रवेश प्रक्रियेत विदर्भातील दोन हजार २४८ शाळांनी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी १७ हजार ७१७ जागा मोफत प्रवेशासाठी राखीव करण्यात आल्या होत्या. त्यातुलनेत यंदा राखीव जागा तीन हजार ९७१ इतक्या वाढून एकूण राखीव जागांची संख्या २१ हजार ६८८ इतकी झाली आहे.

हीच बाब विदर्भाव्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रातही घडली आहे. यंदा राज्य शासनाने आरटीई प्रवेश प्रक्रियेत सुरुवातीला खासगी अनुदानित, स्वयंअर्थसहायित शाळांसोबतच शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचीही नोंदणी बंधनकारक केली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील तब्बल ७६ हजार ५३ शाळांची नोंदणी झाली होती. तर आठ लाख ८६ हजार ४११ इतक्या जागा राखीव दाखविण्यात आल्या होत्या. परंतु, अर्ज भरताना खासगी स्वयअर्थसहायित शाळांच्या जागाच दिसत नसल्याने पालकांचा रोष वाढला होता. या प्रकरणात न्यायालयाने शासनाने केलेल्या बदलांना स्थगिती दिली. आता १७ ते ३१ मेपर्यंत जुन्यात पद्धतीने पालकांकडून अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात अनुदानित, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा वगळल्याने आता शाळांची संख्याही घटली आहे. परंतु, मागील वर्षीचा विचार करता शाळांची ही संख्या अधिक आहे. यंदा महाराष्ट्रातील नऊ हजार १३९ शाळांनी या प्रक्रियेत सहभाग घेऊन एक लाख दोन हजार ४३६ जागा राखीव ठेवल्या आहेत. तर मागील वर्षी आठ हजार ८२८ शाळांनी नोंदणी करुन एक लाख एक हजार ९६९ जागा राखीव ठेवल्या होत्या. त्यामुळे यंदा ३११ शाळा आणि ४६७ जागा वाढलेल्या आहेत.

विदर्भात असा झाला फायदाजिल्हा : मागील शाळा/जागा : यंदाच्या शाळा/जागाअकोला : १९०/१२१५                 : १९६/२०१०अमरावती : २३६/१९९८              : २३१/२३६९बुलडाणा : २२७/१७७८               : २३४/२५८१यवतमाळ : १९४/२४४०                : २१०/१९६६वाशिम : ९९/९५०                         : १०९/९५३चंद्रपूर : १८६/१८४६                      : १९९/१५१६गडचिरोली : ६६/१५७४                : ६६/४८४भंडारा : ८९/९५५                           : ९१/७७२गोंदिया : १३१/१२२५                     : १३२/९०३नागपूर : ६५३/२६१८                     : ६५५/६९२०वर्धा : १११/१११८                              : १२६/१२१४एकूण : २१८२/१७,७१७                  : २२४९/२१,६८८

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाVidarbhaविदर्भYavatmalयवतमाळ