शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

पुसद येथे भाजीपाला, फळविक्रेत्यांचे शहर पोलीस ठाण्यासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 10:33 PM

येथील शिवाजी चौकात गेल्या २0 वर्षांपासून भाजीपाला व फळ विक्रेते व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र १५ दिवसांपूर्वी त्यांच्या हातगाडी शहर पोलिसांनी हटविल्या. त्यामुळे त्यांनी शहर पोलीस ठाण्यासमोरच आमरण उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्देपाचवा दिवस । प्रशासनाकडून अद्यापही दखल नाही, पर्यायी जागा देण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : येथील शिवाजी चौकात गेल्या २0 वर्षांपासून भाजीपाला व फळ विक्रेते व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र १५ दिवसांपूर्वी त्यांच्या हातगाडी शहर पोलिसांनी हटविल्या. त्यामुळे त्यांनी शहर पोलीस ठाण्यासमोरच आमरण उपोषण सुरू केले आहे.शहरचे ठाणेदार प्रमेश आत्राम यांनी गेल्या १५ दिवसांपूर्वी वाहतुकीला अडथळा होतो म्हणून भाजीपाला व फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या हटविल्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली. त्यांचा व्यवसाय पूर्णपणे बंद झाला. तेथे आता शहर पोलीस ठाण्याचे मोठे वाहन आणून उभे केले जाते. तसेच तेथे इतरही वाहने उभी राहतात. त्या वाहनांचा वाहतुकीला अडथळा होत नाही कां, आम्ही हातगाडी लावली तरच वाहतुकीला अडथळा निर्माण होतो का, असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी विचारला आहे.शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण करून दुकाने थाटण्यात आली. त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. मग आमच्यावरच अन्याय का, असा त्यांचा प्रश्न आहे. उपोषणकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्याच ठिकाणी हातगाडी लावण्याची किंवा पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना झाली नाही.१४ आॅगस्टपासून २२ भाजी व फळ विक्रेते साखळी उपोषणाला बसले आहे. जोपर्यंत त्याच ठिकाणी किंवा पर्यायी जागा मिळत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार विष्णू सरकटे, विलास उबाळे, सै.सलीम, मनसूर शेख, शेख अनसार, गणेश खाडे, शेख जावेद, सै.मुजिबोद्दीन, साकीब अहेमद, शेख जाकीर, अशोक चोपडे, शेख ईसराईल, रुकमाबाई सुकळकर, मंदाबाई चोपडे, यांच्यासह सर्वच भाजी व फळ विक्रेत्यांनी केला आहे.खुल्या जागेतील वाहनांचा अडथळा नाही का ?पोलिसांनी भाजीपाला व फळविक्रेत्यांना हटवून जागा खुली केली. त्याच जागी आता पोलिसांच्या वाहनासह इतर वाहने उभी राहतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत नाही का, असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी केला आहे. शिवाय शहरात इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून दुकाने थाटली. ही दुकाने का हटविली जात नाही, असा संतप्त प्रश्न उपोषणकर्त्यांनी प्रशासनाला विचारला आहे. विशेष म्हणजे शहरातील अनेक चौकात अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्याकडे पोलीस सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. केवळ गरिबांच्याच व्यवसायावर घाला का घातला जातो, असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :vegetableभाज्याStrikeसंप