शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

राज्यातील वृक्षलागवड मोहीम बनली लोकचळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 8:29 PM

राज्य शासनाने हाती घेतलेली वृक्षलागवड मोहीम ही लोकचळवळ झाली आहे. या मोहिमेबद्दल नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याचे निदर्शनास येते.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांनी घेतला वृक्षलागवड, प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा आढावायवतमाळात ‘आॅक्सीजन पार्क’

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने हाती घेतलेली वृक्षलागवड मोहीम ही लोकचळवळ झाली आहे. या मोहिमेबद्दल नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याचे निदर्शनास येते. तसेच २०१८-१९ मध्ये राष्ट्रीयस्तरावर प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचे तीन लक्ष कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात महाराष्ट्राचा वाटा ५० हजार कोटी रुपयांचा राहणार आहे. या दोन्ही महत्वकांक्षी योजना आपापल्या जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रशासनाने ‘वन से धन तक’ ही संकल्पना राबवावी, अशा सूचना अर्थ व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात १३ कोटी वृक्षलागवड मोहीम व प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा व्हीसीद्वारे आढावा घेताना ते बोलत होते. वृक्ष लागवड मोहिमेत पारदर्शकता आवश्यक आहे, असे सांगून वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, टीकाकारांना संधी देऊ नका. पारदर्शकपणे सर्व गोष्टी नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यवतमाळात ‘आॅक्सीजन पार्क’१ ते ३१ जुलैपर्यंत या उपक्रमाची अंमलबजावणी करायची आहे. त्यानंतर वृक्षांच्या संवर्धनावर भर द्या. वृक्ष लागवड मोहिमेदरम्यान यवतमाळमध्ये साकारण्यात येणारे ‘आॅक्सीजन पार्क’ ही संकल्पना नाविण्यपूर्ण व चांगली आहे. तसेच जिल्ह्यात उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत ‘एक गॅस-एक वृक्ष’ ही संकल्पना राबवावी. जिल्ह्याचा आराखडा तयार करताना वृक्षलागवडीसाठी शहराचासुद्धा आराखडा पालिकेने तयार करावा. जलयुक्त शिवारला वनयुक्त शिवारमध्ये बदलवा. स्मशानभूमीत तसेच शाळेच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करावी. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात वनऔषधी लावण्याचे नियोजन करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा आढावा घेताना त्यांनी मुद्रा बँक जिल्हा नियोजन समन्वय समितीत अशासकीय सदस्यांनी त्वरित नेमणूक करण्याचे आदेश दिले. बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आयईसी प्लान तयार करून बँकांनी उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश दिले. बैठकीला सीईओ जलज शर्मा, उपवनसंरक्षक डॉ.भानुदास पिंगळे, अरविंद मुढे, अभर्णा, जिल्हा नियोजन अधिकारी डी.टी.राठोड, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन आदी उपस्थित होते.५९ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्टयवतमाळ जिल्ह्याला ५९ लाख १७ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी आतापर्यंत ५५ लाख ८८ हजार खड्डे पूर्ण करण्यात आले. राज्यात चौथ्या क्रमांकाचे हे उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी वनमंत्र्यांना दिली.

टॅग्स :Natureनिसर्गSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार