शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

शेतकऱ्यांवर कापूस सुकविण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 5:00 AM

जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के पाऊस झाला आहे. आणखीही पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. परतीचा पाऊस आणखी यायचा असल्याचे सांगितले जाते. आधीच झालेल्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असताना हवामान खात्याने आणखी पाऊस येण्याचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या छातीत धडकी भरली आहे.

ठळक मुद्देअतिवृष्टीचा परिणाम। सीसीआय, पणन, खासगी कापूस खरेदी लांबणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी जिल्ह्याच्या विविध भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिके हातची गेली. सुरुवातीला पेरलेला कापूस पावसामुळे ओला झाला. हा कापूस आता सुकविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के पाऊस झाला आहे. आणखीही पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. परतीचा पाऊस आणखी यायचा असल्याचे सांगितले जाते. आधीच झालेल्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असताना हवामान खात्याने आणखी पाऊस येण्याचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या छातीत धडकी भरली आहे. आणखी पाऊस आल्यास हाती असलेले छुटपुट पीकही पावसात वाहून जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरमध्ये कापूस आहे. कमी जास्त प्रमाणात तेवढेच क्षेत्र सोयाबीनचे आहेत. परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या हातचा सोयाबीन गेला. कपाशीवर रोगाचा प्रादूर्भाव आहे. कुठे कपाशीचे झाड वाढले, मात्र त्याला बोंडे नाहीत तर कुठे पावसामुळे बोंडे तडकल्याची स्थिती आहे. सुरुवातीला पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या हाती थोडाबहुत कापूस लागला आहे. मात्र तोही ओला झाला आहे. त्यामुळे सध्या हा कापूस वाळविण्याची मोहीम अनेक गावात पहायला मिळते.आतापर्यंत सुरू असलेला पाऊस व पुन्हा पावसाची चिन्हे असल्याने यावेळी विक्रीसाठी येणारा कापूस ओला राहू शकतो, याचा अंदाज खरेदीदारांना आला आहे. त्यामुळेच अद्यापही खासगी व्यापाऱ्यांनी कापसाची खरेदी सुरू केलेली नाही. खेडा खरेदी यावेळी लांबण्याची व आॅक्टोबर अखेरीस सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.शासनाकडून सीसीआय, पणन महासंघामार्फत हमी भावानुसार होणारी कापूस खरेदी सुरू होण्याची चिन्हे नाहीत. शासनालाही विक्रीसाठी ओला कापूस येण्याची भीती असावी, त्यामुळेच की काय शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ लांबणीवर टाकला जाण्याची चिन्हे दिसू लागली आहे.मृग नक्षत्रात पेरलेला कापूस आला घरातकापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात कापसाचे खरीप हंगामात साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील २० ते ३० हजार हेक्टर क्षेत्रात मृगनक्षत्रात सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्या शेतकऱ्यांचा कापूस वेचणी होऊन घरात आला आहे. या काळात पाऊस झाल्याने हा कापूस ओला झाला. पर्यायाने अनेक गावात घरासमोर ओला झालेला कापूस सुकविण्यासाठी उन्हात वाळू घातल्याचे हे चित्र जिल्ह्यात सर्वदूर पहायला मिळते.

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस