शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

संमेलनातून प्रतिभावंत साहित्यिक घडतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 10:49 PM

बाल साहित्य संमेलन हे बालकांच्या सुप्त गुणांना वाव देणारे व्यासपीठ आहे. या संमेलनातून भविष्यात नक्कीच प्रतिभावंत साहित्यिक घडतील. बालकांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता बाल साहित्य संमेलनाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन राजुदास जाधव यांनी केले.

ठळक मुद्देराजुदास जाधव : येळाबारा येथे बाल साहित्य संमेलन, कविता आणि चित्रांच्या प्रदर्शनाने वेधले लक्ष

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : बाल साहित्य संमेलन हे बालकांच्या सुप्त गुणांना वाव देणारे व्यासपीठ आहे. या संमेलनातून भविष्यात नक्कीच प्रतिभावंत साहित्यिक घडतील. बालकांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता बाल साहित्य संमेलनाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन राजुदास जाधव यांनी केले.यवतमाळ तालुक्यातील येळाबारा येथे टाटा ट्रस्ट, वर्ल्ड व्हिजन इंडिया, जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान आणि २१ गावातील शाळा व्यवस्थापन समिती फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसºया बाल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. भविष्यात शासन पातळीवरसुद्धा अशा आगळ्यावेगळ्या संमेलनाची दखल शासनाने घेतली पाहिजे, कारण याच बालकांमधून पुढे समाज परिवर्तन करणारे साहित्यिक निर्माण होणार आहे, असेही राजुदास जाधव योवळी म्हणाले.मुलांनी स्वत: लिहिलेल्या कविता आणि काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन संमेलनस्थळी लावले होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शाह, पंचायत समिती सदस्य सूमन गावंडे, राजू गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. वर्ल्ड व्हिजन प्रकल्पचे संचालक राजेंद्र सूर्यवंशी, शाळा व्यवस्थापन समिती फेडरेशनचे अध्यक्ष मनोहर विरूडकर, जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज भोयर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.प्रास्ताविक सुनील भेले यांनी केले. संचालन व आभार संतोष पिंगळे यांनी मानले. व्यवस्थापन आकाश चंदनखेडे यांनी सांभाळले. प्रा. घनश्याम दरणे, सुनील कदम यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप झाला.६४ बालकवींच्या कवितासंमेलनात ६४ बालकवींनी विविध विषयांवर आपल्या कविता सादर केल्या. पाठ्यपुस्तकातील पाठावर पपेटसारख्या विविध माध्यमाने नाट्यकर, माध्यमांतर सादर करण्यात आले होते. काव्यसंमेलनाचे संचालन संबोधी भेले हिने केले. चित्रकाव्य प्रदर्शन पाहण्यासाठी एकच झुंबड उडाली होती.शाळा बंद धोरणाचा निषेधसंमेलनात विविध ठराव घेण्यात आले. हातगाव येथील यश बल्की यांनी ३० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या शासन धोरणाचा निषेध करण्यात येत आहे आणि शाळा व्यवस्थापन समिती फेडरेशनच्या आंदोलनास पाठिंबा देत आहे, असा ठराव मांडला. बाल साहित्य संमेलनाचे शासनस्तरावर आयोजन व्हावे, असाही ठराव घेतला गेला.