शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
3
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
4
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
5
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
6
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
7
पुतीन परतले, पुढे...?
8
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
9
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
10
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
11
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
12
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
13
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
15
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
16
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
17
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
18
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
19
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
20
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळातील घनकचऱ्यावर प्रक्रियाच नाही; प्रदूषणामुळे आरोग्य, पर्यावरणाला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 18:25 IST

प्रदूषण कसे रोखणार? : मृत जनावरांसह जैविक कचराही थेट फेकला जातो जंगलात

सुरेंद्र राऊत लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शहराचा विस्तार झाला. नगरपरिषदेमध्ये सात ग्रामपंचायती २०१६ मध्ये समाविष्ट झाल्या. तरीही शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायम आहे. नगरपालिकेकडे सावरगड कचरा डेपो वगळता इतर कुठलीही हक्काची जागा नाही. थोडी बहुत शेती भाडेपट्ट्यावर घेऊन संपूर्ण कचरा वन विभागाच्या हद्दीत फेकला जात आहे. कचरा उघड्यावर टाकायचा, तो जाळून नष्ट करायचा असा प्रकार सुरू आहे. यामुळे मानवी आरोग्यासह पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.

यवतमाळ शहरात एकूण २८ प्रभाग आहे. येथे दिवसाला ११० मेट्रिक टन घनकचरा निघतो. या घनकचऱ्याचे नियोजन करण्यासाठी चार झोन तयार केले आहे. त्यापैकी झोन क्र. १ व ४ येथे निघणारा घनकचरा बेमुर्वतपणे कोणतेही नियम न पाळता उघड्यावर फेकला जात आहे. यवतमाळकरांची घाण टाकळी जंगल परिसर व शेतशिवारात सोडण्यात येत आहे. यातून टाकळी तलाव भविष्यात दूषित होण्याच्या स्थितीत आला आहे. 

नगरपरिषदेने स्वच्छ व सुंदर शहरासाठी वर्षाला १२ कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. शहरातून घंटागाडी, ट्रॅक्टर या माध्यमातून कचरा संकलन केले जाते. अर्थात ही प्रक्रिया पूर्ण नियंत्रणात नाही. काही भागात घंटागाड्या चार दिवस पोहोचत नाही. अशा वेळी परिसरातील नागरिक कचरा उघड्यावर टाकतात. दुर्गंधी सुटायला लागली की, कधी तरी ट्रॅक्टर किंवा घंटागाडी येऊन तो कचरा घेऊन जातात. 

टाकळी येथे कचरा टाकण्यासाठी जाण्यास योग्य रस्ता नाही. त्यामुळे पावसाळ्यात बरेचदा जागा मिळेल त्या ठिकाणी कचऱ्याचे ट्रॅक्टर, घंटागाडी रिकामी केली जाते. यामुळे यवतमाळ शहराच्याच पिंपळगाव परिसरात दुर्गंधी निर्माण होते. पर्यावरण प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडून घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी निकष ठरवून देण्यात आले आहे. या अधीन राहूनच नगरपरिषदेला केंद्र सरकारकडून वित्त आयोगाचा निधी प्राप्त होतो. प्रत्यक्षात मात्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे निकष पायदळी तुडविले जात आहे. यातूनच ही समस्या उभी ठाकली आहे. 

कुजलेली जनावरे उघड्यावर शहरात भटके कुत्रे, डुक्कर, जनावरे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृतदेह खोल खड्डा करून जमिनीत पुरणे अपेक्षित आहे. असे न करता ट्रॅक्टरमध्ये मेलेल्या प्राण्यांना टाकून थेट टाकळी जंगल परिसरात फेकले जात आहे.

रुग्णालयातील कचरा उघड्यावररुग्णालयातून वॉर्डात उरलेले अन्न, फळांच्या साली व इतर कचरा नग रपालिका उचलते. या कचऱ्या- सोबत जैविक कचराही आणला जात आहे. हा कचरासुद्धा उघड्यावर जंगल परिसरात फेकण्यात येत आहे.

धामणगाव बायपासवर तशीच स्थितीशहरातील तलाव फैल परिसराला लागून असलेल्या धामणगाव बायपासजवळ नगरपा- लिकेने भाडेतत्त्वावर शेत घेतले आहे. या शेतातसुद्धा शहरातील कचरा टाकला जात आहे. त्यावर कोणतीच प्रक्रिया होत नाही. कचऱ्याचे ढीग जेसीबीने सपाट केले जातात. नंतर त्यात आग लावली जाते. यातील प्लास्टिक व इतर अनेक टाकावू वस्तू जळल्याने विषारी धूर बाहेर पडतो. यातून पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. शिवाय परिसरातील नाल्यामध्ये घाण जात आहे, हे पाणी थेट बोरगाव डॅमपर्यंत जाते. यावरून ही प्रदूषणाची साखळी नगरपालिकेच्या चुकीमुळे लांबपर्यंत पोहोचली आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणYavatmalयवतमाळ