शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

यवतमाळातील घनकचऱ्यावर प्रक्रियाच नाही; प्रदूषणामुळे आरोग्य, पर्यावरणाला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 18:25 IST

प्रदूषण कसे रोखणार? : मृत जनावरांसह जैविक कचराही थेट फेकला जातो जंगलात

सुरेंद्र राऊत लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शहराचा विस्तार झाला. नगरपरिषदेमध्ये सात ग्रामपंचायती २०१६ मध्ये समाविष्ट झाल्या. तरीही शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायम आहे. नगरपालिकेकडे सावरगड कचरा डेपो वगळता इतर कुठलीही हक्काची जागा नाही. थोडी बहुत शेती भाडेपट्ट्यावर घेऊन संपूर्ण कचरा वन विभागाच्या हद्दीत फेकला जात आहे. कचरा उघड्यावर टाकायचा, तो जाळून नष्ट करायचा असा प्रकार सुरू आहे. यामुळे मानवी आरोग्यासह पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.

यवतमाळ शहरात एकूण २८ प्रभाग आहे. येथे दिवसाला ११० मेट्रिक टन घनकचरा निघतो. या घनकचऱ्याचे नियोजन करण्यासाठी चार झोन तयार केले आहे. त्यापैकी झोन क्र. १ व ४ येथे निघणारा घनकचरा बेमुर्वतपणे कोणतेही नियम न पाळता उघड्यावर फेकला जात आहे. यवतमाळकरांची घाण टाकळी जंगल परिसर व शेतशिवारात सोडण्यात येत आहे. यातून टाकळी तलाव भविष्यात दूषित होण्याच्या स्थितीत आला आहे. 

नगरपरिषदेने स्वच्छ व सुंदर शहरासाठी वर्षाला १२ कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. शहरातून घंटागाडी, ट्रॅक्टर या माध्यमातून कचरा संकलन केले जाते. अर्थात ही प्रक्रिया पूर्ण नियंत्रणात नाही. काही भागात घंटागाड्या चार दिवस पोहोचत नाही. अशा वेळी परिसरातील नागरिक कचरा उघड्यावर टाकतात. दुर्गंधी सुटायला लागली की, कधी तरी ट्रॅक्टर किंवा घंटागाडी येऊन तो कचरा घेऊन जातात. 

टाकळी येथे कचरा टाकण्यासाठी जाण्यास योग्य रस्ता नाही. त्यामुळे पावसाळ्यात बरेचदा जागा मिळेल त्या ठिकाणी कचऱ्याचे ट्रॅक्टर, घंटागाडी रिकामी केली जाते. यामुळे यवतमाळ शहराच्याच पिंपळगाव परिसरात दुर्गंधी निर्माण होते. पर्यावरण प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडून घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी निकष ठरवून देण्यात आले आहे. या अधीन राहूनच नगरपरिषदेला केंद्र सरकारकडून वित्त आयोगाचा निधी प्राप्त होतो. प्रत्यक्षात मात्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे निकष पायदळी तुडविले जात आहे. यातूनच ही समस्या उभी ठाकली आहे. 

कुजलेली जनावरे उघड्यावर शहरात भटके कुत्रे, डुक्कर, जनावरे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृतदेह खोल खड्डा करून जमिनीत पुरणे अपेक्षित आहे. असे न करता ट्रॅक्टरमध्ये मेलेल्या प्राण्यांना टाकून थेट टाकळी जंगल परिसरात फेकले जात आहे.

रुग्णालयातील कचरा उघड्यावररुग्णालयातून वॉर्डात उरलेले अन्न, फळांच्या साली व इतर कचरा नग रपालिका उचलते. या कचऱ्या- सोबत जैविक कचराही आणला जात आहे. हा कचरासुद्धा उघड्यावर जंगल परिसरात फेकण्यात येत आहे.

धामणगाव बायपासवर तशीच स्थितीशहरातील तलाव फैल परिसराला लागून असलेल्या धामणगाव बायपासजवळ नगरपा- लिकेने भाडेतत्त्वावर शेत घेतले आहे. या शेतातसुद्धा शहरातील कचरा टाकला जात आहे. त्यावर कोणतीच प्रक्रिया होत नाही. कचऱ्याचे ढीग जेसीबीने सपाट केले जातात. नंतर त्यात आग लावली जाते. यातील प्लास्टिक व इतर अनेक टाकावू वस्तू जळल्याने विषारी धूर बाहेर पडतो. यातून पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. शिवाय परिसरातील नाल्यामध्ये घाण जात आहे, हे पाणी थेट बोरगाव डॅमपर्यंत जाते. यावरून ही प्रदूषणाची साखळी नगरपालिकेच्या चुकीमुळे लांबपर्यंत पोहोचली आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणYavatmalयवतमाळ