शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

यवतमाळातील घनकचऱ्यावर प्रक्रियाच नाही; प्रदूषणामुळे आरोग्य, पर्यावरणाला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 18:25 IST

प्रदूषण कसे रोखणार? : मृत जनावरांसह जैविक कचराही थेट फेकला जातो जंगलात

सुरेंद्र राऊत लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शहराचा विस्तार झाला. नगरपरिषदेमध्ये सात ग्रामपंचायती २०१६ मध्ये समाविष्ट झाल्या. तरीही शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायम आहे. नगरपालिकेकडे सावरगड कचरा डेपो वगळता इतर कुठलीही हक्काची जागा नाही. थोडी बहुत शेती भाडेपट्ट्यावर घेऊन संपूर्ण कचरा वन विभागाच्या हद्दीत फेकला जात आहे. कचरा उघड्यावर टाकायचा, तो जाळून नष्ट करायचा असा प्रकार सुरू आहे. यामुळे मानवी आरोग्यासह पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.

यवतमाळ शहरात एकूण २८ प्रभाग आहे. येथे दिवसाला ११० मेट्रिक टन घनकचरा निघतो. या घनकचऱ्याचे नियोजन करण्यासाठी चार झोन तयार केले आहे. त्यापैकी झोन क्र. १ व ४ येथे निघणारा घनकचरा बेमुर्वतपणे कोणतेही नियम न पाळता उघड्यावर फेकला जात आहे. यवतमाळकरांची घाण टाकळी जंगल परिसर व शेतशिवारात सोडण्यात येत आहे. यातून टाकळी तलाव भविष्यात दूषित होण्याच्या स्थितीत आला आहे. 

नगरपरिषदेने स्वच्छ व सुंदर शहरासाठी वर्षाला १२ कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. शहरातून घंटागाडी, ट्रॅक्टर या माध्यमातून कचरा संकलन केले जाते. अर्थात ही प्रक्रिया पूर्ण नियंत्रणात नाही. काही भागात घंटागाड्या चार दिवस पोहोचत नाही. अशा वेळी परिसरातील नागरिक कचरा उघड्यावर टाकतात. दुर्गंधी सुटायला लागली की, कधी तरी ट्रॅक्टर किंवा घंटागाडी येऊन तो कचरा घेऊन जातात. 

टाकळी येथे कचरा टाकण्यासाठी जाण्यास योग्य रस्ता नाही. त्यामुळे पावसाळ्यात बरेचदा जागा मिळेल त्या ठिकाणी कचऱ्याचे ट्रॅक्टर, घंटागाडी रिकामी केली जाते. यामुळे यवतमाळ शहराच्याच पिंपळगाव परिसरात दुर्गंधी निर्माण होते. पर्यावरण प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडून घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी निकष ठरवून देण्यात आले आहे. या अधीन राहूनच नगरपरिषदेला केंद्र सरकारकडून वित्त आयोगाचा निधी प्राप्त होतो. प्रत्यक्षात मात्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे निकष पायदळी तुडविले जात आहे. यातूनच ही समस्या उभी ठाकली आहे. 

कुजलेली जनावरे उघड्यावर शहरात भटके कुत्रे, डुक्कर, जनावरे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृतदेह खोल खड्डा करून जमिनीत पुरणे अपेक्षित आहे. असे न करता ट्रॅक्टरमध्ये मेलेल्या प्राण्यांना टाकून थेट टाकळी जंगल परिसरात फेकले जात आहे.

रुग्णालयातील कचरा उघड्यावररुग्णालयातून वॉर्डात उरलेले अन्न, फळांच्या साली व इतर कचरा नग रपालिका उचलते. या कचऱ्या- सोबत जैविक कचराही आणला जात आहे. हा कचरासुद्धा उघड्यावर जंगल परिसरात फेकण्यात येत आहे.

धामणगाव बायपासवर तशीच स्थितीशहरातील तलाव फैल परिसराला लागून असलेल्या धामणगाव बायपासजवळ नगरपा- लिकेने भाडेतत्त्वावर शेत घेतले आहे. या शेतातसुद्धा शहरातील कचरा टाकला जात आहे. त्यावर कोणतीच प्रक्रिया होत नाही. कचऱ्याचे ढीग जेसीबीने सपाट केले जातात. नंतर त्यात आग लावली जाते. यातील प्लास्टिक व इतर अनेक टाकावू वस्तू जळल्याने विषारी धूर बाहेर पडतो. यातून पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. शिवाय परिसरातील नाल्यामध्ये घाण जात आहे, हे पाणी थेट बोरगाव डॅमपर्यंत जाते. यावरून ही प्रदूषणाची साखळी नगरपालिकेच्या चुकीमुळे लांबपर्यंत पोहोचली आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणYavatmalयवतमाळ