शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक संचालकांमध्ये पडले दोन गट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST

उच्च न्यायालयाने बँकेतील १०५ जागांची भरतीप्रक्रिया पूर्ण करण्याचे आणि आरक्षणातील ४२ जागांची नव्याने प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत. आचारसंहिता काळात ही भरती घ्यावी का याबाबत संचालक प्राधिकरणाला तर प्राधिकरण न्यायालयाला मार्गदर्शन मागणार आहे. दरम्यान न्यायालयातून भरतीसाठी ग्रीन सिग्नल मिळताच उमेदवार व त्यांचे पालक सक्रिय झाले आहेत.

ठळक मुद्देनोकरभरतीचा वाद, कुणी भरतीच्या बाजूने तर कुणी विरोधात, चौकशी झाल्यास फौजदारीची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील लिपिक व शिपायाच्या जागांच्या भरतीवरून बँकेच्या संचालकांमध्येच आता दोन गट पडले आहेत. त्यातही बहुतेकांना भरतीची चौकशी झाल्यास फौजदारी कारवाईचा ससेमिरा मागे लागण्याची हूरहूर आहे.उच्च न्यायालयाने बँकेतील १०५ जागांची भरतीप्रक्रिया पूर्ण करण्याचे आणि आरक्षणातील ४२ जागांची नव्याने प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत. आचारसंहिता काळात ही भरती घ्यावी का याबाबत संचालक प्राधिकरणाला तर प्राधिकरण न्यायालयाला मार्गदर्शन मागणार आहे. दरम्यान न्यायालयातून भरतीसाठी ग्रीन सिग्नल मिळताच उमेदवार व त्यांचे पालक सक्रिय झाले आहेत. कुणी परताव्यासाठी तर कुणी आपला दावा आणखी भक्कम करण्यासाठी संचालकांकडे येरझारा मारणे सुरू केले आहे. संचालकही त्यांना आणखी काही दिवस परतावा मागू नये, शांत रहावे म्हणून वेगवेगळे चॉकलेट देताना दिसत आहे.इकडे संचालकांमध्ये भरतीवरून वेगवेगळे मतप्रवाह आहेत. निवडून येण्याची हमखास गॅरंटी असलेले संचालक ही भरती निवडणुकीनंतर नव्या संचालक मंडळाच्या कार्यकाळात व्हावी अशा मानसिकतेत आहे. तर उमेदवार नसलेले आणि रिंगणात असूनही निवडून येण्याची हमी नसलेले संचालक कोणत्याही परिस्थितीत आत्ताच ही भरती व्हावी या दृष्टीने प्रयत्नरत दिसत आहेत.या नोकरभरतीवर निवड समितीची (स्टाफ कमिटी) भूमिका महत्वाची ठरली. मात्र कुण्या उमेदवाराला किती गुण याचा कागद त्यांच्यापुढे आलाच नाही, केवळ त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या गेल्या. एवढेच नव्हे तर संचालक मंडळाच्या बैठकीपुढेही कुणाला किती गुण हा विषय आतापर्यंत आला नाही. कुण्या उमेदवाराला किती गुण टाकले जाणार हे स्पष्ट नाही. स्वाक्षऱ्या तर केल्या आहेत. ही भरती सहजासहजी होईल, अशी चिन्हे नाहीत. अनेकांनी उच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. त्यातही पुसद विभागातून अधिक जोर दिसतो आहे. त्यामुळे भविष्यात या भरतीची सखोल चौकशी झाल्यास संपूर्ण पोलखोल होणार आहे. वेळप्रसंगी फौजदारी कारवाईलाही संचालकांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे काही मिळाले नाही तरी चालेल, मात्र पोलीस ठाणे आणि कोर्ट-कचेरीच्या भानगडी नको अशी अनेक संचालकांची मानसिकता आहे. एकूणच नोकरभरतीचा हा विषय गुंतागुंतीचा ठरला आहे.अमरावतीच्या महाराष्ट्र इन्स्टिट्युटचे गॉडफादर कोण?अमरावतीमधील सचिन वानखडे यांच्या ‘महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ हार्डवेअर अ‍ॅन्ड सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा.लि.’ या कंपनीला जिल्हा बँक नोकरभरतीचे हे कंत्राट मिळाले आहे. ही एजंसी तत्कालीन सरकारमध्ये स्थानिक नेतृत्वाच्या संमतीने मुंबईतूनच सहकार विभागाने निश्चित केली होती. त्यामुळे एजंसीचे राजकीय ‘लागेबांधे’ उघड होते. त्यामुळेच की काय या एजंसीची संपूर्ण कार्यपद्धती संशयाच्या भोवऱ्यात आहे. सोईने गुणांकन करणे, खोडतोड करणे असे प्रकार या एजंसीकडून होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :bankबँक