शहरं
Join us  
Trending Stories
1
‘महायुती सत्तेवर आली तरी मुंबईचं बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरे सत्तेवर आले तर...’, नितेश राणेंचा दावा 
2
एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली...
3
स्टार क्रिकेटर Jasprit Bumrah चा 'रशियन सुंदरी' सोबतचा फोटो व्हायरल; कोण आहे 'ही' तरुणी?
4
तुमचा iPhone हॅक तर झाला नाही ना? 'या' ४ गोष्टी दिसताच समजा कुणीतरी करतंय तुमची हेरगिरी
5
इराणच्या 'या' निर्णयाचा भारताला मोठा फटका, 2000 कोटी रुपयांवर आडलं घोडं...! काय आहे संपूर्ण प्रकरण?
6
अपघातग्रस्ताला 1.5 लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार; मोदी सरकार आणतेय नवीन योजना
7
Share Market Down: शेअर बाजारात ५०० अंकांपेक्षा अधिक घसरण, निफ्टीबी २५,८०० च्या खाली; 'ही' आहेत ५ कारणं
8
अर्थसंकल्पापूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत होऊ शकते वाढ; काय म्हटलंय नव्या रिपोर्टमध्ये
9
Ritual: सावधान! तुम्हीही मंदिरात मूर्तीच्या मागच्या बाजूला डोकं टेकवता का? आधी 'हे' वाचा
10
काळाचा घाला! MBBS विद्यार्थ्यासोबत आक्रित घडलं, नेपाळमध्ये मृत्यूने गाठलं; १० मार्चला होतं लग्न
11
२० रुपयांच्या पाण्याच्या बाटलीचे ५५ रुपये लावले; ग्राहकाने रेस्टॉरंट मालकाला शिकवला धडा
12
एक दिवसाच्या दूध-ब्रेडपेक्षाही स्वस्त आहे 'या' देशात सोनं; एका ग्रॅमसाठी मोजावे लागतात अवघे इतके रुपये!
13
"शशांकने एवढा तमाशा करायला नको होता...", मंदार देवस्थळींच्या वादात अभिनेत्रीच्या नवऱ्याची उडी, म्हणाला- "माझ्या बायकोचेही ३.५० लाख..."
14
Nashik Municipal Election 2026 : कुंभ पर्वातील वचनात शाश्वत विकासाची ग्वाही; भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
15
WPL 2026 Opening Ceremony : हरमनप्रीत अन् स्मृती मैदानात उतरण्याआधी या बॉलिवूडकरांचा दिसणार जलवा
16
'लाडक्या बहिणीं'साठी स्टार प्रचारकही मैदानात, महिला मतांचा कौल ठरणार निर्णायक
17
पगारवाढ हवी असेल तर ऑफिसला यावंच लागेल; TCS चा कडक पवित्रा, 'WFO' अटेंडन्स पूर्ण नसल्यास अप्रेझल रखडणार
18
Social Viral: कोण म्हणतं पाणीपुरी विकणं छोटं काम आहे? तापसीने करून दाखवलं 'वर्ल्ड रेकॉर्ड'
19
'भाजपाची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी, जे तमाशा बंद करायला आले होते पण...', जयंत पाटील यांची बोचरी टीका
20
२ हजारांच्या नोटा, फॉरेन करन्सी... अपघातात मृत्यू झालेल्या भिकाऱ्याच्या बॅगेत सापडले ४५ लाख
Daily Top 2Weekly Top 5

'एसटी' अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; विविध कारणे देत बदल्या टाळल्या जात असल्याचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 13:08 IST

Yavatmal : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) दीर्घकाळापासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) दीर्घकाळापासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गर्दीचा हंगाम, निवडणुकीची आचारसंहिता आदी कारणे पुढे करत या अधिकाऱ्यांच्या बदल्या टाळल्या जात असून, त्यांना अप्रत्यक्षपणे अघोषित अभय दिले जात असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

महामंडळाच्या बदली धोरणांतर्गत वर्ग एक आणि वर्ग दोनमधील विभाग नियंत्रक, अभियंते, प्रादेशिक व्यवस्थापक तसेच उन्नत गटातील सहायक वाहतूक अधीक्षक, सहायक कार्यशाळा अधीक्षक, विभागीय लेखाकार, आस्थापना पर्यवेक्षक, वाहतूक पर्यवेक्षक, भांडार पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ संगणकचालक, वरिष्ठ संगणकचालक आदी अधिकाऱ्यांची एका ठिकाणी तीन वर्षे सेवा झाल्यानंतर बदली केली जाते. या धोरणाला महामंडळाकडून मूठमाती दिली जात आहे. काही अधिकारी पाच वर्षापेक्षा अधिक काळ लोटूनही एकाच ठिकाणी कार्यरत आहेत.

महामंडळाच्या यवतमाळ विभागात विभागीय अभियंता (स्थापत्य) म्हणून नितीन गावंडे दीर्घकाळापासून कार्यरत आहेत. त्यांच्या बदलीसंदर्भात यवतमाळ येथील माहिती अधिकार कार्यकर्ते प्रवीण मिश्रा यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली. गावंडे यांचा पदोन्नतीनंतरचा तीन वर्षांचा कार्यकाळ १ सप्टेंबर २०२५ रोजी पूर्ण झाला आहे. महामंडळाच्या तरतुदीनुसार त्यांची प्रशासकीय बदली करण्याची कार्यवाही केली जात असल्याची माहिती जनमाहिती अधिकारी वसंतराव चव्हाण यांनी प्रवीण मिश्रा यांना दिली आहे. आता गावंडे यांची बदली निश्चित मानली जात आहे. विविध आयुधांचा वापर करून काही अधिकारी, कर्मचारी बदली रद्द करणे, सोयीच्या ठिकाणी बदली करून घेत असल्याचेही सांगितले जाते.

जूनमध्ये सुरू झाली प्रक्रिया

जून २०२५ पूर्वी बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यावेळी गर्दीचा हंगाम असल्याचे कारण पुढे करत कार्यवाही थांबविण्यात आली. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली. ती संपत नाही तोच महानगरपालिकेची आचारसंहिता लागली. त्यामुळे या मुक्कामी कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. पुढील काही दिवसांत जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत बदल्यांचा मुहूर्त कधी निघणार, हा प्रश्न आहे. 

टॅग्स :YavatmalयवतमाळMaharashtraमहाराष्ट्र