आगीत चार घरे खाक; बैलजोडीचाही होरपळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2022 05:00 IST2022-05-12T05:00:00+5:302022-05-12T05:00:33+5:30
एका घराला आग लागल्यानंतर लागूनच असलेला गुरांचा गोठा पेटला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. गजानन अजाबराव राऊत यांची एक लाख रुपये किमतीची बैलजोडी मृत्युमुखी पडली. सुधाकर पंजाबराव राऊत यांच्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. त्यांच्या घराला लागूनच असलेले विष्णू उत्तमराव राऊत यांचे घरही आगीने आपल्या कवेत घेतले. यात त्यांचे संपूर्ण घर बेचिराख झाले.

आगीत चार घरे खाक; बैलजोडीचाही होरपळून मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
बाभूळगाव : वाटखेड खुर्द येथे बुधवारी दुपारी लागलेल्या आगीत चार घरे, एक गुरांचा गोठा जळून खाक झाला. यात एक बैलजोडी, दोन मोटारसायकली, धान्य आदीसह संसारोपयोगी साहित्य संपूर्णपणे जळाले.
एका घराला आग लागल्यानंतर लागूनच असलेला गुरांचा गोठा पेटला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. गजानन अजाबराव राऊत यांची एक लाख रुपये किमतीची बैलजोडी मृत्युमुखी पडली. सुधाकर पंजाबराव राऊत यांच्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. त्यांच्या घराला लागूनच असलेले विष्णू उत्तमराव राऊत यांचे घरही आगीने आपल्या कवेत घेतले. यात त्यांचे संपूर्ण घर बेचिराख झाले. दोन मोटारसायकली आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. शरद पंजाबराव राऊत यांच्या बकऱ्यांचा गोठा जळून खाक झाला. त्यातील जनावरांचा चारा व इतर साहित्य जळून खाक झाले. श्रावण शामराव शिवरकर यांचे घर बेचिराख झाले. तहसीलदार विठ्ठल कुमरे, गटविकास अधिकारी रविकांत पवार, पोलीस उपनिरीक्षक मंगेश डांगे, जमादार अवजाडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रशांत झाडे, ए.पी. पोपळकर, डॉ. अशोक धुर्वे, गोपाल कावलकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली.