शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

बंदुकीचा धाक; खबऱ्याचे अपहरण करून केली बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 16:06 IST

पोलिस शिपायाचा पत्ता विचारून संपविण्याची दिली धमकी

यवतमाळ : शहरातील गुन्हेगारी आता प्रचंड टोकाला पोहोचली आहे. सतत कारवाई करतो, गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढून तत्काळ अटक केली जाते, असे नेटवर्क असणाऱ्या पोलिस शिपायालाच संपविण्याची भाषा गुन्हेगार करू लागले आहे. सोमवारी रात्री शहर ठाण्यातील पोलिस शिपायाच्या खबऱ्याला उचलून गुन्हेगारांच्या टोळीने बेदम मारहाण केली. त्याला बंदुकीचा धाक दाखवित खबर पोहोचविणाऱ्या शिपायाचा अतापता विचारण्यात आला. या घटनेने पोलिस दलात एकच खळबळ निर्माण झाली. स्वत: पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड रात्री बाहेर पडले.

शहर पोलिस ठाण्याचा कारभार केवळ एका शिपायाच्या माहितीवर सुरू आहे. डायल ११२ साठी काम करणाऱ्या या शिपायाने अल्पावधीतच आपले नेटवर्क उभे केले आहे. शहर ठाण्याच्या हद्दीत होणाऱ्या हालचालींवर त्याचे बारीक लक्ष असते. विशेष करून पाटीपुरा, गौतमनगर, वंजारी फैल या भागातील गुन्हेगारांची माहिती त्याला मिळत असते. यासाठी त्याने काही खबऱ्यांना सक्रिय केले आहे. यामुळेच संतापलेल्या गुन्हेगाराच्या टोळीने थेट पोलिस शिपायाला संपविण्याचा घाट घातला.

पोलिस शिपायाचे नेटवर्क कमजोर करण्यासाठी त्याच्या जवळचा खबरी असलेल्या सूरज नामक युवकाला वंजारी फैलातून ताब्यात घेतले. सुरुवातीला गोडीगुलाबीने बोलत सूरजला सार्वजनिक शौचालयाजवळ आणले. तेथे त्याला थापडबुक्क्यांनी जवळपास अर्धा तास मारहाण केली. दहा जणांपैकी पाच जणांजवळ देशी कट्टा होता. त्या पाचही जणांनी कट्टा रोखून ‘तू ज्या पोलिस शिपायाला खबर देतो, त्याचा नाव पत्ता सांग. नाहीतर तुला संपवितो,’ असे म्हणत धमकावले.

कशीबशी माहिती देऊन सूरजने त्या दहा जणांच्या तावडीतून सुटका करून घेतली. तो थेट दारव्हा मार्गावर पोहोचला. या धक्क्यातून सावरत सूरज शहर पोलिस ठाण्यात पोहोचला. सूरजची येथील अधिकाऱ्यांनी चौकशी करून त्याच्याकडून घटनाक्रम जाणून घेतला. धमकावणाऱ्यांपैकी कुणालाही नावानिशी ओळखत नसल्याचे सूरजने सांगितले. शहर ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांनी मध्यरात्रीपर्यंत आरोपींचा शोध घेतला. मात्र, काही हाती लागले नाही. या प्रकरणी धमकाविल्याचा गुन्हा अज्ञातांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे.

हा एकूण घटनाक्रम जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांंना माहीत होताच ते स्वत: त्या शिपायाच्या घरी गेले. तेथे त्याला धीर देत शस्त्र देण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्या शिपायाकडून शस्त्र मिळविण्यासाठी अर्जही मागविण्यात आला आहे. दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या एकूणच घटनाक्रमावर लक्ष ठेवून होते. धमकावणारे आरोपी नेमके कोण, खबऱ्या सांगतोय, त्यात कितपत तथ्य आहे, याचाही शोध पोलिस घेत आहेत. घटना खरी असेल तर गुन्हेगारांचे मनसुबे किती धोकादायक आहेत, याचा अंदाज येतो. वेळीच शहरातील गुन्हेगारी मोडीत काढली नाही, तर उद्या पोलिसांनाही संघर्ष करावा लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर