शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या फलकाला यवतमाळात फासले काळे; मराठा आंदोलकांची धरपकड

By सुरेंद्र राऊत | Updated: October 30, 2023 14:20 IST

शासन आपल्या दारी कार्यक्रम : परिस्थिती गंभीर, पोलिस प्रशासनावर प्रचंड ताण

यवतमाळ : येथे शासन आपल्या दारी अभियानांतर्गत ३५ हजार शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मेेळाव्याला उपस्थित राहणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फलक लागले आहे. यातच मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून सोमवारी सकाळी आर्णी मार्गावरील फलकावर काळे फासले तर काही ठिकाणी काही फलक फाडण्यात आले. मुख्यमंत्री येणार त्या मार्गावरील फलकाला काळे फासल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. 

शासन आपल्या दारी कार्यक्रमात मराठा आंदोलक निदर्शने करतील याची दाट शक्यता आहे. त्यासाठी पोलिसांनी प्रमुखांची धरपकड सुरू केली आहे. मराठा आंदोलकांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या फलकाला काळे फासल्यानंतर हे फलक काढण्यासाठी नगरपालिकेची यंत्रणा तातडीने कामाला लागली. मुख्यमंत्री येईपर्यंत आर्णी मार्गावरील असे सर्व फलक काढण्याचे काम सुरू होते. एकूणच परिस्थिती गंभीर असून पोलिस प्रशासनावर प्रचंड ताण आला आहे. 

शेतकरी मेळाव्याला गर्दी जमविण्यासाठी प्रत्येक गावातून एसटी बसेस  बोलविण्यात आल्या. महागाव, उमरखेड, पुसद या तालुक्यांमध्ये काही गावात मराठा आंदोलकांनी या बसेसला प्रवेश नाकारला. त्यामुळे एसटी बसेस रिकाम्याच परतल्या. सातत्याने घडामोडी सुरू असल्याने पोलिसांची प्रचंड धावपळ होत आहे. ३५ हजारांच्या जमावात मराठा आंदोलक ओळखायचे कसे हेही आव्हान पोलिसांपुढे आहे. पाणी, जेवण न मिळाल्याने महिला शेतकऱ्यांचा संताप

शासन आपल्या दारी अभियानासाठी गर्दी जमविण्याचे शासकीय कर्मचाऱ्यांना टार्गेट देण्यात आले. सकाळी केळापूर तालुक्यातून महिला शेतकऱ्यांची बस कार्यक्रमस्थळी आली. मात्र त्यांना दुपार होऊनही साधे पाणी, जेवणही मिळाले नाही. यामुळे संतापलेल्या महिलांनी एसटी बस परत काढा आम्हाला गावी नेऊन सोडा, अशी मागणी केली. यातच बसमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यासोबत महिलांचा वाद झाला. महिलांनी यावेळी आपला संताप व्यक्त केला. कार्यक्रमस्थळी अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. शिवाय मुख्यमंत्र्यांंना मुंबईतून येण्यास उशीर होत असल्याने येथे आणलेल्या नागरिकांचा संयम सुटू लागला आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदेYavatmalयवतमाळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार