शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

दुकान गाळ्यांवर भाडेकरू मालामाल

By admin | Updated: October 13, 2014 23:27 IST

गेल्या १५ वर्षांपूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने बेरोजगारांसाठी शहरात बांधलेले दुकान गाळे अल्प दराने भाड्याने घेऊन तेच गाळे आता जादा दराने इतरांना भाड्याने देऊन घरबसल्या पैसे कमाविण्याचा

मारेगाव : गेल्या १५ वर्षांपूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने बेरोजगारांसाठी शहरात बांधलेले दुकान गाळे अल्प दराने भाड्याने घेऊन तेच गाळे आता जादा दराने इतरांना भाड्याने देऊन घरबसल्या पैसे कमाविण्याचा उद्योग काहींनी सुरू केला आहे़तालुक्यातील बेरोजगार तरूणांना रोजगार मिळवून देण्यासाठी येथील ग्रामपंचायतीने शहरात आंबेडकर चौकालगत दुकान गाळे काढले़ त्यावेळी अत्यल्प आणि नाममात्र ५०० रूपये दरमहा भाड्याने ही दुकान गाळे बेरोजगार तरूणांना भाड्याने देण्यात आली़ तेथे त्यांनी आपला व्यवसाय सुरू करून ते आत्मनिर्भर व्हावे, असा हेतू यामागे होता. युवकांना त्यामुळे रोजगार मिळून ते बेरोजगार राहू नये, अशी भावना होती. या खाळ्यांमुळे त्यांच्या कुटुंबाला उदरनिवार्हाचे साधन उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यावेळी बहुतांश बेरोजगार तरूणांनी या गाळ्यात दुकाने थाटून रोजगार मिळविण्याचा प्रयत्नही केला़ परंतु अनेकांना आपल्या व्यवसायात अपयश आल्याने त्यांनी आपले व्यवसाय बंद केले़ मात्र त्यांनी ग्रामपंचायतीच्या या गाळ्यांवरील ताबा अद्याप सोडला नाही़ ज्या बेरोजगार तरूणांना व्यवसायात अपयश आले, त्यांनी आता नवीन फंडा शोधून काढला़ ग्रामपंचायत प्रशासनाकडून केवळ ५०० रूपये दरमहा भाड्याने घेतलेले हे दुकान गाळे, आता या बेरोजगारांनी दुसऱ्यांना परस्पर चढ्या भावाने भाड्याने दिले अहेत. ग्रामपंचायत भाड्यापोटी दरमहा केवळ ५०० रूपये जमा करून वरील पाच हजारांच्यावर रूपये या तरूणांना काहीही न करता मिळत आहेत. त्यामुळे दुकान टाकण्यापेक्षा हा धंदा बरा, अशी प्रवृत्ती यांच्यात वाढली आहे़ या गाळेधारकांपैकी काहींनी रोजगाराचा हा दुसरा मार्ग स्वीकारला आहे़ तरीही अद्याप ग्रामपंचायतीने या गाळेधारकांकडील दुकान गाळे परत घेतले नाहीत़ मारेगाव शहरात दुकान गाळ्याची कमतरता आहे़ अनेक बेरोजगार तरूण दुकान गाळे शोधत आहे़ एखादे दुकान गाळे भाड्याने घ्यायचे म्हटले, तर पगडी म्हणून लाखो रूपये जमा ठेवावे लागतात़ दरमहा भाडेही भरपूर असते़ त्यामुळे या बेरोजगार तरूणांची कुचंबना होत आहे़ दुसरीकडे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित धोरणाने काही बेरोजगार काहीही न करता घरबसल्या हजारो रूपये दर महिन्याला कमावत आहे़ ग्रामपंचायत प्रशासनाने भाड्याने दिलेले सर्व गाळे ताब्यात घेऊन नव्याने या गाळ्यांचा लिलाव करावा, अशी मागणी बेरोजगार तरूणांकडून होत आहे़ (शहर प्रतिनिधी)