शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
4
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
5
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
6
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
8
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
9
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
10
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
11
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
12
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
13
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
14
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
15
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
16
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
17
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
18
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
19
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
20
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

दुकान गाळ्यांवर भाडेकरू मालामाल

By admin | Updated: October 13, 2014 23:27 IST

गेल्या १५ वर्षांपूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने बेरोजगारांसाठी शहरात बांधलेले दुकान गाळे अल्प दराने भाड्याने घेऊन तेच गाळे आता जादा दराने इतरांना भाड्याने देऊन घरबसल्या पैसे कमाविण्याचा

मारेगाव : गेल्या १५ वर्षांपूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने बेरोजगारांसाठी शहरात बांधलेले दुकान गाळे अल्प दराने भाड्याने घेऊन तेच गाळे आता जादा दराने इतरांना भाड्याने देऊन घरबसल्या पैसे कमाविण्याचा उद्योग काहींनी सुरू केला आहे़तालुक्यातील बेरोजगार तरूणांना रोजगार मिळवून देण्यासाठी येथील ग्रामपंचायतीने शहरात आंबेडकर चौकालगत दुकान गाळे काढले़ त्यावेळी अत्यल्प आणि नाममात्र ५०० रूपये दरमहा भाड्याने ही दुकान गाळे बेरोजगार तरूणांना भाड्याने देण्यात आली़ तेथे त्यांनी आपला व्यवसाय सुरू करून ते आत्मनिर्भर व्हावे, असा हेतू यामागे होता. युवकांना त्यामुळे रोजगार मिळून ते बेरोजगार राहू नये, अशी भावना होती. या खाळ्यांमुळे त्यांच्या कुटुंबाला उदरनिवार्हाचे साधन उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यावेळी बहुतांश बेरोजगार तरूणांनी या गाळ्यात दुकाने थाटून रोजगार मिळविण्याचा प्रयत्नही केला़ परंतु अनेकांना आपल्या व्यवसायात अपयश आल्याने त्यांनी आपले व्यवसाय बंद केले़ मात्र त्यांनी ग्रामपंचायतीच्या या गाळ्यांवरील ताबा अद्याप सोडला नाही़ ज्या बेरोजगार तरूणांना व्यवसायात अपयश आले, त्यांनी आता नवीन फंडा शोधून काढला़ ग्रामपंचायत प्रशासनाकडून केवळ ५०० रूपये दरमहा भाड्याने घेतलेले हे दुकान गाळे, आता या बेरोजगारांनी दुसऱ्यांना परस्पर चढ्या भावाने भाड्याने दिले अहेत. ग्रामपंचायत भाड्यापोटी दरमहा केवळ ५०० रूपये जमा करून वरील पाच हजारांच्यावर रूपये या तरूणांना काहीही न करता मिळत आहेत. त्यामुळे दुकान टाकण्यापेक्षा हा धंदा बरा, अशी प्रवृत्ती यांच्यात वाढली आहे़ या गाळेधारकांपैकी काहींनी रोजगाराचा हा दुसरा मार्ग स्वीकारला आहे़ तरीही अद्याप ग्रामपंचायतीने या गाळेधारकांकडील दुकान गाळे परत घेतले नाहीत़ मारेगाव शहरात दुकान गाळ्याची कमतरता आहे़ अनेक बेरोजगार तरूण दुकान गाळे शोधत आहे़ एखादे दुकान गाळे भाड्याने घ्यायचे म्हटले, तर पगडी म्हणून लाखो रूपये जमा ठेवावे लागतात़ दरमहा भाडेही भरपूर असते़ त्यामुळे या बेरोजगार तरूणांची कुचंबना होत आहे़ दुसरीकडे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित धोरणाने काही बेरोजगार काहीही न करता घरबसल्या हजारो रूपये दर महिन्याला कमावत आहे़ ग्रामपंचायत प्रशासनाने भाड्याने दिलेले सर्व गाळे ताब्यात घेऊन नव्याने या गाळ्यांचा लिलाव करावा, अशी मागणी बेरोजगार तरूणांकडून होत आहे़ (शहर प्रतिनिधी)