शहरं
Join us  
Trending Stories
1
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
2
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
3
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
4
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
5
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
6
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
7
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
8
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
9
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
10
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
11
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
12
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
13
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
14
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
15
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
16
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
17
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
18
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
19
नवरदेव नेसला साडी अन् नवरीची शेरवानी; आगळ्या-वेगळ्या लग्नाने वेधलं लक्ष, रंगली तुफान चर्चा
20
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
Daily Top 2Weekly Top 5

दुकान गाळ्यांवर भाडेकरू मालामाल

By admin | Updated: October 13, 2014 23:27 IST

गेल्या १५ वर्षांपूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने बेरोजगारांसाठी शहरात बांधलेले दुकान गाळे अल्प दराने भाड्याने घेऊन तेच गाळे आता जादा दराने इतरांना भाड्याने देऊन घरबसल्या पैसे कमाविण्याचा

मारेगाव : गेल्या १५ वर्षांपूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने बेरोजगारांसाठी शहरात बांधलेले दुकान गाळे अल्प दराने भाड्याने घेऊन तेच गाळे आता जादा दराने इतरांना भाड्याने देऊन घरबसल्या पैसे कमाविण्याचा उद्योग काहींनी सुरू केला आहे़तालुक्यातील बेरोजगार तरूणांना रोजगार मिळवून देण्यासाठी येथील ग्रामपंचायतीने शहरात आंबेडकर चौकालगत दुकान गाळे काढले़ त्यावेळी अत्यल्प आणि नाममात्र ५०० रूपये दरमहा भाड्याने ही दुकान गाळे बेरोजगार तरूणांना भाड्याने देण्यात आली़ तेथे त्यांनी आपला व्यवसाय सुरू करून ते आत्मनिर्भर व्हावे, असा हेतू यामागे होता. युवकांना त्यामुळे रोजगार मिळून ते बेरोजगार राहू नये, अशी भावना होती. या खाळ्यांमुळे त्यांच्या कुटुंबाला उदरनिवार्हाचे साधन उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यावेळी बहुतांश बेरोजगार तरूणांनी या गाळ्यात दुकाने थाटून रोजगार मिळविण्याचा प्रयत्नही केला़ परंतु अनेकांना आपल्या व्यवसायात अपयश आल्याने त्यांनी आपले व्यवसाय बंद केले़ मात्र त्यांनी ग्रामपंचायतीच्या या गाळ्यांवरील ताबा अद्याप सोडला नाही़ ज्या बेरोजगार तरूणांना व्यवसायात अपयश आले, त्यांनी आता नवीन फंडा शोधून काढला़ ग्रामपंचायत प्रशासनाकडून केवळ ५०० रूपये दरमहा भाड्याने घेतलेले हे दुकान गाळे, आता या बेरोजगारांनी दुसऱ्यांना परस्पर चढ्या भावाने भाड्याने दिले अहेत. ग्रामपंचायत भाड्यापोटी दरमहा केवळ ५०० रूपये जमा करून वरील पाच हजारांच्यावर रूपये या तरूणांना काहीही न करता मिळत आहेत. त्यामुळे दुकान टाकण्यापेक्षा हा धंदा बरा, अशी प्रवृत्ती यांच्यात वाढली आहे़ या गाळेधारकांपैकी काहींनी रोजगाराचा हा दुसरा मार्ग स्वीकारला आहे़ तरीही अद्याप ग्रामपंचायतीने या गाळेधारकांकडील दुकान गाळे परत घेतले नाहीत़ मारेगाव शहरात दुकान गाळ्याची कमतरता आहे़ अनेक बेरोजगार तरूण दुकान गाळे शोधत आहे़ एखादे दुकान गाळे भाड्याने घ्यायचे म्हटले, तर पगडी म्हणून लाखो रूपये जमा ठेवावे लागतात़ दरमहा भाडेही भरपूर असते़ त्यामुळे या बेरोजगार तरूणांची कुचंबना होत आहे़ दुसरीकडे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित धोरणाने काही बेरोजगार काहीही न करता घरबसल्या हजारो रूपये दर महिन्याला कमावत आहे़ ग्रामपंचायत प्रशासनाने भाड्याने दिलेले सर्व गाळे ताब्यात घेऊन नव्याने या गाळ्यांचा लिलाव करावा, अशी मागणी बेरोजगार तरूणांकडून होत आहे़ (शहर प्रतिनिधी)