शहरं
Join us  
Trending Stories
1
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
2
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
3
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
4
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
5
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
6
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
7
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
8
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
9
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
10
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
11
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
12
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
13
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
14
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
15
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
16
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
17
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
18
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
19
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
20
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा

दहा महिन्यानंतरही ६० हजार शेतकरी कर्जमाफी बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 11:33 PM

शासनाने कर्जमाफीची घोषणा करून आता दहा महिने उलटले तरी जिल्ह्यातील ६० हजार शेतकरी अद्यापही कर्जमाफी प्रक्रियेच्या बाहेरच आहेत. आकडेवारीतील तफावतीने त्यांची नावे ग्रीन यादीत आलीच नाही.

ठळक मुद्देआयटी विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा : वनटाईम सेटलमेंटसाठी मुदतवाढ पण पैसे भरायची सोयच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाने कर्जमाफीची घोषणा करून आता दहा महिने उलटले तरी जिल्ह्यातील ६० हजार शेतकरी अद्यापही कर्जमाफी प्रक्रियेच्या बाहेरच आहेत. आकडेवारीतील तफावतीने त्यांची नावे ग्रीन यादीत आलीच नाही. कर्जमाफीच्या जाचक अटीचा फटका या शेतकऱ्यांना बसला आहे.जिल्ह्यातील दोन लाख ४० हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले. जिल्ह्यात कर्जमाफीस पात्र ठरलेले जिल्हा बँकेचे एक लाख १३ हजार ५५७, राष्ट्रीयकृत बँकेचे ६७ हजार २७२ आणि ग्रामीण बँकेचे सात हजार ८३५ शेतकरी आहे. या शेतकºयांच्या खात्यात ९९४ कोटी ५६ लाख रुपयांची रक्कम वळती करण्यात आली आहे. यातील एक लाख ४८ हजार शेतकरी नवीन कर्ज मिळविण्यासाठी पात्र ठरले आहे.दुसरीकडे ६० हजार शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. वनटाईम सेटलमेंट आणि मिसमॅचच्या यादीला ग्रीन सिग्नल न मिळाल्याने हे शेतकरी कर्जमाफीपासून दूर आहे. गतवर्षी जून महिन्यात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. तब्बल दहा महिन्याचा कालावधी लोटला तरी कर्जमाफीची भिजत घोंगडे आहे. आकडेवारीतील तफावतीमुळे या शेतकºयांची नावे ग्रीन यादीत आली नाही. मुंबईच्या आयटी विभागाकडे त्या संबंधीचा अहवाल बँकांनी पाठविला. मात्र तेथून अद्यापपर्यंत मान्यता मिळाली नाही. शेतकरी आपले नाव ग्रीन यादीत आहे काय, हे पाहण्यासाठी दररोज बँकेचे उंबरठे झिजवित आहे. बँक व्यवस्थापकांना माहिती विचारत आहे. परंतु त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.कर्जाची रक्कम ५०० कोटींच्या घरात६० हजार शेतकºयांमध्ये वनटाईम सेटलमेंट आणि मिसमॅचमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे. दीड लाख रुपयाप्रमाणे ६० हजार शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे ९०० कोटी रुपये होतात. यातील ३० टक्के शेतकरी मिसमॅच यादीत आहे. त्यामुळे दीड लाखांच्या आत कर्ज धरले तरी सरासरी ५०० कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा पेच सध्या जिल्ह्यापुढे निर्माण झाला आहे.नवीन कर्जास विलंबदरवर्षी शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज एप्रिल महिन्यात दिले जाते. मात्र यावर्षी कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अर्धा एप्रिल महिना संपला तरी जिल्ह्यातील शेतकºयांना खरीप पीक कर्ज मिळाले नाही.