शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

हे तर स्वातंत्र्याचे मंदिर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 5:00 AM

९ ऑगस्ट १९८१ रोजी या स्मारकाच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले होते. चार दशकांचा दीर्घ काळ लोटूनही हे स्मारक तेवढेच प्रेरक आहे. वर्षागणिक स्मारकाचा परिसर अधिक देखणा केला जात आहे. गेल्या वर्षी महात्मा गांधी यांच्या १५० जयंतीनिमित्त येथे वन विभागाने विशेष उपक्रम राबविला. १९३६ मध्ये गांधीजींनी सेवाग्रामच्या आश्रमात जो पिंपळवृक्षा लावला होता, त्यापासून रोप तयार करून वृक्षलागवड करण्यात आली.

अविनाश साबापुरे/रुपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहिदाचे स्मारक म्हणजे केवळ वास्तू नव्हे, ते भारतीय स्वातंत्र्याचे मंदिर आहे... असा जाज्वल्य अभिमान व्यक्त करतात उमरीचे गावकरी. १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात महात्मा गांधीच्या प्रेरणेने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलीदान देणाऱ्या यशवंत लुडबाजी पाळेकर यांचे स्मारक या गावात गेल्या ३९ वर्षांपासून आझादीचा ओजस्वी हुंकार भरत आहे. ९ ऑगस्ट क्रांतिदिनाच्या निमित्ताने बाभूळगाव तालुक्यातील या शहीद स्मारकावर एक कृतज्ञतापूर्वक नजर...९ ऑगस्ट १९८१ रोजी या स्मारकाच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले होते. चार दशकांचा दीर्घ काळ लोटूनही हे स्मारक तेवढेच प्रेरक आहे. वर्षागणिक स्मारकाचा परिसर अधिक देखणा केला जात आहे. गेल्या वर्षी महात्मा गांधी यांच्या १५० जयंतीनिमित्त येथे वन विभागाने विशेष उपक्रम राबविला. १९३६ मध्ये गांधीजींनी सेवाग्रामच्या आश्रमात जो पिंपळवृक्षा लावला होता, त्यापासून रोप तयार करून वृक्षलागवड करण्यात आली. त्यामुळे या हुतात्मा स्मारकाला आता राष्ट्रपित्याच्या स्मृतींचीही सावली लाभणार आहे.बॅरिस्टर ए.आर.अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रात हुतात्मा स्मारकांच्या बांधणीची संकल्पना पुढे आणली. त्यातून २०२ ठिकाणी बांधकामे पूर्ण झाली. त्यातीलच एक आहे बाभूळगाव तालुक्यातील उमरीचे स्मारक. काळाच्या ओघात अनेक ठिकाणच्या स्मारकांवर स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. अनेक स्मारकांच्या इमारती मोडकळीस आल्या. मात्र उमरीचे स्मारक दिवसेन्दिवस अधिकाधिक देखणे होत आहे. यामागे जिल्हा परिषदेची धडपड जेवढी कारणीभूत आहे, त्यापेक्षाही अधिक महत्त्वाची आहे उमरी गावकऱ्यांमध्ये ठासून भरलेली राष्ट्रीयतेची भावना.मी शहीद स्मारकभारतमातेला इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे, ९ ऑगस्ट क्रांती दिन... स्वातंत्र्यासाठी १९४२ चा अखेरचा लढा. महात्मा गांधींनी ‘चले जाव’चा नारा दिला. ‘करेंगे या मरेंगे’च्या गगनभेदी घोषणेने अख्खा देश पेटून उठला. या आंदोलनात लाखो तरुणांनी सहभाग नोंदविला अन् बघता बघता सारा देशच जणू तुरुंग झाला. परंतु ९ ऑगस्टला देशात विविध ठिकाणी जनक्षोभ भडकला. या आंदोलनात अनेक वीरांनी प्राणाची पर्वा न करता ब्रिटिश सरकारविरोधात बंड पुकारले. अनेकांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्याच स्मरणार्थ प्रत्येक जिल्ह्यात शहीद स्मारके उभारण्यात आली. आज क्रांती दिनानिमित्त या स्मारकांच्या अवस्थेवर प्रकाश टाकणारे हे वृत्त...

टॅग्स :Templeमंदिर